शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

महाराष्ट्र-तेलंगणा सीमावादातील 'ती' १४ गावे चंद्रपूर जिल्ह्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:09 IST

महसूल मंत्र्यांची माहिती : विधानभवनात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तेलंगणाच्या सीमावादात अडकलेल्या जिवती तालुक्यातील १४ मराठी गावे लवकरच महाराष्ट्रात समाविष्ट होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून, यावर अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (दि. १४) विधानभवनातील दालनात झालेल्या बैठकीत दिली. बैठकीला राजुराचे आमदार देवराज भोंगळे, जिल्हाधिकारी विनय गौडा व जिवती तालुक्यातील १४ गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून ही गावे सीमावादामुळे तेलंगणात की महाराष्ट्रात, या संभ्रमात होती. यामुळे प्रशासन, सुविधा, विकास योजनांचा लाभयाबाबतीत गावांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र आता मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे हा जुना व वादग्रस्त प्रश्न कायमचा निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १९७८मध्ये आंध्र प्रदेश व महाराष्ट्र राज्यांनी आपापल्या सीमा आखल्या होत्या. दरम्यान, १९८० सीमावाद सुरू झाला. दोन्ही राज्यांनी १८ फेब्रुवारी १९८३ रोजी एक समिती नेमून नागरिकांचे नोंदविले. तेव्हा सर्वांनी महाराष्ट्रातच राहायचे, असे ठामपणे सांगितले. ७ जुलै १९९० रोजी १४ गावे आंध्र प्रदेश सरकारला देण्याचा शासन निर्णय जारी होताच येथील मराठी नागरिकांनी तीव्र विरोध बयान केला. परिणामी, ५ ऑगस्ट १९९३ रोजी महाराष्ट्र शासनाने यावर स्थगिती आणली. दरम्यान, आंध्र प्रदेश सरकार ३ एप्रिल १९९६ रोजी हैदराबाद उच्च न्यायालयात गेले. महाराष्ट्रानेही ३० एप्रिल १९९६ रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. ए. एच. अहमदी, न्या. झाकीर अहमद, न्या. कृपाल सिंग यांच्या खंडपीठाने १७ जुलै १९९७ रोजी निर्णय देत १४ गावे महाराष्ट्राची आहेत. त्यावर आंध्र प्रदेशचा अधिकार नाही, हे स्पष्ट केले होते. मात्र, राज्य विभाजनानंतर तेलंगणा सरकार या गावांना काही सुविधा पुरवून आपला ताबा असल्याचा प्रयत्न करीत आहे.

वर्ग दोन जमिनींना एकचा दर्जा मिळणारराजुरातील सर्वे १ ते ८मधील वर्ग दोनच्या जमिनींना विनामूल्य वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. जिवतीतील कोतवालांच्या रिक्त पद भरतीचा प्रस्ताव मंजूर करण्याचा आदेशही बावनकुळे यांनी दिला.

...ही आहेत गावेपरमडोली, मुकदमगुडा, कोठा (बुज), महाराजगुडा, अंतापूर, येसापूर, लेंडीगुडा, पळसगुडा ही आठ गावे व परमडोली तांडा, लेंडीजाळा, शंकरलोधी, पद्मावती, इंदिरानगर, भोलापठार ही सहा पाडे, अशी एकूण १४ गावे महाराष्ट्र-तेलंगणा राज्यांच्या सीमावादात अडकली आहेत.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेTelanganaतेलंगणा