शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

गारपिटीसह वादळी पावसाने १३ गावांना झोडपले; पोंभूर्याला दुसऱ्यांदा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 15:32 IST

पाटण परिसरात सर्वाधिक नुकसान : वीज खांब कोसळले, अनेकांचे टिन पत्रे उडाली, गावे अंधारात

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णा/पाटण : आधीच्या नुकसानीतून सावरण्याआधीच गारपीटसह अवकाळी वादळी पावसाने सोमवारी (दि. २८) पोंभूर्णा तालुक्यातील दहा गावे आणि जिवती तालुक्यातील तीन अशा एकूण १३ गावांना झोडपले. वादळामुळे वीज खांब कोसळले, घरावरील टिन पत्रे उडाली. पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. वीज खंड झाल्याने रात्रभर अंधाराचा सामना करावा लागला.

दिवसभर कडक उन्ह निघाले. मात्र, सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले. दरम्यान, सोसाट्याचा वारा वाहू लागला. दरम्यान, गारांसह पावसाने झोडपल्याने मोठी तारांबळ उडाली. तालुक्यातील पोंभूर्णा, देवाडा खुर्द, जामतुकूम, जाम खुर्द, थेरगाव, वेळवा, चेक बल्लारपूर, आष्टा, सोनापूर, चिंतलधाबा या गावांना सर्वाधिक बसला. या भागातील शेतकऱ्यांनी मका लागवड केली. पिकाची स्थिती सध्या उत्तम असताना गारपिटीच्या तडाख्यात सापडल्याने नुकसान झाले आहे. घरांवरील टिन पत्रे उडाली. चेक पोंभूर्णा येथील एका घराचा वीज मीटर उखळला आहे.

या परिसरात पडला पाऊसदिवसभर उन्हाचा तडाखा बसल्यानंतर सायंकाळी अचानक पाऊस बरसला. त्यामुळे नागरिकांना मिळेल तिथे आडोसा घ्यावा लागला. धाबा व राजोली परिसरात विजांचा कडकडाट पाऊस पडला. ब्रह्मपुरीतही काही ठिकाणी तुरळक गारा पडल्या. तोहोगावात काहींची टिन पत्रे उडाली. पिंपळगाव भो., घोसरी व नांदगाव परिसरात पाऊस बरसला. गेवरा परिसरात गारपीट झाल्याची माहिती नागरिकांनी दिली.

छप्पर उडाल्याने धान्य भिजलेविरूर स्टेशन : विरूर परिसरात दुपारी ४:३० वाजता गारपीट झाल्याने अनेक घरांचे छप्पर उडाले. अन्नधान्य भिजून वाया गेले. झाडे उन्मळून पडली, खांबावर मोठे वृक्ष कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. विरूर येथील शांताराम नारनवरे, अशोका रेस्टॉरंट अॅण्ड बार, जगतसिंग वधावन, केळझर येथील दयाराम रामटेके, नारायण नारनवरे, मारोती कोडापे यांच्या घरांचे नुकसान झाले.

४६ घरांचे नुकसानजिवती तालुक्यातील पोचुगूडा येथील १६, टाटाकवड्यात १४ व गोंविदपुरातील १६ घरांना वादळा तडाखा बसला. वादळी पावसाने अनेकांचे संसार उघड्यावर आले. गोविंदपूर येथील मारुती बुरडकर, श्रीराम सूर्यवंशी, बंडू ठमके, संभाजी बुरेवाड, चंद्रकांत जाधव, माधव तुळशीराम, लक्ष्मण पिल्लेवाड, भीमराव मामीलवाड, मारुती मामीलवाड, विशाल रागेवाड, उत्तम पोले, बलवंत, सुशीलाबाई, प्रतिभा पोले, अरुण धुळगुंडे यांच्या घरांचे नुकसान झाले. टाटाकवडा येथील दीपक मलिलवार, शेषेराव पवार, भावराज मेकिले, कैलास वाढ, कुंदन मडावी, संदीप गुणशेट्टी, मारुती तारशेटे, सूर्यवंश कवडे, मारुती कवडे, चंद्रभागा मंडले, व्यंकटी गजीले, गोविंद कासले, तिरुपती यांच्याही घरांना पटका बसला. पोचुगुडा येथील काशीनाथ सूर्यवंशी, भाऊराव फुरसुंगी, नानाजी गेडाम, सिंधू कुरसंगे, माधव दूरशेट्टी, सुरेश आत्राम, पुष्पा कुळसंगे, रवींद्र आत्राम, पुरुषोत्तम आत्राम, लीला कुमरे, भीमराव आत्राम, विजय आत्राम, हनुमंतुमल्ला आत्राम, भीमराव मडावी, चंद्रभान फुरसुंगी यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले. प्रशासनाने पाहणी करून मदत द्यावी, अशी मागणी आहे

 

टॅग्स :Rainपाऊसchandrapur-acचंद्रपूर