शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

धान रोवणी काळातील पारंपारिक गाणी लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:58 IST

सकाळी ६ वाजतापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल १२ तास शेतकरी शेतात राबतो. एकदाची रोवणी केव्हा आटोपते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते. रोवणीची कामे आटोपली की, शेतापासून घरापर्यंत जल्लोषात मिरवणूक काढून आनंद साजरा केला जातो. परंतू ही परंपवा कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । गुते पद्धतीही कालबाह्य, आधुनिक यंत्राच्या वापराकडे कल, गाण्यातून व्यक्त होत होत्या महिला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानपीक घेतल्या जाते. ग्रामीण भागात धानाची रोवणी करताना गाणी म्हणायची परंपरा होती. परंतू आता लुप्त होण्याच्या मार्गावर आली आहे. वाजागाजासह शेतातून घरापर्यंत मिरवणूक काढण्याची प्रथा आता कालबाह्य झाल्याचे दिसून येत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील लोकाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. जिल्ह्यातील सावली, मूल, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही आदी परिसरात भात पिकांची तर कोरपना, वरोरा, राजुरा तालुक्यात कापासाचे उत्पन्न घेतले जाते. नव्या हंगमाला सुरुवात करताना शेतकरी हंगामातील कामाला सुरुवात करुन पारंपारिक पूजा विधी करतात. त्यानंतर जून महिन्यात शेतकरी मशागतीची कामे करतात. जुनच्या मध्यात पेरणी केली जाते. त्यानंतर पावसाला अनुरूप रोवणीची कामे हाती घेतली जातात. सकाळी ६ वाजतापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल १२ तास शेतकरी शेतात राबतो. एकदाची रोवणी केव्हा आटोपते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते. रोवणीची कामे आटोपली की, शेतापासून घरापर्यंत जल्लोषात मिरवणूक काढून आनंद साजरा केला जातो. परंतू ही परंपवा कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.रोवणी करताना महिला पूर्वी गाणे गायच्या. यावेळी त्या गाण्यातूनच आपल्या भावना व्यक्त करायच्या. तर रोवणीसाठी अनेक गावावरुन मुजरांचा गुताच यायचा. मात्र आता ते गुतासुद्धा येणे बंद झाले आहे.रोवणी समाप्तीचा आनंदही ओसरलारोवणी संपल्यानंतर शेतातील मजूर मोठ्या प्रमाणात चिखल खेळायचे. त्यानंतर चिखल प्रत्येक मजुराच्या अंगाला लावून वाजतगाजत शेतमालकाच्या घराकडे यायचे. शेतातून आणलेले चिखल शेतमालकाला लावून त्यांच्याकडून भोजारा (बक्षीस) घ्यायचे. परंतु सद्यास्थितीत ही पद्धत जिल्ह्यातून कालबाह्य झाल्याचे चित्र आहे.श्रमाच्या भाकरीचा आनंदखरीप हंगामातील तीन ते चार महिने श्रम केल्यानंतर वर्षभर उदरनिर्वाहापुरते धान्य प्राप्त करण्यासाठी शेतकरी धडपड करतो. एकदा रोवणीची कामे आटोपली की पूजा करून तसेच मजुरांना भोजनाची मेजवानी देवून आनंद व्यक्त करतो. परंतु ही अनोखी परंपराही जिल्ह्यातील काही गावातच शिल्लक आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी