शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
2
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
3
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
4
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
6
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
7
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
8
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
9
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
10
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
11
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
12
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
13
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
14
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
15
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
16
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
18
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
19
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
20
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?

गडीसुर्ला नळ योजनेला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 12:11 AM

ऑनलाईन लोकमतभेजगाव: बोरचांदली व परिसरातील १९ गावांकरिता लाखो रुपये खर्च करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली़ या योजनेचे मुख्य केंद्र गडिसुर्ला येथे आहे. मात्र, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली़ परिणामी, नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नाही़पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन शेतातून टाकण्यात आली़ ...

ठळक मुद्देहजारो लिटर पाणी व्यर्थ : जीवन प्राधिकरण अधिकाºयांचे दुर्लक्ष

ऑनलाईन लोकमतभेजगाव: बोरचांदली व परिसरातील १९ गावांकरिता लाखो रुपये खर्च करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली़ या योजनेचे मुख्य केंद्र गडिसुर्ला येथे आहे. मात्र, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली़ परिणामी, नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नाही़पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन शेतातून टाकण्यात आली़ शेतकरी पिकांना वाचविण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करतात़ पाईन लाईनलस गळती असल्याने पाण्यामध्ये मिसळण्याची शक्यता असते. शासनाने पाणी बचतीसाठी जनजागृती करीत आहे़ शहरांसह ग्रामीण भागात नळांना मीटर बसवून पाणी जपून वापरण्याचे संकेत दिले आहेत़ तर दुसरीकडे नळयोजनेची दुरूस्ती करण्यासाठी प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळ नाही, असे चित्र या परिसरात दिसून येत आहे़ यंदा अल्प पाऊस पडल्याने विहिरीतील पाण्याची पातळी खालावली़ काही ठिकाणी पाणी टंचाई सुरू झाल्याने महिला हैराण झाल्या आहेत़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने प्रादेशिक पाणी पुरवठा योजना योग्यरित्या सुरू ठेवल्यास १९ गावांतील नागरिकांची अडचण कायमची दूर होवू शकते़ मात्र, पाईप लाईनला शेकडो ठिकाणी गळती असल्याने यामधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाईपलाईनची दुरुस्ती झाली नाही, तर काही दिवसांत पाण्यासाठी हाहाकार निर्माण होवू शकतो़यासंदर्भात नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना कळविले आहे़ पण, अधिकाऱ्यांनी अद्याप घटनास्थळावर येवून पाहणी केली नाही़ पाईपलाईन गळती असलेल्या शेतात दिवस-रात्र पाणी वाया जात आहे़ नागरिकांकडून पाण्याचे देयक वेळेवर भरले जाते़ शासनाच्या सर्वच योजनांना सहकार्य करण्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली़ पण, केवळ अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे १९ गावांची पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली आहे़जिल्हा प्रशासन आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे दोन वर्षांपासून पाईपलाईनला गळती आहे़ यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. शिवाय, काही गावांत दूषित पाण्याचा पुरवठा होतो़ त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी ही समस्या तातडीने सोडवावी़- प्रकाश गांगरेड्डीवार, माजी सभापती पं.स. मूल