शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

धान रोवणी काळातील पारंपारिक गाणी लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:58 IST

सकाळी ६ वाजतापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल १२ तास शेतकरी शेतात राबतो. एकदाची रोवणी केव्हा आटोपते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते. रोवणीची कामे आटोपली की, शेतापासून घरापर्यंत जल्लोषात मिरवणूक काढून आनंद साजरा केला जातो. परंतू ही परंपवा कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । गुते पद्धतीही कालबाह्य, आधुनिक यंत्राच्या वापराकडे कल, गाण्यातून व्यक्त होत होत्या महिला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानपीक घेतल्या जाते. ग्रामीण भागात धानाची रोवणी करताना गाणी म्हणायची परंपरा होती. परंतू आता लुप्त होण्याच्या मार्गावर आली आहे. वाजागाजासह शेतातून घरापर्यंत मिरवणूक काढण्याची प्रथा आता कालबाह्य झाल्याचे दिसून येत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील लोकाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. जिल्ह्यातील सावली, मूल, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही आदी परिसरात भात पिकांची तर कोरपना, वरोरा, राजुरा तालुक्यात कापासाचे उत्पन्न घेतले जाते. नव्या हंगमाला सुरुवात करताना शेतकरी हंगामातील कामाला सुरुवात करुन पारंपारिक पूजा विधी करतात. त्यानंतर जून महिन्यात शेतकरी मशागतीची कामे करतात. जुनच्या मध्यात पेरणी केली जाते. त्यानंतर पावसाला अनुरूप रोवणीची कामे हाती घेतली जातात. सकाळी ६ वाजतापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल १२ तास शेतकरी शेतात राबतो. एकदाची रोवणी केव्हा आटोपते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते. रोवणीची कामे आटोपली की, शेतापासून घरापर्यंत जल्लोषात मिरवणूक काढून आनंद साजरा केला जातो. परंतू ही परंपवा कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.रोवणी करताना महिला पूर्वी गाणे गायच्या. यावेळी त्या गाण्यातूनच आपल्या भावना व्यक्त करायच्या. तर रोवणीसाठी अनेक गावावरुन मुजरांचा गुताच यायचा. मात्र आता ते गुतासुद्धा येणे बंद झाले आहे.रोवणी समाप्तीचा आनंदही ओसरलारोवणी संपल्यानंतर शेतातील मजूर मोठ्या प्रमाणात चिखल खेळायचे. त्यानंतर चिखल प्रत्येक मजुराच्या अंगाला लावून वाजतगाजत शेतमालकाच्या घराकडे यायचे. शेतातून आणलेले चिखल शेतमालकाला लावून त्यांच्याकडून भोजारा (बक्षीस) घ्यायचे. परंतु सद्यास्थितीत ही पद्धत जिल्ह्यातून कालबाह्य झाल्याचे चित्र आहे.श्रमाच्या भाकरीचा आनंदखरीप हंगामातील तीन ते चार महिने श्रम केल्यानंतर वर्षभर उदरनिर्वाहापुरते धान्य प्राप्त करण्यासाठी शेतकरी धडपड करतो. एकदा रोवणीची कामे आटोपली की पूजा करून तसेच मजुरांना भोजनाची मेजवानी देवून आनंद व्यक्त करतो. परंतु ही अनोखी परंपराही जिल्ह्यातील काही गावातच शिल्लक आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी