शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली...
3
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
4
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
5
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
6
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
7
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
8
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
9
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
10
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
11
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
12
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
13
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
14
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
15
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
16
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
17
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
18
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
19
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
20
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...

कवितेमधला थॉट महत्त्वाचा असतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:26 IST

भद्रावती : ज्या कवितांना किंवा एकूणच कुठल्याही प्रकारच्या साहित्याला वैचारिक पाया नसतो, ते साहित्य कितीही संख्येने निर्माण ...

भद्रावती : ज्या कवितांना किंवा एकूणच कुठल्याही प्रकारच्या साहित्याला वैचारिक पाया नसतो, ते साहित्य कितीही संख्येने निर्माण झाले तरी काळाच्या प्रवाहात वाहून जाते. संत काव्याला त्यांचा एक वैचारिक पाया होता. त्यामुळे काळाच्या ओघातही संत साहित्य टिकून राहिले व ते साहित्य वैश्विक ठरले. थॉटफुल असलेली कबिराची कविता, नामदेव, जनाबाई, तुकारामाची कविता या संतांच्या कवितांना वैचारिक पाया असल्यामुळेच चिरंजीव व चिरंतन ठरल्या, असे प्रतिपादन स्मृतिगंध काव्य संमेलनात डॉ. विद्याधर बनसोड यांनी केले.

स्वर्गीय वीणा आडेकर स्मृती प्रतिष्ठान भद्रावतीच्या वतीने स्थानिक मुरलीधर पाटील गुंडावार सभागृह येथे आयोजित चौथ्या स्मृतिगंध काव्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात संमेलनाध्यक्ष पदावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आचार्य ना. गो. थुटे व पंचायत समिती भद्रावतीचे सभापती प्रवीण ठेंगणे उपस्थित होते.

कोविड १९ दिवंगत योद्धांच्या स्मृतीस समर्पित असलेल्या या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते पुढे म्हणाले, कोरोनाने आपल्याला एक गोष्ट शिकवली की कोणताही देव माणसाच्या मदतीला येत नाही तर माणूसच माणसाच्या मदतीला धावून जातो आणि माणूस माणसाच्या मदतीला माणूस म्हणून धावून येणे हे उच्च संस्कृतीचे लक्षण आहे. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात संमेलनाध्यक्ष डॉक्टर विद्याधर बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कविसंमेलन पार पडले. सर्वच कवींनी आशयघन कवितांच्या सादरीकरणातून या कविसंमेलनात रंगत भरली. मंगेश जनबंधू यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

बॉक्स

या साहित्याचे झाले लोकार्पण

उद्घाटन सत्रात डॉक्टर विद्याधर बनसोड लिखित प्रश्न पाणी बदलण्याचा(कवितासंग्रह), पिलांटू(बालकादंबरी), कोर कोंडा(कादंबरी), मयताचे कपडे(कथासंग्रह), आमची थायलंड वारी (प्रवास वर्णन), तथागताचे दृष्टांत या साहित्यकृतींचा लोकार्पण सोहळा पार पडला.