शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 16:28 IST

Tiger Attack Three Womens in Chandrapur: चंद्रपुरात वाघाने एकाच वेळी चार महिलांवर हल्ला केला. यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, एक महिला गंभीर जखमी झाली.

चंद्रपुरात शनिवारी दुपारी वाघाच्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू झाला. तर, एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना सिंदेवाही वनपरिक्षेत्राजवळील मेंढमाळ गावातील जंगलात घडली. मृत महिला तेंदूची पाने गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघने एकाच वेळी तीन जणांना ठार केल्याची आणि एकाला जखमी केल्याची ही पहिलीच घटना आहे, अशी माहिती वन्यजीव अधिकाऱ्याने दिली. या हल्ल्यानंतर गावात दहशत निर्माण झाली असून वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली जात आहे.

कांताबाई चौधरी (वय, ५५), त्यांची सून शुभांगी चौधरी (वय, ३०) आणि सारिका शेंडे (वय, ५०) अशी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. सिंदेवाहीपासून ८ किमी अंतरावर असलेल्या डोणगाव बीटच्या कंपार्टमेंट क्रमांक १३५५ मध्ये या महिलांचे मृतदेह आढळले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले आणि जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. या घटनेची तपासणी करण्यासाठी वन विभाग परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहत आहे. तसेच नागरिकांना जंगल परिसरात जाऊ नये, असेही आवाहन करण्यात आले. वन विभागाने मृतांच्या कुटुंबियांना २५,००० रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली आहे.

विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रियाया घटनेवर स्थानिक आमदार आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 'या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या महिलांच्या मृत्युची जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल. आम्ही वारंवार या वाघांना दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याची मागणी केली. परंतु, अधिकाऱ्यांनी आमची विनंती गांभीर्याने घेतली नाही', असा आरोप त्यानी केला.

वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत १६ जण ठारमहाराष्ट्रात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात २२५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.यातील बहुतेक मृत्यू वाघांच्या हल्ल्यांमुळे झाले. चंद्रपुरात यावर्षी वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत १६ जणांचा मृत्युची नोंद करण्यात आली. गेल्या वर्षी वाघाच्या हल्ल्यात एकूण २७ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. २०२३ मध्ये ही संख्या २५ वर होती. २०२२ मध्ये वाघाच्या हल्ल्यात सर्वाधिक ५१ मृत्युची नोंद झाली. तज्ज्ञांचे मते, वन्यजीवांसाठी राहण्याची जागा कमी होत असल्याने अशा घटना वाढत आहेत. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रchandrapur-acचंद्रपूरTigerवाघ