शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

होम आयसोलेशनमध्ये तीन हजार ५४१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 05:00 IST

गृह विलगिकरणाबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णास कोविडची लक्षणे नाहीत किंवा अति सौम्य लक्षणे असल्याचे व याबरोबरच रुग्णास इतर गंभीर आजार नसल्याचे (कोमॉर्बिडिटी) डॉक्टरांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. संबंधित रुग्णाच्या घरी त्याच्या विलगिकरणासाठी तसेच कुटुंबातील इतर व्यक्तींकरिता अलगीकरणासाठी (होम क्वारंटाईन) योग्य सोई सुविधा व घरी दिवसरात्र काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असावी.

ठळक मुद्देताण कमी : चंद्रपुरात सर्वाधिक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये

लोकमत न्युज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा संसर्ग कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. मागील दोन महिन्यात जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढली. रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयात खाटा कमी पडू लागल्या. अशातच आरोग्य विभागाने रुग्णांसमोर होम आयसोलेशनचा पर्याय ठेवला. याचा हजारो रुग्ण लाभ घेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार ५४१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत. यातील काही जण कोरोनातून मुक्तही झाले आहेत. चंद्रपूर शहरातील १७३० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. बल्लारपूर तालुक्यातील ३३०, राजुरा ८८, कोरपना ८२, जिवती १, गोंडपिंपरी २७, मूल ३३०, सावली २२, नागभीड १७४, सिंदेवाही २, ब्रह्मपुरी २३६, चिमूर ११९, वरोरा १५६, भद्रावती तालुक्यातील २५४ रुग्ण घरीच राहून कोरोनावर उपचार घेत आहेत. गरजू रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध व्हावे व त्यासोबतच योग्य व्यवस्थापनाद्वारे आजाराचे संक्रमण खंडित व्हावे, यासाठी आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार शासनाने गृह विलगीकरण (होम आयसोलेशन) हा सक्षम पर्याय उपलब्ध करुन दिला असून त्यासाठी रुग्णांनी व त्याच्या नातेवाईकांनी पूर्ण सहकार्य करणे अपेक्षित आहे. वास्तविक पाहता कोविडची लागण झालेल्या साधारण ६० ते ७० टक्के रुग्णांना कोणतेही लक्षणे दिसून येत नाही किंवा अतिशय सौम्य लक्षणे आढळतात. अशा रुग्णांना कोविड रुग्णालयात तातडीने भरती होण्याची गरज भासत नाही. असे रुग्ण डॉक्टरांनी परवानगी दिली तर घरीच विलगीकरणात राहून स्वयंम देखरेख व योग्य औषध उपचाराने बरे होऊ शकतात. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी तीन हजार ५११ रुग्णांनी घरीच राहून उपचार घेतला आहे. यातील अनेक रुग्ण आता कोरोनातून बरेही झाले आहेत. 

अशा आहेत अटीगृह विलगिकरणाबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णास कोविडची लक्षणे नाहीत किंवा अति सौम्य लक्षणे असल्याचे व याबरोबरच रुग्णास इतर गंभीर आजार नसल्याचे (कोमॉर्बिडिटी) डॉक्टरांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. संबंधित रुग्णाच्या घरी त्याच्या विलगिकरणासाठी तसेच कुटुंबातील इतर व्यक्तींकरिता अलगीकरणासाठी (होम क्वारंटाईन) योग्य सोई सुविधा व घरी दिवसरात्र काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असावी. संबंधित काळजी वाहू व्यक्ती व उपचार देणारे रुग्णालय यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था (दुरध्वनी/मोबाईल) उपलब्ध असणे अनिवार्य आहे. आरोग्य सेतू अप डाऊनलोड करणे आवश्यक आहे.

गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारत असलेल्या रुग्णांनी, त्यांच्या नातेवाईकांनी व त्यांना सेवा देत असलेल्या डॉक्टरांनी ही एक सामाजिक जाबाबदारी व कर्तव्य समजून प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करावे. पात्र रुग्णांनी गृह विलगिकरणात असताना आपल्या कुटुंबीयांना कोरोना संसर्ग होणार नाही, याची पुर्णपणे दक्षता घ्यावी.-अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी,चंद्रपूर.

 

डाॅक्टरांचे रुग्णावर असते बारिक लक्ष

होम आयसोलेशनमध्ये रुग्णांवर संबंधित डाॅक्टरांना बारिक लक्ष द्यावे लागते. दररोज रुग्णांशी मोबाईलवरून ते संपर्क साधतात. ऑक्सीमीटरची रिडींग तपासतात. त्यावरून रुग्णांवर उपचार केला जातो.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या