शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

मुसळधार पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST

रविवारी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडला होता. त्यानंतर सोमवारी सकाळपासून ऊन्ह तापू लागले. दरम्यान, दुपारी २ वाजतापासून अचानक वातावरणात बदल होऊ लागला. ढगाळ वातावरण तयार झाले आणि दुपारी ३ वाजतापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज होळी असल्यामुळे र

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात सर्वत्र होळी उत्साहात साजरी होत असतानाच दुपारी ३ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. कुठे तासभर तर कुठे अर्धा तास पाऊस बरसत राहिला. अचानक पाऊस आल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. जिल्हाभरातील शेतपिकांचेही मोठे नुकसान झाले.रविवारी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडला होता. त्यानंतर सोमवारी सकाळपासून ऊन्ह तापू लागले. दरम्यान, दुपारी २ वाजतापासून अचानक वातावरणात बदल होऊ लागला. ढगाळ वातावरण तयार झाले आणि दुपारी ३ वाजतापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज होळी असल्यामुळे रस्त्यावर रंगांची दुकाने सजली होती. मात्र अचानक पाऊस आल्यामुळे छोट्यामोठ्या व्यावसायिकांची तारांबळ उडाली. चंद्रपूरसह भद्रावती, वरोरा, चिमूर, सिंदेवाही, मूल, नागभीड, बल्लारपूर, राजुरा, गोंडपिपरी, कोरपना आदी तालुक्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. सध्या शेतात रबी हंगामाचे पीक आहे. याशिवाय काही शेतकऱ्यांनी धानाचे दुबार पीकही लावले आहेत. खरीप हंगामातील कापूसही अनेकांच्या शेतात आहे. सोमवारी अचानक आलेल्या पावसामुळे या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. भद्रावती तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. विंजासन परिसरात जगन दानव, सुनील पायघन यांच्या शेतातील ज्वारी, गहू या पिकांचे नुकसान झाले. संपूर्ण पीक आडवे झाले आहे. घोडपेठ व परिसरातील तिरवंजा, कवठी, कचराळा, गुंजाळा, चालबर्डी, चपराळा, निंबाळा या गावांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सध्या शेतातील हरभरा पीक काढणीला आलेले आहे. मात्र या अकाली पावसाने शेतकºयांचा हातचा घास हिरावला आहे. शासनाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी आहे.विटा व्यावसायिकांना फटकापोंभुर्णा : तालुक्यातील सर्वच भागात सोमवारी सायंकाळी ५ वाजता मेघगर्जना होवून जोरदार पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाचा सर्वाधिक फटका विटा व्यवसायिकांना बसला. शेतकºयांच्या शेतात असलेले मुंग, हरभरा व अन्य पीक यावर ताडपत्री न टाकल्याने प्रचंड नुकसान झाले. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विटा व्यवसाय चालतो. पावसामुळे विटाभट्टीत पाणी शिरले. यात त्यांचे मोठे नुकसान झाले.होळीच्या आनंदावर विरजणसोमवारी सर्वत्र होळीचा उत्साह होता. चंद्रपूरसह गावागावात या दिवशी सायंकाळी होलिका दहन केले जाते. यासाठी नागरिकांनी आपापल्या वार्डात सकाळपासून लाकडे गोळा करून आणली व होळी पेटविण्यासाठी रचून ठेवली होती. मात्र काही ठिकाणी दुपारी व काही ठिकाणी सायंकाळच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस आल्याने संपूर्ण लाकडे ओली झाली. अनेकांच्या होळी पेटविण्याच्या जागेवरही चिखलाचे साम्राज्य तयार झाले. पावसामुळे होळीच्या आनंदावर विरजण पडले.

टॅग्स :Socialसामाजिक