तीन आमदारांसह जि.प. अध्यक्ष बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 06:00 IST2019-11-05T06:00:00+5:302019-11-05T06:00:39+5:30
संपूर्ण खरिप हंगाम हातून गेला आहे. या पार्श्वभूमीवर चिमूरचे आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार व वरोºयाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळेही यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.

तीन आमदारांसह जि.प. अध्यक्ष बांधावर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. संपूर्ण खरिप हंगाम हातून गेला आहे. या पार्श्वभूमीवर चिमूरचे आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार व वरोºयाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळेही यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी सर्व आमदारांनी आपल्या क्षेत्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना पिकांचे सर्व्हेक्षण करून तातडीने आपादग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे निर्देश दिले.
बंटी भांगडियांनी दिले तत्काळ पंचनाम्याचे निर्देश
नागभीड : चिमूरचे आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांनी नागभीड तालुक्यातील पिकांची पाहणी करून झालेल्या या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. नागभीड तालुक्यात जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक घेतल्या जाते. अवकाळी पावसाने नागभीड तालुक्यातील धान पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले.
याबाबतची माहिती आमदार भांगडिया यांना मिळताच सोमवारी पारडी, मिंडाळा जि.प.प्रभागातील देवपायली, बाळापूर या गावातील शिवारात जाऊन नुकसानीची पाहणी केली. ही पाहणी करीत असतांना नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, कोणताही शेतकरी नुकसानीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाºयांना दिल्या.
किशोर जोरगेवारही पोहचले शेतात
चंद्रपूर : चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात जाऊन शेतपिकांची पाहणी केली. यावेळी नूकसानग्रस्त शेत पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. शेतकºयांना प्रति हेक्टर २५ हजार रुपयांचा मोबदला देण्याची मागणी आमदार जोरगेवार यांनी केली. जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचीही भेट घेऊन शेतकऱ्यांची व्यथा त्यांच्यापुढे मांडली. यावेळी मारडाचे सरपंच भारती कूडे, उसगाव सरपंच निवीता ठाकरे, धानोरा सरपंच छाया वासाडे, दाताळाचे सरपंच रविंद्र लोनगाडगे, पांढरकवडा सरपंच सुरेश तोतडे यांच्यासह गावकऱ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. प्रत्यक्ष शेताच्या बांधावर गेल्यानंतर आमदार जोरगेवार यांनी शेतकºयांशी चर्चा केली.