शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

धान रोवणी काळातील पारंपारिक गाणी लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:58 IST

सकाळी ६ वाजतापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल १२ तास शेतकरी शेतात राबतो. एकदाची रोवणी केव्हा आटोपते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते. रोवणीची कामे आटोपली की, शेतापासून घरापर्यंत जल्लोषात मिरवणूक काढून आनंद साजरा केला जातो. परंतू ही परंपवा कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । गुते पद्धतीही कालबाह्य, आधुनिक यंत्राच्या वापराकडे कल, गाण्यातून व्यक्त होत होत्या महिला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानपीक घेतल्या जाते. ग्रामीण भागात धानाची रोवणी करताना गाणी म्हणायची परंपरा होती. परंतू आता लुप्त होण्याच्या मार्गावर आली आहे. वाजागाजासह शेतातून घरापर्यंत मिरवणूक काढण्याची प्रथा आता कालबाह्य झाल्याचे दिसून येत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील लोकाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. जिल्ह्यातील सावली, मूल, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही आदी परिसरात भात पिकांची तर कोरपना, वरोरा, राजुरा तालुक्यात कापासाचे उत्पन्न घेतले जाते. नव्या हंगमाला सुरुवात करताना शेतकरी हंगामातील कामाला सुरुवात करुन पारंपारिक पूजा विधी करतात. त्यानंतर जून महिन्यात शेतकरी मशागतीची कामे करतात. जुनच्या मध्यात पेरणी केली जाते. त्यानंतर पावसाला अनुरूप रोवणीची कामे हाती घेतली जातात. सकाळी ६ वाजतापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल १२ तास शेतकरी शेतात राबतो. एकदाची रोवणी केव्हा आटोपते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते. रोवणीची कामे आटोपली की, शेतापासून घरापर्यंत जल्लोषात मिरवणूक काढून आनंद साजरा केला जातो. परंतू ही परंपवा कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.रोवणी करताना महिला पूर्वी गाणे गायच्या. यावेळी त्या गाण्यातूनच आपल्या भावना व्यक्त करायच्या. तर रोवणीसाठी अनेक गावावरुन मुजरांचा गुताच यायचा. मात्र आता ते गुतासुद्धा येणे बंद झाले आहे.रोवणी समाप्तीचा आनंदही ओसरलारोवणी संपल्यानंतर शेतातील मजूर मोठ्या प्रमाणात चिखल खेळायचे. त्यानंतर चिखल प्रत्येक मजुराच्या अंगाला लावून वाजतगाजत शेतमालकाच्या घराकडे यायचे. शेतातून आणलेले चिखल शेतमालकाला लावून त्यांच्याकडून भोजारा (बक्षीस) घ्यायचे. परंतु सद्यास्थितीत ही पद्धत जिल्ह्यातून कालबाह्य झाल्याचे चित्र आहे.श्रमाच्या भाकरीचा आनंदखरीप हंगामातील तीन ते चार महिने श्रम केल्यानंतर वर्षभर उदरनिर्वाहापुरते धान्य प्राप्त करण्यासाठी शेतकरी धडपड करतो. एकदा रोवणीची कामे आटोपली की पूजा करून तसेच मजुरांना भोजनाची मेजवानी देवून आनंद व्यक्त करतो. परंतु ही अनोखी परंपराही जिल्ह्यातील काही गावातच शिल्लक आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी