शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
2
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
3
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
4
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
5
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
6
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
7
टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या गड्याला कोहलीची आयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी कशी काय मिळाली?
8
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
9
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
10
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
11
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
12
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी
13
IPL 2025 Orange Cap Race : जे विराटला जमणार नाही ते सूर्याला सहज शक्य होईल, पण...
14
मामाच्या नावाने हगवणेंनी स्वतःचे खिसे भरले; कस्पटेंकडून रुखवतासाठी १ लाखांचा चेक अन् ५० हजार घेतले
15
Shubman Gill: हार्दिकसोबत मतभेद झाल्याच्या चर्चांवर गिलने सोडले मौन; इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले...
16
IPL Qualifier 2: आतापर्यंत फक्त ४ फलंदाजांनी साधलाय 'शतकी' डाव!
17
बापरे! मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेने क्लाएंटसोबत लावलं स्वत:च्या नवऱ्याचं लग्न, घेतले ७ लाख
18
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांचे वडील अयोध्येत येणार; राम लल्लांचे दर्शन घेणार
19
पोहताना दमछाक होऊन ४ शाळकरी मुलांचा तळ्यात बुडून मृत्यू; नातेवाईकांनी फोडला टाहो, चाकणमधील घटना
20
अवघ्या ३१ व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्याने केली होती आत्महत्या, गर्लफ्रेंडला पोलिसांनी ठोकलेल्या बेड्या

चिचडोह प्रकल्पामुळे भेंडाळावासीय तहानलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:01 IST

भेंडाळा गावाची लोकसंख्या तीन हजार आहे. चामोर्शी-मूल मार्गावर असलेल्या या गावापासून पाच किमी अंतरावर बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. ३५ ते ४० वर्षांपूर्वी शेतात विहीर खोदून ५० हजार लीटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली.

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या काळात पाणीटंचाई : नियोजनशून्यतेमुळे गावात समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : चिचडोह बॅरेजसाठी वैनगंगा नदीचे पाणी अडविल्याने चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा गावातील नळ पाणीपुरवठा योजना निकामी ठरली असून या गावात आठवड्यातून एक ते दोन दिवस पाणी पुरवठा होत आहे. ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्यतेमुळे लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.भेंडाळा गावाची लोकसंख्या तीन हजार आहे. चामोर्शी-मूल मार्गावर असलेल्या या गावापासून पाच किमी अंतरावर बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. ३५ ते ४० वर्षांपूर्वी शेतात विहीर खोदून ५० हजार लीटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. वाढती लोकसंख्या व पाण्याची गरज लक्षात घेऊन सात वर्षांपूर्वी वाघोली येथील वैनगंगा नदीवर वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ४० हजार लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात आली. दोन्ही योजना मिळून एकूण ९० हजार लिटर क्षमतेची नळ योजना आहे. सद्यस्थितीत नवीन वाढीव पाणी योजना सुरू असून या योजनेतून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. चिचडोह बॅरेजमध्ये पाणी अडविल्याने भेंडाळा येथील वैनगंगा नदीचा जलस्तर घटला आहे. त्यामुळे आठवड्यातून एक ते दोन दिवस गावातील नळाला पाणी येत आहे. अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने गावातील महिला, पुरूष, लहान मुले, मुली सार्वजनिक विहीर व हातपंपावर पाण्यासाठी गर्दी करीत आहेत. अशा स्थितीत ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी उपाययोजना करण्याची अपेक्षा गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.एप्रिल महिन्यात गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून वेळीच उपाययोजना केली नाही तर मे व जून महिन्यात मोठे पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या दोन महिन्यात तापमान वाढत असतो. ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करून पाणी समस्या मार्गी लावाव्या, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.वाढीव पाणी योजनेच्या इन्टेक वेलमध्ये नदीपात्रातून कमी प्रमाणात पाणी येत आहे. टाकीतील अल्प पाणी संपूर्ण गावाला एकाचवेळी पुरत नाही. त्यामुळे तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. जुन्या योजनेची मोटार नादुरूस्त असून तंटामुक्त समितीच्या निधीतून दुरूस्ती करण्याचा प्रस्ताव आहे. चिचडोह बॅरेजसाठी पाणी अडविल्याने इकडे परिणाम झाला आहे.- वनीता पोरेड्डीवार, सरपंच, ग्रा.पं.भेंडाळा

टॅग्स :water shortageपाणीकपात