शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

कवितेमधला थॉट महत्त्वाचा असतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:26 IST

भद्रावती : ज्या कवितांना किंवा एकूणच कुठल्याही प्रकारच्या साहित्याला वैचारिक पाया नसतो, ते साहित्य कितीही संख्येने निर्माण ...

भद्रावती : ज्या कवितांना किंवा एकूणच कुठल्याही प्रकारच्या साहित्याला वैचारिक पाया नसतो, ते साहित्य कितीही संख्येने निर्माण झाले तरी काळाच्या प्रवाहात वाहून जाते. संत काव्याला त्यांचा एक वैचारिक पाया होता. त्यामुळे काळाच्या ओघातही संत साहित्य टिकून राहिले व ते साहित्य वैश्विक ठरले. थॉटफुल असलेली कबिराची कविता, नामदेव, जनाबाई, तुकारामाची कविता या संतांच्या कवितांना वैचारिक पाया असल्यामुळेच चिरंजीव व चिरंतन ठरल्या, असे प्रतिपादन स्मृतिगंध काव्य संमेलनात डॉ. विद्याधर बनसोड यांनी केले.

स्वर्गीय वीणा आडेकर स्मृती प्रतिष्ठान भद्रावतीच्या वतीने स्थानिक मुरलीधर पाटील गुंडावार सभागृह येथे आयोजित चौथ्या स्मृतिगंध काव्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात संमेलनाध्यक्ष पदावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आचार्य ना. गो. थुटे व पंचायत समिती भद्रावतीचे सभापती प्रवीण ठेंगणे उपस्थित होते.

कोविड १९ दिवंगत योद्धांच्या स्मृतीस समर्पित असलेल्या या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते पुढे म्हणाले, कोरोनाने आपल्याला एक गोष्ट शिकवली की कोणताही देव माणसाच्या मदतीला येत नाही तर माणूसच माणसाच्या मदतीला धावून जातो आणि माणूस माणसाच्या मदतीला माणूस म्हणून धावून येणे हे उच्च संस्कृतीचे लक्षण आहे. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात संमेलनाध्यक्ष डॉक्टर विद्याधर बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कविसंमेलन पार पडले. सर्वच कवींनी आशयघन कवितांच्या सादरीकरणातून या कविसंमेलनात रंगत भरली. मंगेश जनबंधू यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

बॉक्स

या साहित्याचे झाले लोकार्पण

उद्घाटन सत्रात डॉक्टर विद्याधर बनसोड लिखित प्रश्न पाणी बदलण्याचा(कवितासंग्रह), पिलांटू(बालकादंबरी), कोर कोंडा(कादंबरी), मयताचे कपडे(कथासंग्रह), आमची थायलंड वारी (प्रवास वर्णन), तथागताचे दृष्टांत या साहित्यकृतींचा लोकार्पण सोहळा पार पडला.