शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

थंडीत आंघोळीला अति गरम वा गार पाणी वापरणाऱ्यांना आहे 'हार्ट अटॅक'चा धोका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 13:49 IST

Chandrapur : ना अती थंड ना गरम, कोमट पाण्याचा करा वापर

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : हिवाळ्यात थंडी घालवण्यासाठी अनेक जण अति गरम पाण्याने आंघोळ करतात, तर काही जण थंडगार पाण्याने आंघोळ करतात. मात्र, अति गरम आणि अति गार पाण्याने आंघोळ करणे म्हणजे हृदयविकाराला आमंत्रण देणे आहे. त्यामुळे कोमट पाण्याने आंघोळ करावे, असा सल्ला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमित ढवस यांनी दिला आहे. 

हृदयाच्या स्नायूच्या भागाला पुरेसे रक्त मिळत नाही. हृदयाच्या धमन्या अचानक अरुंद झाल्यामुळे आणि त्यांच्यामध्ये रक्तप्रवाह अतिशय मंद झाल्याने हृदयविकार येत असतो. थंडीत आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे रक्तदाब वाढतो. त्यामुळे आपल्या हृदयावर अतिरिक्त दाब निर्माण होतो. अशा वेळी अति गार पाण्याने किंवा अति गरम पाण्याने आंघोळ करणे धोकादायक ठरू शकते. 

हृदयरुग्णांनो, थंडीत ही काळजी घ्या शरीर उबदार ठेवण्यासाठी गरम कपड्यांचा वापर करा, बाहेर पडताना नेहमी टोपी, हातमोजे आणि मफलर घाला, थंड हवामानात जास्त मेहनत किंवा जोरदार व्यायाम टाळा, कारण यामुळे हृदयावर ताण येतो. ब्लड प्रेशर कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवा.

थंडीत आंघोळीला कोमट पाणी चांगले थंडीच्या दिवसात अति गरम किवा अति गार पाण्याने आंघोळ करण्यापेक्षा कोमट पाण्याने आंघोळ करणे चांगले असते.

तणावमुक्तीसाठी गरम पाण्याची आंघोळ गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीर आणि मनाला शांती मिळते. यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि स्नायूंना आराम मिळतो

कडक पाणी, साबणाने अंग तडकते कडक पाण्याने आंघोळ केल्यास साबणाचा वापर केल्यास अंग तडकण्याची भीती असते. त्यामुळे कोमट पाणी वापरावे.

कडक पाण्याने अंघोळ केल्यासरक्तदाब वाढतो : कडक पाण्याने अंघोळ केल्यास रक्तदाब वाढण्याचा धोका अधिक असतो.हृदयावर ताण वाढतो : थंडीत अति गरम पाण्याने आंघोळ केल्यास हृदयावर अतिरिक्त ताण पडण्याचा धोका असतो. 

हृदयविकारतज्ज्ञ म्हणतात... थंडीच्या दिवसात हृदयविकारचा धोका अधिक असतो. त्यामुळे थंडीत आवश्यक ती काळजी घ्यावी. आंघोळीसाठी अति गार किंवा अति गरम पाण्याचा वापर न करता कोमट पाण्याचा वापर करावा. यासोबतच थंडीत उबदार कापड्याचा वापर करा. हृदयाची समस्या असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा. -डॉ. अमित ढवस हृदयरोग व मधुमेहतज्ज्ञ, चंद्रपूर

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्सchandrapur-acचंद्रपूर