शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रत्नागिरीतील रिफायनरीचे तीन तुकडे; एक युनिट विदर्भात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 08:05 IST

चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले श्री पुरी यांच्यासमोर वेदने विदर्भात रिफायनरी प्रकल्प उभारण्याविषयी सादरीकरण केले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोकणातील रत्नागिरीत होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्पाचे त्रिभाजन करून त्यापैकी एक युनिट विदर्भात उभारले जाऊ शकेल, असे संकेत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी गुरुवारी विदर्भ इकॉनाॅमिक डेव्हलपेंट कौन्सिल (वेद)च्या शिष्टमंडळाशी बाेलताना दिले. परिणामी, बारसू येथे होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला नवे वळण मिळाले आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले श्री पुरी यांच्यासमोर वेदने विदर्भात रिफायनरी प्रकल्प उभारण्याविषयी सादरीकरण केले. अंदाजे चार लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या या प्रकल्पाची क्षमता वर्षाला ६० दशलक्ष टन (एमटीपीए) आहे. स्थानिक पातळीवर होणारा विरोध लक्षात घेता त्या प्रकल्पाचे प्रत्येकी २० एमटीपीए क्षमतेचे तीन भाग करून त्यापैकी प्रत्येकी एक युनिट रत्नागिरी व नागपूर येथे उभारण्याबाबत विचार होऊ शकेल, असे ना. पुरी यांनी शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी वेदचे  कोषाध्यक्ष नवीन मालेकर, जे. एस. साळवे, चंद्रपूर एमआयडीसीचे अध्यक्ष मधुसूदन रुंगटा उपस्थित होते.

विदर्भात उद्योगांचा अभाव असला तरी कोळसा खाणी व उद्योगपूरक संसाधनांची मोठी उपलब्धता आहे. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प विदर्भात उभारणे कसे शक्य आहे, यासंदर्भात आम्ही सखोल अभ्यास करून केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांच्यासमोर सादरीकरण केले. विदर्भाची मौलिकता लक्षात घेऊन रिफायनरी प्रकल्प विदर्भात उभारण्याची ग्वाही आम्हाला दिली.     - प्रदीप माहेश्वरी, उपाध्यक्ष, विदर्भ इकॉनाॅमिक डेव्हलपेंट कौन्सिल (वेद), नागपूर

२५ हजार रोजगार शक्य विदर्भात २० एमटीपीए क्षमतेचा रिफायनरी प्रकल्प उभारल्यास सुमारे दीड लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. ही गुंतवणूक विदर्भाच्या विकासासाठी उपयोगी ठरणार आहे. रिफायनरी प्रकल्पामुळे २५ हजार व्यक्तींना थेट, तर एक ते दीड लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. वेदने २०२१ मध्ये प्रकल्पाबाबत तत्कालीन पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रकल्प अहवाल व निवेदन  सादर केले होते. त्याच्या प्रती ना. पुरी यांना देत जुन्या प्रस्तावाचे स्मरण केले.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरRatnagiriरत्नागिरीNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्प