शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

काेराेना नियंत्रण माेहिमेत शिक्षकांना विमाकवच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:36 IST

चंद्रपूर : काेविड नियंत्रणाच्या माेहिमेत आरोग्य विभागासोबत जिल्ह्यातील जिल्हा परिषद व नगर परिषदेचे शिक्षक ग्रामीण व शहरी भागात काम ...

चंद्रपूर : काेविड नियंत्रणाच्या माेहिमेत आरोग्य विभागासोबत जिल्ह्यातील जिल्हा परिषद व नगर परिषदेचे शिक्षक ग्रामीण व शहरी भागात काम करीत आहेत. मात्र, या शिक्षकांना शासनाने विमा कवचापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रुग्णसंख्येसोबतच मृतकांची संख्यासुद्धा वाढत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कोरोना साथरोग नियंत्रण मोहिमेसाठी शिक्षकांचा सहभाग घेतला आहे. यामध्ये कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, कोरोना प्रतिबंधक लसीकरण जनजागृती, चेक पोस्टवर बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींचे सर्वेक्षण, आदी महत्त्वाची कामे जिल्हा परिषद व खासगी शाळांमधील शिक्षक करीत आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये जाऊनही प्रत्यक काम करणे यासोबतच जिल्हा परिषदेच्या आपत्कालीन कक्षात शिक्षक सेवा देत आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ६५ शिक्षक सेवा देत आहे. मात्र, विमा कवच लागू करण्यात आले नाही. इतर विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची सेवा बजावताना विमा कवच लागू करण्यात आले आहेत. मात्र, शिक्षकांना विमा कवच नसल्याने शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात अनेक शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी १५ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.

कोट

कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा खूप घातक आहे. अशा वेळेस ज्या शिक्षकांची नियुक्त्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार विविध कामाकरिता प्रशासनाने केलेल्या आहे त्या सर्वांना शासनाने कोविड विमा कवच लागू केला पाहिजे. त्यासोबतच पात्र व्यक्तींच्या कुटुंबाला एक महिन्याच्या आत हा विमा मिळाला पाहिजे.

- गोविंद गोहणे, तालुका सरचिटणीस महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती, चिमूर

------

कोरोना लढाईत इतर कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा विमा शासनाने लागू केला आहे. पण, यामध्ये शिक्षकांना वगळण्यात आले आहे. शिक्षक मागील वर्षभरापासून कोरोना योद्धा म्हणून शासनाच्या निर्देशाप्रमाणे काम करीत आहे. यात अनेक शिक्षकांचे जीव गेले आहेत. त्यांचे संसार उघड्यावर पडले आहे. त्यामुळे शिक्षकांना ५० लाख विमा कवच शासनाने द्यावे.

- सुरेश डांगे, जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती, चंद्रपूर

-------

मागील वर्षी कोरोना नियंत्रणासाठी लागलेल्या शिक्षकांना विमा कवच होते. मात्र, त्याचा कालवधी संपला आहे. सद्य:स्थितीत जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यातील शिक्षकांची कोरोना साथरोग नियंत्रणासाठी ड्यूटी लावण्यात आली आहे. सद्य:स्थितीत यातंर्गत जिल्ह्यातील ६५ शिक्षक कार्यरत आहे. मात्र, त्यांना विमा कवच नाही. काेराेना साथराेग नियंत्रण माेहिमेत शिक्षकांची आलटूनपालटून ड्यूटी लावली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील काही शिक्षकांना बाधा झाली आहे. त्यापैकी १५ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.

- दीपेंद्र लोखंडे,

शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि. प. चंद्रपूर