शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

प्रवाशांकडून आरक्षणाला तिलाजंली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 5:00 AM

राज्य परिवहन महामंडळाने बसफेऱ्यामध्ये सीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र याबाबत पाहीजे त्या प्रमाणात जनजागृती झाली नाही. परंतु, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी काही प्रमाणात प्रवासी सीट आरक्षित करतात. परंतु, जवळच्या पल्ल्यामध्ये आरक्षित करीत नाही. बहुतांश चंद्रपूर येथून हैदराबाद, औरंगाबाद, अमरावती, नागपूर येथे जाण्यासाठी आरक्षण करीत असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देलांबच्या पल्ल्यात सहज उपलब्ध होते जागा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खासगी बसच्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेसुद्धा बसप्रवासासाठी आरक्षण सुरु केले. मात्र कोरोनामुळे प्रवाशांची संख्या घटली असल्याने हमखास सीट मिळते. त्यामुळे प्रवाशांकडून बस आरक्षित करण्याला तिलाजंली देण्यात येत आहे.राज्य परिवहन महामंडळाने बसफेऱ्यामध्ये सीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र याबाबत पाहीजे त्या प्रमाणात जनजागृती झाली नाही. परंतु, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी काही प्रमाणात प्रवासी सीट आरक्षित करतात. परंतु, जवळच्या पल्ल्यामध्ये आरक्षित करीत नाही. बहुतांश चंद्रपूर येथून हैदराबाद, औरंगाबाद, अमरावती, नागपूर येथे जाण्यासाठी आरक्षण करीत असल्याचे दिसून येते. मात्र मागील वर्षी कोरोनाने शिरकाव केल्याने बसफेऱ्या बंद होत्या. त्यानंतर ५० टक्के तत्वावर बसफेऱ्या सुरु करण्यात आल्या. रेल्वे बंद असल्याने लांबच्या पल्ल्यासाठी काही प्रमाणात सीट आरक्षित करण्यात येत होत्या. परिस्थीतीप पूर्वपदावर येत असतानाच जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढीस लागली. त्यामुळे आपोआपच प्रवाशांची संख्या घटली. त्यामुळे सीट आरक्षित करणाऱ्यांची संख्या घटली आहे. चंद्रपूर आगारातून हैदराबादसाठी काही प्रमाणात आरक्षण करण्यात येत असल्याचे दिसून येते.

नो वेटिंगकोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रवाशांची संख्या घटत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी पूर्वी आरक्षण बुकिंग होत होती. आता जाणारे प्रवासीच घटल्याने हमखास सीट मिळते या भावनेने प्रवशांतर्फे आरक्षण करताना दिसून येत नाही. तसेच बसमध्ये ट्रेनसारखा वेटिंगचा प्रकार बघावयास मिळत नाही. 

जिल्हाबाहेर जाणाऱ्यांची संख्या घटलीचंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या घटली आहे. परिस्थिती चांगली होईपर्यंत प्रवासी संख्या वाढण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे बसफेऱ्याही कमी झाल्या आहेत. 

बसेस रोजजिल्हा मुख्यालयातून विविध मार्गावर ८५ बसेसच्या माध्यमातून सुमारे ५०० फेऱ्याचे शेड्यूल सध्या सुरु आहे. यामध्ये ग्रामीण भागासह शहरी भागाचाही समावेश आहे.लांब पल्ल्याच्या बसफेऱ्यासाठी प्रवासी संख्या घटल्याने गाड्याही काही प्रमाणात कमी करण्यात आल्या आहेत. कोरोना काळात ग्रामीण भागात बंद करण्यात आलेल्या बसफेऱ्या अद्यापही सुरु करण्यात आल्या नाही.

 

टॅग्स :tourismपर्यटन