तीन महिन्यांपासून रुंदीकरणाचे काम रखडले

By Admin | Updated: June 11, 2014 23:53 IST2014-06-11T23:53:32+5:302014-06-11T23:53:32+5:30

राजुरा तालुक्यातील विरुर येथील बसस्थानकापासून मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावावर तीन महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन

For three months, the work of widening | तीन महिन्यांपासून रुंदीकरणाचे काम रखडले

तीन महिन्यांपासून रुंदीकरणाचे काम रखडले

विरुर (स्टे.) : राजुरा तालुक्यातील विरुर येथील बसस्थानकापासून मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावावर तीन महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंत्राटदार आपल्या मर्जीनेच काम करीत असल्याने कामात गैरव्यवहार होत असल्याचे बोलले जात आहे.
पावसाळा लवकरच सुरु होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे खोदकाम केलेल्या खड्यात पाणी साचणार आहे. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.गावाचा विकास हा त्या गावातील रस्त्यावर अवलंबून असतो. स्वच्छ व सुंदर रस्त्यावरुनच गावाची चांगली-वाईट ओळख ठरते. मात्र विरुर गावाच्या रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. बसस्थानकाजवळ सौंदर्यीकरण व रुंदीकरणाच्या नावावर रस्त्याच्या कडेला खोदकाम केल्याने वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. खोदलेल्या खड््यात पाणी साचल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. गावात हिवताप, मलेरिया, साथीच्या रुग्णांत वाढ होत आहे. तसेच रस्त्याच्या एका बाजूला खोदकाम केल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
आमदार निधीतून मुख्य रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरण करण्याकरिता निधी प्राप्त झाला. सदर काम राजुरा येथील एका कंत्राटदाराकडे देण्यात आले आहे. रस्त्याच्या एकिकडे कंत्राटदाराने मनमर्जीने रुंदीकरणाचे काम न्सिुरु केले आहे. सदर काम इस्टीमेट नुसार होत नसल्याचे नागरिकात बोलले जात आहे.
रस्त्याच्या दुसरीकडील बाजूचे खोदकाम करताना जेसीपीने मुख्य पाण्याची पाईप लाईन फोडली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. खोदकाम करुन तीन महिन्याचा कालावधी उलटला तरी रस्त्याचे बांधकाम अजूनही अपूर्ण आहे. काम रखडण्याचे कारण अजूनही गावकऱ्यांना समजले नाही. सर्वाधिक वर्दळ असलेल्या बस स्थानक चौकाची अवस्था गंभीर असल्याने नागरिकांना पायी चालनेही कठीण झाले आहे. बसस्थानकाजवळळ सौंदर्यकरण व रुंदीकरणाच्या नावावर रस्त्याच्या कडेला खोदकाम केलेले बांधकाम त्वरित करावे व काम कशामुळे रखडले याची वरिष्ठ रस्त्यावरुन चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. (वार्ताहर)

Web Title: For three months, the work of widening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.