शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

थंडीत आंघोळीला अति गरम वा गार पाणी वापरणाऱ्यांना आहे 'हार्ट अटॅक'चा धोका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 13:49 IST

Chandrapur : ना अती थंड ना गरम, कोमट पाण्याचा करा वापर

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : हिवाळ्यात थंडी घालवण्यासाठी अनेक जण अति गरम पाण्याने आंघोळ करतात, तर काही जण थंडगार पाण्याने आंघोळ करतात. मात्र, अति गरम आणि अति गार पाण्याने आंघोळ करणे म्हणजे हृदयविकाराला आमंत्रण देणे आहे. त्यामुळे कोमट पाण्याने आंघोळ करावे, असा सल्ला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमित ढवस यांनी दिला आहे. 

हृदयाच्या स्नायूच्या भागाला पुरेसे रक्त मिळत नाही. हृदयाच्या धमन्या अचानक अरुंद झाल्यामुळे आणि त्यांच्यामध्ये रक्तप्रवाह अतिशय मंद झाल्याने हृदयविकार येत असतो. थंडीत आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे रक्तदाब वाढतो. त्यामुळे आपल्या हृदयावर अतिरिक्त दाब निर्माण होतो. अशा वेळी अति गार पाण्याने किंवा अति गरम पाण्याने आंघोळ करणे धोकादायक ठरू शकते. 

हृदयरुग्णांनो, थंडीत ही काळजी घ्या शरीर उबदार ठेवण्यासाठी गरम कपड्यांचा वापर करा, बाहेर पडताना नेहमी टोपी, हातमोजे आणि मफलर घाला, थंड हवामानात जास्त मेहनत किंवा जोरदार व्यायाम टाळा, कारण यामुळे हृदयावर ताण येतो. ब्लड प्रेशर कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवा.

थंडीत आंघोळीला कोमट पाणी चांगले थंडीच्या दिवसात अति गरम किवा अति गार पाण्याने आंघोळ करण्यापेक्षा कोमट पाण्याने आंघोळ करणे चांगले असते.

तणावमुक्तीसाठी गरम पाण्याची आंघोळ गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीर आणि मनाला शांती मिळते. यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि स्नायूंना आराम मिळतो

कडक पाणी, साबणाने अंग तडकते कडक पाण्याने आंघोळ केल्यास साबणाचा वापर केल्यास अंग तडकण्याची भीती असते. त्यामुळे कोमट पाणी वापरावे.

कडक पाण्याने अंघोळ केल्यासरक्तदाब वाढतो : कडक पाण्याने अंघोळ केल्यास रक्तदाब वाढण्याचा धोका अधिक असतो.हृदयावर ताण वाढतो : थंडीत अति गरम पाण्याने आंघोळ केल्यास हृदयावर अतिरिक्त ताण पडण्याचा धोका असतो. 

हृदयविकारतज्ज्ञ म्हणतात... थंडीच्या दिवसात हृदयविकारचा धोका अधिक असतो. त्यामुळे थंडीत आवश्यक ती काळजी घ्यावी. आंघोळीसाठी अति गार किंवा अति गरम पाण्याचा वापर न करता कोमट पाण्याचा वापर करावा. यासोबतच थंडीत उबदार कापड्याचा वापर करा. हृदयाची समस्या असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा. -डॉ. अमित ढवस हृदयरोग व मधुमेहतज्ज्ञ, चंद्रपूर

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्सchandrapur-acचंद्रपूर