शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 'या' गावात पोहोचली लालपरी; ग्रामस्थांनी नारळ फोडून केली पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 12:30 IST

भद्रावती तालुक्यातील विसलोन येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एस.टी. महामंडळाची लालपरी पोहोचली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांसह विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरणचालक-वाहक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार

संदीप झाडे

कूचना (चंद्रपूर) : देशभरात विकासाच्या दृष्टीकोनातून विविध कार्य सुरू आहेत. मेट्रोपासून-बुलेट ट्रेनपर्यंतची सेवा जनतेला उपलब्ध करून देण्याचं कार्य प्रगतीपथावर आहे. पण, देशातील काही असेही भाग आहेत जिथे ट्रेन तर सोडाच साधी बससेवाही उपलब्ध नाही. अशाच एका गावात शनिवारी एसटी महामंडळाची बस पहिल्यांदाच पोहोचली. तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र हे खरे आहे. भद्रावती तालुक्यातील विसलोन हे आडमार्गातील गाव. वरोरा आगारातून १२ कि.मी. अंतरावर असलेल्या विसलोन गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लालपरी पोहोचली. पहिल्यांदा बससेवा सुरू झाल्याने ग्रामस्थ आणि खास करून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

भद्रावती तालुक्यातील विसलोन, पळसगाव, माजरी वस्ती या भागातील गावांना या बसमुळे मोठा आधार मिळाला आहे. या गावांना वर्षानुवर्षे येथील प्रवाशांना वैयक्तिक व खासगी वाहनांशिवाय इतर प्रवाशांचे कुठलेही साधन नव्हते. त्यामुळे नागरिकांना विविध कामांसाठी वरोरा जाण्यासाठी दमछाक होत असे. तसेच बस पकडायची असल्यास नंदोरी किंवा कुचना येथे जावे लागत होते. त्यासाठी सहा कि.मी.ची पायपीट करावी लागत होती. विशेषतः चौथ्या वर्गानंतर विद्यार्थ्यांना नंदोरीला पायी जावे लागायचे. मात्र या गावासाठी प्रवीण सूर यांच्या प्रयत्नातून बस चालू झाल्याने या गावातील जनतेच्या आनंदाला पारावर उरला नाही. विसलोन गावात पहिल्यांदा आलेल्या आगार व्यवस्थापक, चालक-वाहकांचे शाल श्रीफळ सत्कार केला तर बसचीही नारळ फोडून पूजा केली.

तांत्रिक बाबी तपासल्या

सध्या तांत्रिक बाबी तपासण्यासाठी शनिवारी वरोरा बसस्थानकातून बस वरोरा-नंदोरी-विसलोन मार्गावर धावली. सदर बस गुरुवारपासून नियमित सुरू होणार असून सकाळी ७,१० दुपारी १ वाजता व सायं.५ वाजता अशा चार फेऱ्यांमध्ये धावणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली.यावेळी अन्य गावकरी महिलावर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच विसलोन गावात बस आली. या गावात ये-जा करण्यासाठी कुठलेच साधन नव्हते. मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी सहा किलोमीटर पायदळ पायपीट करावी लागायची. मात्र, बस सुरू झाल्याने गावकऱ्यांचा आनंद आहे.

-प्रवीण सूर, माजी जि. प. सदस्य, माजरी

टॅग्स :state transportएसटीRural Developmentग्रामीण विकासchandrapur-acचंद्रपूरSocialसामाजिक