शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

जणू देवदूतच आले तिच्यासाठी धावून! मध्यरात्री पार पाडले रेस्क्यू ऑपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2022 11:31 IST

पुरात मार्ग सापडत नसल्याने गावातील युवकांनी व आजारी महिलेच्या नातेवाइकांनी धैर्य दाखवून डोंग्याच्या साह्याने तिला चारवटपर्यंत आणले व अखेर रात्री १ वाजता तिथून रेस्क्यू टीमच्या मोटर बोटने नांदगाव पोडे येथे आणण्यात आले.

सुभाष भटवलकर

विसापूर (चंद्रपूर) : बल्लारपूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या हडस्ती, चारवट गावाला पुन्हा पुराने वेढले. वर्धा नदीने पुन्हा रौद्ररूप धारण केल्यामुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन तिथे राहावे लागत आहे. मंगळवारी गावातील एक महिला शीला रतन रॉय (वय ३२) ही गंभीर आजारी झाली. तिला तत्काळ उपचाराची गरज होती. ही माहिती बल्लारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार यांना मिळताच त्यांनी मध्यरात्री नांदगाव (पोडे) येथून चारवटमार्गे मोटर बोटद्वारे रेस्क्यू ऑपरेशन हाताळून तिला नांदगाव येथे आणले. नंतर रुग्णवाहिकेने नांदगावमार्गे चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करून तिचा जीव वाचविला. संपूर्ण रेस्क्यू टीम तिच्यासाठी जणू देवदूतच ठरली.

हडस्ती, चारवट, जुना चारवट या गावांना १८ जुलैपासूनच इरई, वर्धा नदीचे पुराचा वेढा असल्याने दोन्ही गावांचा बाह्य जगाशी संपर्क तुटला आहे; परंतु संबंधित प्रशासन संपर्कात असल्याने पूरग्रस्तांना दिलासा मिळत आहे. मौजा हडस्ती येथील शीला रॉय या महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. तिला तत्काळ उपचाराची गरज असल्याने रुग्णालयात दाखल कसे करायचे, हा मोठा प्रश्न होता.

घेण्यात आली डोंग्याची मदत

तहसीलदार राईंचवार यांना याबाबतत कळविल्यानंतर लगेच त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क साधून त्यांना नांदगाव येथे बोलावले. लगेच १०८ रुग्णवाहिकासुद्धा तयार ठेवण्यात आली. एव्हाना बरीच रात्र होऊन गेली होती. तरीही रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली; परंतु पुरात मार्ग सापडत नसल्याने गावातील संबा मेश्राम, महादेव मेश्राम व तिच्या नातेवाइकांनी धैर्य दाखवून डोंग्याच्या साह्याने महिलेला चारवटपर्यंत आणले व अखेर रात्री १ वाजता तिथून रेस्क्यू टीमच्या मोटर बोटने नांदगाव पोडे येथे आणण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेने चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात दखल करण्यात आले. यासाठी बोटचालक राजू निंबाळकर व सहकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापक जितेंद्र सुरवाडे व त्यांच्या टीमने परिश्रम घेतले.

टॅग्स :Socialसामाजिकchandrapur-acचंद्रपूरHealthआरोग्य