बाधित तरुण हजाराच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST2020-08-28T05:00:00+5:302020-08-28T05:00:57+5:30
कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी दैनंदिन व्यवहारही सुरू राहणे आवश्यक आहे. मात्र कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे. मात्र समाजात वावरताना तरुणवर्ग बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. कोरोना वगैरे काही नाही, आपल्याला कोरोनाची बाधा होत नाही, अशा अविर्भावात अनेक तरुणमंडळी वावरताना दिसतात. त्यामुळे संपर्कातून त्यांनाच कोरोनाची अधिक बाधा होत आहे.

बाधित तरुण हजाराच्या उंबरठ्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाचा संसर्ग सध्या जिल्ह्यात झपाटाने वाढत आहे. विशेष म्हणजे हा संसर्ग तरुणांमगध्ये अधिक होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. वयांचा विचार केला तर १९ ते ४० या वयोगटातील बाधितांच्या संख्या हजाराच्या आसपास पोहचली आहे. या वयोगटात तब्बल ९८४ जण बाधित झाले आहे. एकूण १७९९ रुग्णांच्या तुलनेत ही टक्केवारी ६० टक्क्याहून अधिक आहे.
यावरून तरुणांनाच कोरोनाची अधिक बाधा होत असल्याने तरुणांनी आता गंभीर होणे गरजेचे झाले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी दैनंदिन व्यवहारही सुरू राहणे आवश्यक आहे. मात्र कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे. मात्र समाजात वावरताना तरुणवर्ग बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. कोरोना वगैरे काही नाही, आपल्याला कोरोनाची बाधा होत नाही, अशा अविर्भावात अनेक तरुणमंडळी वावरताना दिसतात. त्यामुळे संपर्कातून त्यांनाच कोरोनाची अधिक बाधा होत आहे. एकूण १७९९ रुग्णांपैकी ९८४ रुग्ण १९ ते ४० वयोगटातील आहेत. तरुणांनीच आतागंभीर होणे गरजेचे झाले आहे.
सोशल डिस्टन्सिंग गेले कुठे?
चंद्रपूर जिल्ह्यात काही प्रमाणात शिथिलता असली तरी सध्या लॉकडाऊन सुरूच आहे. छोटेमोठे दुकानात, प्रतिष्ठानामध्ये, हॉटेल्स व इतर ठिकाणी संबंधितांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे आवश्यक आहे. मात्र कोणत्याही प्रतिष्ठानांमध्ये याचे पालन होताना दिसत नाही. याशिवाय नागरिकही नियमांचे पालन करताना दिसत नाही.
मास्क नाकाच्या खाली
घराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेषता वाहतूक पोलीस या नियमांचे सक्ती पालन करायला भाग पाडत आहे. मात्र अनेकजण कारवाइच्या भीतीने मास्क वापरताना दिसत आहे. अनेकजणांना मास्क कसा घालावा, हेदेखील कळालेले नाही, असे दिसते. अनेकजण मास्क नाकाच्या खाली उतरवून ठेवतात. मात्र अशाने संसर्गाचा धोका टळत नाही.
१०८१ रुग्ण कोरोनामुक्त
जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या एक हजार १७९९ वर पोहोचली आहे. जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात अॅन्टिजेन चाचणी चालू असल्याने बाधितांची संख्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. मात्र यात समाधानाची बाब अशी की या आजारातून बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आतापर्यंत १०८१ बाधित उपचाराअंती बरे होऊन त्यांना सुटी देण्यात आली आहे. ही टक्केवारी ६० टक्क्याहून अधिक आहे.