शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

मुसळधार पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST

रविवारी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडला होता. त्यानंतर सोमवारी सकाळपासून ऊन्ह तापू लागले. दरम्यान, दुपारी २ वाजतापासून अचानक वातावरणात बदल होऊ लागला. ढगाळ वातावरण तयार झाले आणि दुपारी ३ वाजतापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज होळी असल्यामुळे र

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात सर्वत्र होळी उत्साहात साजरी होत असतानाच दुपारी ३ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. कुठे तासभर तर कुठे अर्धा तास पाऊस बरसत राहिला. अचानक पाऊस आल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. जिल्हाभरातील शेतपिकांचेही मोठे नुकसान झाले.रविवारी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडला होता. त्यानंतर सोमवारी सकाळपासून ऊन्ह तापू लागले. दरम्यान, दुपारी २ वाजतापासून अचानक वातावरणात बदल होऊ लागला. ढगाळ वातावरण तयार झाले आणि दुपारी ३ वाजतापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज होळी असल्यामुळे रस्त्यावर रंगांची दुकाने सजली होती. मात्र अचानक पाऊस आल्यामुळे छोट्यामोठ्या व्यावसायिकांची तारांबळ उडाली. चंद्रपूरसह भद्रावती, वरोरा, चिमूर, सिंदेवाही, मूल, नागभीड, बल्लारपूर, राजुरा, गोंडपिपरी, कोरपना आदी तालुक्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. सध्या शेतात रबी हंगामाचे पीक आहे. याशिवाय काही शेतकऱ्यांनी धानाचे दुबार पीकही लावले आहेत. खरीप हंगामातील कापूसही अनेकांच्या शेतात आहे. सोमवारी अचानक आलेल्या पावसामुळे या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. भद्रावती तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. विंजासन परिसरात जगन दानव, सुनील पायघन यांच्या शेतातील ज्वारी, गहू या पिकांचे नुकसान झाले. संपूर्ण पीक आडवे झाले आहे. घोडपेठ व परिसरातील तिरवंजा, कवठी, कचराळा, गुंजाळा, चालबर्डी, चपराळा, निंबाळा या गावांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सध्या शेतातील हरभरा पीक काढणीला आलेले आहे. मात्र या अकाली पावसाने शेतकºयांचा हातचा घास हिरावला आहे. शासनाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी आहे.विटा व्यावसायिकांना फटकापोंभुर्णा : तालुक्यातील सर्वच भागात सोमवारी सायंकाळी ५ वाजता मेघगर्जना होवून जोरदार पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाचा सर्वाधिक फटका विटा व्यवसायिकांना बसला. शेतकºयांच्या शेतात असलेले मुंग, हरभरा व अन्य पीक यावर ताडपत्री न टाकल्याने प्रचंड नुकसान झाले. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विटा व्यवसाय चालतो. पावसामुळे विटाभट्टीत पाणी शिरले. यात त्यांचे मोठे नुकसान झाले.होळीच्या आनंदावर विरजणसोमवारी सर्वत्र होळीचा उत्साह होता. चंद्रपूरसह गावागावात या दिवशी सायंकाळी होलिका दहन केले जाते. यासाठी नागरिकांनी आपापल्या वार्डात सकाळपासून लाकडे गोळा करून आणली व होळी पेटविण्यासाठी रचून ठेवली होती. मात्र काही ठिकाणी दुपारी व काही ठिकाणी सायंकाळच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस आल्याने संपूर्ण लाकडे ओली झाली. अनेकांच्या होळी पेटविण्याच्या जागेवरही चिखलाचे साम्राज्य तयार झाले. पावसामुळे होळीच्या आनंदावर विरजण पडले.

टॅग्स :Socialसामाजिक