शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

महाराष्ट्र-तेलंगणा सीमावादातील 'ती' १४ गावे चंद्रपूर जिल्ह्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:09 IST

महसूल मंत्र्यांची माहिती : विधानभवनात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तेलंगणाच्या सीमावादात अडकलेल्या जिवती तालुक्यातील १४ मराठी गावे लवकरच महाराष्ट्रात समाविष्ट होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून, यावर अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (दि. १४) विधानभवनातील दालनात झालेल्या बैठकीत दिली. बैठकीला राजुराचे आमदार देवराज भोंगळे, जिल्हाधिकारी विनय गौडा व जिवती तालुक्यातील १४ गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून ही गावे सीमावादामुळे तेलंगणात की महाराष्ट्रात, या संभ्रमात होती. यामुळे प्रशासन, सुविधा, विकास योजनांचा लाभयाबाबतीत गावांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र आता मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे हा जुना व वादग्रस्त प्रश्न कायमचा निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १९७८मध्ये आंध्र प्रदेश व महाराष्ट्र राज्यांनी आपापल्या सीमा आखल्या होत्या. दरम्यान, १९८० सीमावाद सुरू झाला. दोन्ही राज्यांनी १८ फेब्रुवारी १९८३ रोजी एक समिती नेमून नागरिकांचे नोंदविले. तेव्हा सर्वांनी महाराष्ट्रातच राहायचे, असे ठामपणे सांगितले. ७ जुलै १९९० रोजी १४ गावे आंध्र प्रदेश सरकारला देण्याचा शासन निर्णय जारी होताच येथील मराठी नागरिकांनी तीव्र विरोध बयान केला. परिणामी, ५ ऑगस्ट १९९३ रोजी महाराष्ट्र शासनाने यावर स्थगिती आणली. दरम्यान, आंध्र प्रदेश सरकार ३ एप्रिल १९९६ रोजी हैदराबाद उच्च न्यायालयात गेले. महाराष्ट्रानेही ३० एप्रिल १९९६ रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. ए. एच. अहमदी, न्या. झाकीर अहमद, न्या. कृपाल सिंग यांच्या खंडपीठाने १७ जुलै १९९७ रोजी निर्णय देत १४ गावे महाराष्ट्राची आहेत. त्यावर आंध्र प्रदेशचा अधिकार नाही, हे स्पष्ट केले होते. मात्र, राज्य विभाजनानंतर तेलंगणा सरकार या गावांना काही सुविधा पुरवून आपला ताबा असल्याचा प्रयत्न करीत आहे.

वर्ग दोन जमिनींना एकचा दर्जा मिळणारराजुरातील सर्वे १ ते ८मधील वर्ग दोनच्या जमिनींना विनामूल्य वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. जिवतीतील कोतवालांच्या रिक्त पद भरतीचा प्रस्ताव मंजूर करण्याचा आदेशही बावनकुळे यांनी दिला.

...ही आहेत गावेपरमडोली, मुकदमगुडा, कोठा (बुज), महाराजगुडा, अंतापूर, येसापूर, लेंडीगुडा, पळसगुडा ही आठ गावे व परमडोली तांडा, लेंडीजाळा, शंकरलोधी, पद्मावती, इंदिरानगर, भोलापठार ही सहा पाडे, अशी एकूण १४ गावे महाराष्ट्र-तेलंगणा राज्यांच्या सीमावादात अडकली आहेत.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेTelanganaतेलंगणा