शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 16:28 IST

Tiger Attack Three Womens in Chandrapur: चंद्रपुरात वाघाने एकाच वेळी चार महिलांवर हल्ला केला. यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, एक महिला गंभीर जखमी झाली.

चंद्रपुरात शनिवारी दुपारी वाघाच्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू झाला. तर, एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना सिंदेवाही वनपरिक्षेत्राजवळील मेंढमाळ गावातील जंगलात घडली. मृत महिला तेंदूची पाने गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघने एकाच वेळी तीन जणांना ठार केल्याची आणि एकाला जखमी केल्याची ही पहिलीच घटना आहे, अशी माहिती वन्यजीव अधिकाऱ्याने दिली. या हल्ल्यानंतर गावात दहशत निर्माण झाली असून वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली जात आहे.

कांताबाई चौधरी (वय, ५५), त्यांची सून शुभांगी चौधरी (वय, ३०) आणि सारिका शेंडे (वय, ५०) अशी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. सिंदेवाहीपासून ८ किमी अंतरावर असलेल्या डोणगाव बीटच्या कंपार्टमेंट क्रमांक १३५५ मध्ये या महिलांचे मृतदेह आढळले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले आणि जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. या घटनेची तपासणी करण्यासाठी वन विभाग परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहत आहे. तसेच नागरिकांना जंगल परिसरात जाऊ नये, असेही आवाहन करण्यात आले. वन विभागाने मृतांच्या कुटुंबियांना २५,००० रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली आहे.

विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रियाया घटनेवर स्थानिक आमदार आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 'या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या महिलांच्या मृत्युची जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल. आम्ही वारंवार या वाघांना दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याची मागणी केली. परंतु, अधिकाऱ्यांनी आमची विनंती गांभीर्याने घेतली नाही', असा आरोप त्यानी केला.

वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत १६ जण ठारमहाराष्ट्रात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात २२५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.यातील बहुतेक मृत्यू वाघांच्या हल्ल्यांमुळे झाले. चंद्रपुरात यावर्षी वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत १६ जणांचा मृत्युची नोंद करण्यात आली. गेल्या वर्षी वाघाच्या हल्ल्यात एकूण २७ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. २०२३ मध्ये ही संख्या २५ वर होती. २०२२ मध्ये वाघाच्या हल्ल्यात सर्वाधिक ५१ मृत्युची नोंद झाली. तज्ज्ञांचे मते, वन्यजीवांसाठी राहण्याची जागा कमी होत असल्याने अशा घटना वाढत आहेत. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रchandrapur-acचंद्रपूरTigerवाघ