शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

इरई धरणाचे पाच दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 05:00 IST

जिवती-रोडगुडा रस्त्यावर चार फूट पाणी वाहत असल्यामुळे काहीजण दोन तास अडकले होते. पुरामुळे जिवती ते वणी, जिवती ते येल्लापूर मार्गावरील शाळा उघडल्या नाहीत. माणिकगड किल्ल्याच्या घाटात झाडे कोसळल्याने गडचांदूर-जिवती, भारी ते शंकरपठार मार्ग बंद आहे. हिमायतनगर येथील गजानन डावले, आनंदगुडा येथील माधव गोरे आदींसह भारी, बाबापूर, असापूर व पहाडावरील अनेक गावांतील पिकांची मोठी हानी झाली. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सतत पाच दिवसांपासून पाऊस धो-धो बरसत असल्याने नदी-नाल्यांना पूर आला. पावसाच्या माऱ्याने अनेकांची पडझड झाली तर शेकडो एकर शेती पुराच्या पाण्याखाली आली. गावांत पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. जिवती ते वणी, जिवती-येल्लापूर मार्गावरील शाळाच भरल्या नाहीत. नाल्याला पूर आल्याने वरोरा, बल्लारपूर, मूल, सावली, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, चिमूर, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना तालुक्यांतील अनेक रस्ते बंद झाले. मंगळवारी दिवसभर संततधार सुरू असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

तीन लाखांचे डेकोरेशनचे साहित्य पाण्यातमूल : शहरातील श्रमिक नगरातील शुभम अशोक पोलोजवार या युवकाच्या घरात पाणी शिरल्याने   डेकोरेशनचे इलेक्ट्रिक साहित्य खराब होऊन सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले. बेरोजगारीवर मात करण्यासाठी या युवकाने बँकेतून कर्ज काढून स्वत:चा व्यवसाय सुरू केला होता. शहरातील सर्वच वस्त्या जलमय झाल्या असून, काही घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. 

जिवती-वणी मार्ग ठप्पजिवती : जिवती-रोडगुडा रस्त्यावर चार फूट पाणी वाहत असल्यामुळे काहीजण दोन तास अडकले होते. पुरामुळे जिवती ते वणी, जिवती ते येल्लापूर मार्गावरील शाळा उघडल्या नाहीत. माणिकगड किल्ल्याच्या घाटात झाडे कोसळल्याने गडचांदूर-जिवती, भारी ते शंकरपठार मार्ग बंद आहे. हिमायतनगर येथील गजानन डावले, आनंदगुडा येथील माधव गोरे आदींसह भारी, बाबापूर, असापूर व पहाडावरील अनेक गावांतील पिकांची मोठी हानी झाली. 

पोथरा नदीचे पाणी शेतातवरोरा : पोथरा नदीचे पाणी अनेकांच्या शेतात शिरले. वरोरा-वणी महामार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीने सुरक्षा भिंत बांधल्यामुळे पाणी निघण्याचा मार्ग बंद होऊन शेती पाण्याखाली आली. हीच  स्थिती वरोरा-चिमूर मार्गालगतच्या शेतीची झाली. तालुक्यातील २५ पेक्षा अधिक घरांची पडझड झाली. माढेळी, वडनेर मार्ग नागरी हिंगणघाट एमआयडीसी दहेगाव, खांबाळा, नागरी, हिंगणघाट व बोडखा मार्गावरील पुलावरून पूर असल्याने सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाहतूक बंद होती. 

वेकोलिच्या ढिगाऱ्यांनी घातवेकोलिच्या ढिगाऱ्यांमुळे चंद्रपूर तालुक्यातील चांदसुर्ला गावात मंगळवारी अचानक पाणी शिरल्याने हाहाकार उडाला. घरातील वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांना माहिती मिळताच त्यांनी स्वीय सहायक व विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला गावात पाठविले. 

बल्लारपूर तालुक्यात ५० घरांची पडझड विसापूर : बल्लारपूर तालुक्यात बल्लारपूर शहरासह ग्रामीण भागातील सुमारे ५० वर घरांची पडझड झाली त्यामुळे गरिबांचे संसार उघड्यावर आले आहे. बल्लारपूर शहरात अतिवृष्टीने विविध वार्डांत १० तर विसापुरात १० कुटुंबाच्या घरांची पडझड झाली. बामणी (दुधोली) येथे २, चारवट येथे ५, नांदगाव (पोडे) ५, कोठारी येथे १०, मानोरा येथे ३, इटोली येथे २ तर गिलबिली ग्रामपंचायत हद्दीत ३ जणांचे घरे अतिवृष्टीने पडल्याची माहिती आहे. अतिवृष्टीने नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. अतिवृष्टीने तालुक्यात ५० वर घरांची पडझड होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. बल्लारपूर तालुक्यात ५० वर घरांची पडझड झाली. काहींच्या घरांचे अंशत: नुकसान झाले. तर काहींचे निवारा हिरावला आहे. तलाठ्यामार्फत पंचनामे सुरु आहेत. 

 

टॅग्स :Damधरणfloodपूर