शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

टॉयलेट... उमेदवाराची एक उसनवारी कथा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:20 IST

राजकुमार चुनारकर चिमूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चिमूर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी शौचालयाची अट पूर्ण करण्यासाठी ...

राजकुमार चुनारकर

चिमूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चिमूर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी शौचालयाची अट पूर्ण करण्यासाठी उसनवारीची शक्कल लढविली आहे. शेजाऱ्याचे शौचालय वापरत असल्याचे स्वयंघोषणापत्राने दाखवून निवडणूक लढविण्याचा त्यांचा प्रयल आहे.

टॉयलेटच्या अटीने उसनवारीची नवी कथा तालुक्यात जन्माला आली आहे.

तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे धूमशान सुरू आहे. सरपंच निवड थेट जनतेतून होणार नसल्याने या निवडणुका अधिक चर्चेत आल्या आहेत. सरपंच पदासाठी आरक्षण गुलदस्त्यात असल्याने पॅनेलचीही संख्या कमी दिसून येत आहे. तर अनेक उमेदवाराचे स्वतंत्र लढण्याचे नियोजन सुरू आहे. सदस्य पदासाठी उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारापैकी बऱ्याच जणांकडे शौचालय नाही. निवडणूक लढविण्यासाठी सर्वच उमेदवारांना कागदपत्रांच्या सुमारे १८ अटींची पूर्तता करावी लागणार आहे. यामधील शौचालय ही प्रमुख अट आहे. सदस्य पदासाठी बळजबरीने उभ्या केलेल्या ज्या उमेदवाराकडे शौचालय नाही, अशांनी शेजाऱ्याकडे असणाऱ्या शौचालयाची उसनवारी करून निवडणुकीपुरती प्रशासनाच्या आदेशाचा फायदा घेण्यासाठी नामी शक्कल लढविली आहे. शेजाऱ्याचे शौचालय वापरत असल्याचे दाखविण्यासाठी स्वयंघोषणापत्र जोडले आहे. ते उमेदवारी अर्जासोबत जोडण्यात आले आहे. संबंधित उमेदवार खरोखरच शेजारच्याचे शौचालय वापरत असेल, तर हे करारपत्र यापूर्वी करणे आवश्यक होते. केवळ निवडणुकीची अट पूर्ण करण्यासाठी ते केले असेल, तर ते योग्य ठरणार का? हे अर्ज छाननी दिवशी स्पष्ट झाले आहे. शौचालय उसनवारीची लढविलेली नामी शक्कल ग्राह्य धरली गेलीच, तर निवडणुकीसाठी शौचालयाची अट का? घातली गेली आहे? हा प्रश्न निर्माण होत आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज छाननी करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये हे टॉयलेट उसनवारीचे असल्याचे उजेडात आले आहे. निवडणुकीसाठी उमेदवाराचे स्वत:चे शौचालय नसले तरी शेजाऱ्याचे, सार्वजनिक टॉयलेट चालेल, असे आदेश आहेत. त्यामुळे अनेकांनी याबाबतचे स्वयंघोषणापत्र अर्जासोबत जोडले आहे. त्यामुळे हा प्रकार उजेडात आला आहे. मात्र शासन अनेक वर्षांपासून हागणदारीमुक्त गाव योजना राबवीत आहे. तरी आजही गावपुढारी बनण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडे स्वतःच्या मालकीचे टॉयलेट नाही. तर ते गावाला हागणदारीमुक्त कसे करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.