शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 16:28 IST

Tiger Attack Three Womens in Chandrapur: चंद्रपुरात वाघाने एकाच वेळी चार महिलांवर हल्ला केला. यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, एक महिला गंभीर जखमी झाली.

चंद्रपुरात शनिवारी दुपारी वाघाच्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू झाला. तर, एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना सिंदेवाही वनपरिक्षेत्राजवळील मेंढमाळ गावातील जंगलात घडली. मृत महिला तेंदूची पाने गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघने एकाच वेळी तीन जणांना ठार केल्याची आणि एकाला जखमी केल्याची ही पहिलीच घटना आहे, अशी माहिती वन्यजीव अधिकाऱ्याने दिली. या हल्ल्यानंतर गावात दहशत निर्माण झाली असून वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली जात आहे.

कांताबाई चौधरी (वय, ५५), त्यांची सून शुभांगी चौधरी (वय, ३०) आणि सारिका शेंडे (वय, ५०) अशी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. सिंदेवाहीपासून ८ किमी अंतरावर असलेल्या डोणगाव बीटच्या कंपार्टमेंट क्रमांक १३५५ मध्ये या महिलांचे मृतदेह आढळले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले आणि जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. या घटनेची तपासणी करण्यासाठी वन विभाग परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहत आहे. तसेच नागरिकांना जंगल परिसरात जाऊ नये, असेही आवाहन करण्यात आले. वन विभागाने मृतांच्या कुटुंबियांना २५,००० रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली आहे.

विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रियाया घटनेवर स्थानिक आमदार आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 'या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या महिलांच्या मृत्युची जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल. आम्ही वारंवार या वाघांना दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याची मागणी केली. परंतु, अधिकाऱ्यांनी आमची विनंती गांभीर्याने घेतली नाही', असा आरोप त्यानी केला.

वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत १६ जण ठारमहाराष्ट्रात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात २२५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.यातील बहुतेक मृत्यू वाघांच्या हल्ल्यांमुळे झाले. चंद्रपुरात यावर्षी वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत १६ जणांचा मृत्युची नोंद करण्यात आली. गेल्या वर्षी वाघाच्या हल्ल्यात एकूण २७ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. २०२३ मध्ये ही संख्या २५ वर होती. २०२२ मध्ये वाघाच्या हल्ल्यात सर्वाधिक ५१ मृत्युची नोंद झाली. तज्ज्ञांचे मते, वन्यजीवांसाठी राहण्याची जागा कमी होत असल्याने अशा घटना वाढत आहेत. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रchandrapur-acचंद्रपूरTigerवाघ