शहरं
Join us  
Trending Stories
1
'संशयित आरोपी जरांगेंचे कार्यकर्ते'; या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची धनंजय मुंडेंची मागणी
2
भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत!
3
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
4
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
5
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
6
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
7
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
8
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
9
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
10
Supreme Court: भटक्या कुत्र्यांवरील निर्णय ऐकून महिला वकील कोर्टातच ढसाढसा रडली, म्हणाली...
11
‘काँग्रेसम्हणजेच मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजेच काँग्रेस’, रेवंत रेड्डीच्या विधानावरून वाद 
12
घर नावावर कर म्हणत युट्यूबरने आईला मारहाण केली; व्हिडीओही झाला व्हायरल! कोण आहे वंशिका हापूर?
13
Lenskart IPO: लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?
14
Samudra Shastra: दातात फट असणारे श्रीमंत असतात? दाताच्या ठेवणीवरून वाचा भाकीत!
15
नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट
16
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेशी महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
17
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
18
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
19
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
20
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल

जिल्ह्यातील १४,९७१ पाणीस्रोतांचे होणार सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 00:44 IST

पिण्याच्या पाण्यामध्ये आढळून आलेले दोष नष्ट करुन साथरोगास प्रतिबंध केला जातो. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत सुरक्षित राहावे, यासाठी शुध्दीकरण व प्रयोगशाळेत पाणी नमुन्याची तपासणी केली जाते. पाणी गुणवत्ता, सनियंत्रण व स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत शुध्द पाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड दिले जाते.

ठळक मुद्देजि.प. चा उपक्रम : शासकीय विहिरी, हातपंप, नळ योजना यांचा समावेश

चंद्रपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना शुध्द, सुरक्षित, मुबलक व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, तसेच जलजन्य रोगांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवले जावे, यासाठी जिल्हा परिषदेमधील पाणी व स्वच्छता विभागामार्फत जिल्हयातील पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील १४ हजार ९७१ पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे सर्वेक्षण मोहीम १ आक्टोंबर ते ३१ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.पिण्याचे पाणी, परिसर आणि वैयक्तीक स्वच्छता या घटकांचा आरोग्याशी संबंध आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शुध्द व स्वच्छ पाणी पुरवठा होण्यासाठी पाणी गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. पाणी गुणवत्ता व सनियंत्रण कार्यक्रमामध्ये स्वच्छता सर्वेक्षणाचे महत्व अनन्यसाधारण असून वैयक्तीक सवयी व सार्वजनिक स्वच्छता, नळ पाणी पुरवठा यंत्रणेतील तांत्रिक दोष, देखभाल व दुरुस्ती या कारणांमुळे पाणी दूषित होते. हे दूषित पाणी पिण्यास वापरल्याने विविध जलजन्य आजार होऊ शकतात.त्यामुळे जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून त्यांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या सर्व गावांतील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत मोहीम स्वरुपात केले जाणार आहे.  पिण्याच्या पाण्यामध्ये आढळून आलेले दोष नष्ट करुन साथरोगास प्रतिबंध केला जातो. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत सुरक्षित राहावे, यासाठी शुध्दीकरण व प्रयोगशाळेत पाणी नमुन्याची तपासणी केली जाते. पाणी गुणवत्ता, सनियंत्रण व स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत शुध्द पाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड दिले जाते. दूषित पाणी पुरवठा करणाºया ग्रामपंचायतींना लाल तर पाणी स्त्रोताभोवती अस्वच्छता असलेल्या ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले जाते.पाणी हा महत्त्वाचा घटकमानवी आहारात पाणी हा घटक महत्त्वाचा आहे. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता राखण्याकडे आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. गावांच्या वैयक्तीक सवयी, पाण्याचा वापर, सांडपाण्याचा निचरा, पाणी पुरवठा योजनेतील दुरुस्ती आणि देखभाल या बाबी यात महत्त्वाच्या मानल्या जातात.आपल्या गावातील ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे, याकरिता व गावात कोणताही जलजन्य आजार होऊ नये याकरिता जलसुरक्षक यांनी गावातील प्रत्येक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण करुन घ्यावे, पाणी नमुने गोळा करुन ते प्रयोगशाळेत पाठवावे. स्त्रोत दूषित असल्यास त्यावर उपाययोजना करता येईल. स्त्रोतांजवळ ग्रामस्थांनी स्वच्छता पाळावी.- विजय पचारेउपमुख्य कार्यकारी अधिकारी(पाणी व स्वच्छता) जिल्हा परिषद, चंद्रपूर.