शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

महाराष्ट्र-तेलंगणा सीमावादातील 'ती' १४ गावे चंद्रपूर जिल्ह्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:09 IST

महसूल मंत्र्यांची माहिती : विधानभवनात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तेलंगणाच्या सीमावादात अडकलेल्या जिवती तालुक्यातील १४ मराठी गावे लवकरच महाराष्ट्रात समाविष्ट होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून, यावर अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (दि. १४) विधानभवनातील दालनात झालेल्या बैठकीत दिली. बैठकीला राजुराचे आमदार देवराज भोंगळे, जिल्हाधिकारी विनय गौडा व जिवती तालुक्यातील १४ गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून ही गावे सीमावादामुळे तेलंगणात की महाराष्ट्रात, या संभ्रमात होती. यामुळे प्रशासन, सुविधा, विकास योजनांचा लाभयाबाबतीत गावांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र आता मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे हा जुना व वादग्रस्त प्रश्न कायमचा निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १९७८मध्ये आंध्र प्रदेश व महाराष्ट्र राज्यांनी आपापल्या सीमा आखल्या होत्या. दरम्यान, १९८० सीमावाद सुरू झाला. दोन्ही राज्यांनी १८ फेब्रुवारी १९८३ रोजी एक समिती नेमून नागरिकांचे नोंदविले. तेव्हा सर्वांनी महाराष्ट्रातच राहायचे, असे ठामपणे सांगितले. ७ जुलै १९९० रोजी १४ गावे आंध्र प्रदेश सरकारला देण्याचा शासन निर्णय जारी होताच येथील मराठी नागरिकांनी तीव्र विरोध बयान केला. परिणामी, ५ ऑगस्ट १९९३ रोजी महाराष्ट्र शासनाने यावर स्थगिती आणली. दरम्यान, आंध्र प्रदेश सरकार ३ एप्रिल १९९६ रोजी हैदराबाद उच्च न्यायालयात गेले. महाराष्ट्रानेही ३० एप्रिल १९९६ रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. ए. एच. अहमदी, न्या. झाकीर अहमद, न्या. कृपाल सिंग यांच्या खंडपीठाने १७ जुलै १९९७ रोजी निर्णय देत १४ गावे महाराष्ट्राची आहेत. त्यावर आंध्र प्रदेशचा अधिकार नाही, हे स्पष्ट केले होते. मात्र, राज्य विभाजनानंतर तेलंगणा सरकार या गावांना काही सुविधा पुरवून आपला ताबा असल्याचा प्रयत्न करीत आहे.

वर्ग दोन जमिनींना एकचा दर्जा मिळणारराजुरातील सर्वे १ ते ८मधील वर्ग दोनच्या जमिनींना विनामूल्य वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. जिवतीतील कोतवालांच्या रिक्त पद भरतीचा प्रस्ताव मंजूर करण्याचा आदेशही बावनकुळे यांनी दिला.

...ही आहेत गावेपरमडोली, मुकदमगुडा, कोठा (बुज), महाराजगुडा, अंतापूर, येसापूर, लेंडीगुडा, पळसगुडा ही आठ गावे व परमडोली तांडा, लेंडीजाळा, शंकरलोधी, पद्मावती, इंदिरानगर, भोलापठार ही सहा पाडे, अशी एकूण १४ गावे महाराष्ट्र-तेलंगणा राज्यांच्या सीमावादात अडकली आहेत.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेTelanganaतेलंगणा