आठवडाभर जिल्ह्याला वादळाची भीती

By Admin | Updated: May 9, 2016 00:49 IST2016-05-09T00:49:07+5:302016-05-09T00:49:07+5:30

हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूरसह जिल्ह्याला गेल्या आठवडाभरापासून वादळाचा फटका बसत आहे.

Thunderstorms in the district during the week | आठवडाभर जिल्ह्याला वादळाची भीती

आठवडाभर जिल्ह्याला वादळाची भीती

मोठे नुकसान : बाष्पयुक्त समुद्रीवाऱ्याने वातावरणात बदल, तापमानात वाढ होण्याचा परिणाम
चंद्रपूर: हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूरसह जिल्ह्याला गेल्या आठवडाभरापासून वादळाचा फटका बसत आहे. विदर्भात तापमान वाढल्याने बाष्पयुक्त वारे आकर्षित होऊन वादळी स्थिती निर्माण होत असल्याची माहिती येथील खगोल अभ्यासक तथा ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुरेश चोपणे यांनी ‘लोकमत’ला दिली. आणखी आठवडाभर असेच वातावरण राहील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वातावरण आहे. सायंकाळ झाली की, अचानक वातावरणात बदल होेतो. आकाशात ढग दाटून सुसाट वादळाला सुरूवात होते. काही ठिकाणी पाऊस पडतो. कुठे गारपीट होते, तर कुठे केवळ वादळाचे तांडव असते. सातत्याने सुरू असलेल्या या वातावरण बदलाने नागरिकांच्या मनात भय निर्माण झाले आहे. सायंकाळी वादळ येण्याच्या भीतीने लोक घराबाहेरदेखील पडायला घाबरत आहेत. गेल्या अनेक वर्षानंतर जिल्ह्यात मे महिन्यामध्ये अशी स्थिती निर्माण झाली आहे. मध्यंतरी आलेले भीषण वादळ गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच पाहिल्याचे जाणकार सांगतात. गेल्या आठ दिवसांमध्ये झालेल्या वादळामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीला याचा सर्वाधिक फटका बसला. वीज वितरण कंपनीचे २० लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. गावागावांमध्ये घरांची पडझड होऊन अनेक संसार रस्त्यावर आलेत. काहींच्या घरावरील छपरे उडून गेलीत. जिल्ह्यात आणखी आठवडाभर अशी स्थिती राहणार असल्याचा अंदाज प्रा.चोपणे यांनी व्यक्त केला.
सूर्य सध्या डोक्यावर आहे. त्याची किरणे मध्य् ाप्रदेशाकडे वळल्यानंतर तापमान कमी होऊन वादळी वातावरण शमेल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)

विदर्भातील तापमान वाढल्यामुळे या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे समुद्राकडील बाष्पियुक्त वारे वाहू लागले आहेत. परिणामी वादळी स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती आठवडाभर राहण्याची शक्यता आहे. यापूर्वीसुद्धा उन्हाळभर ढगाळ वातावरण होते. अशी स्थिती कायम राहणे हे चांगल्या पावसासाठी व शेतीसाठी धोकादायक आहे.
-प्रा.सुरेश चोपण, संस्थापक अध्यक्ष ग्रीन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूर

Web Title: Thunderstorms in the district during the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.