शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

गारपिटीसह वादळी पावसाने १३ गावांना झोडपले; पोंभूर्याला दुसऱ्यांदा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 15:32 IST

पाटण परिसरात सर्वाधिक नुकसान : वीज खांब कोसळले, अनेकांचे टिन पत्रे उडाली, गावे अंधारात

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णा/पाटण : आधीच्या नुकसानीतून सावरण्याआधीच गारपीटसह अवकाळी वादळी पावसाने सोमवारी (दि. २८) पोंभूर्णा तालुक्यातील दहा गावे आणि जिवती तालुक्यातील तीन अशा एकूण १३ गावांना झोडपले. वादळामुळे वीज खांब कोसळले, घरावरील टिन पत्रे उडाली. पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. वीज खंड झाल्याने रात्रभर अंधाराचा सामना करावा लागला.

दिवसभर कडक उन्ह निघाले. मात्र, सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले. दरम्यान, सोसाट्याचा वारा वाहू लागला. दरम्यान, गारांसह पावसाने झोडपल्याने मोठी तारांबळ उडाली. तालुक्यातील पोंभूर्णा, देवाडा खुर्द, जामतुकूम, जाम खुर्द, थेरगाव, वेळवा, चेक बल्लारपूर, आष्टा, सोनापूर, चिंतलधाबा या गावांना सर्वाधिक बसला. या भागातील शेतकऱ्यांनी मका लागवड केली. पिकाची स्थिती सध्या उत्तम असताना गारपिटीच्या तडाख्यात सापडल्याने नुकसान झाले आहे. घरांवरील टिन पत्रे उडाली. चेक पोंभूर्णा येथील एका घराचा वीज मीटर उखळला आहे.

या परिसरात पडला पाऊसदिवसभर उन्हाचा तडाखा बसल्यानंतर सायंकाळी अचानक पाऊस बरसला. त्यामुळे नागरिकांना मिळेल तिथे आडोसा घ्यावा लागला. धाबा व राजोली परिसरात विजांचा कडकडाट पाऊस पडला. ब्रह्मपुरीतही काही ठिकाणी तुरळक गारा पडल्या. तोहोगावात काहींची टिन पत्रे उडाली. पिंपळगाव भो., घोसरी व नांदगाव परिसरात पाऊस बरसला. गेवरा परिसरात गारपीट झाल्याची माहिती नागरिकांनी दिली.

छप्पर उडाल्याने धान्य भिजलेविरूर स्टेशन : विरूर परिसरात दुपारी ४:३० वाजता गारपीट झाल्याने अनेक घरांचे छप्पर उडाले. अन्नधान्य भिजून वाया गेले. झाडे उन्मळून पडली, खांबावर मोठे वृक्ष कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. विरूर येथील शांताराम नारनवरे, अशोका रेस्टॉरंट अॅण्ड बार, जगतसिंग वधावन, केळझर येथील दयाराम रामटेके, नारायण नारनवरे, मारोती कोडापे यांच्या घरांचे नुकसान झाले.

४६ घरांचे नुकसानजिवती तालुक्यातील पोचुगूडा येथील १६, टाटाकवड्यात १४ व गोंविदपुरातील १६ घरांना वादळा तडाखा बसला. वादळी पावसाने अनेकांचे संसार उघड्यावर आले. गोविंदपूर येथील मारुती बुरडकर, श्रीराम सूर्यवंशी, बंडू ठमके, संभाजी बुरेवाड, चंद्रकांत जाधव, माधव तुळशीराम, लक्ष्मण पिल्लेवाड, भीमराव मामीलवाड, मारुती मामीलवाड, विशाल रागेवाड, उत्तम पोले, बलवंत, सुशीलाबाई, प्रतिभा पोले, अरुण धुळगुंडे यांच्या घरांचे नुकसान झाले. टाटाकवडा येथील दीपक मलिलवार, शेषेराव पवार, भावराज मेकिले, कैलास वाढ, कुंदन मडावी, संदीप गुणशेट्टी, मारुती तारशेटे, सूर्यवंश कवडे, मारुती कवडे, चंद्रभागा मंडले, व्यंकटी गजीले, गोविंद कासले, तिरुपती यांच्याही घरांना पटका बसला. पोचुगुडा येथील काशीनाथ सूर्यवंशी, भाऊराव फुरसुंगी, नानाजी गेडाम, सिंधू कुरसंगे, माधव दूरशेट्टी, सुरेश आत्राम, पुष्पा कुळसंगे, रवींद्र आत्राम, पुरुषोत्तम आत्राम, लीला कुमरे, भीमराव आत्राम, विजय आत्राम, हनुमंतुमल्ला आत्राम, भीमराव मडावी, चंद्रभान फुरसुंगी यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले. प्रशासनाने पाहणी करून मदत द्यावी, अशी मागणी आहे

 

टॅग्स :Rainपाऊसchandrapur-acचंद्रपूर