शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

इरई धरणाचे पाच दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 05:00 IST

जिवती-रोडगुडा रस्त्यावर चार फूट पाणी वाहत असल्यामुळे काहीजण दोन तास अडकले होते. पुरामुळे जिवती ते वणी, जिवती ते येल्लापूर मार्गावरील शाळा उघडल्या नाहीत. माणिकगड किल्ल्याच्या घाटात झाडे कोसळल्याने गडचांदूर-जिवती, भारी ते शंकरपठार मार्ग बंद आहे. हिमायतनगर येथील गजानन डावले, आनंदगुडा येथील माधव गोरे आदींसह भारी, बाबापूर, असापूर व पहाडावरील अनेक गावांतील पिकांची मोठी हानी झाली. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सतत पाच दिवसांपासून पाऊस धो-धो बरसत असल्याने नदी-नाल्यांना पूर आला. पावसाच्या माऱ्याने अनेकांची पडझड झाली तर शेकडो एकर शेती पुराच्या पाण्याखाली आली. गावांत पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. जिवती ते वणी, जिवती-येल्लापूर मार्गावरील शाळाच भरल्या नाहीत. नाल्याला पूर आल्याने वरोरा, बल्लारपूर, मूल, सावली, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, चिमूर, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना तालुक्यांतील अनेक रस्ते बंद झाले. मंगळवारी दिवसभर संततधार सुरू असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

तीन लाखांचे डेकोरेशनचे साहित्य पाण्यातमूल : शहरातील श्रमिक नगरातील शुभम अशोक पोलोजवार या युवकाच्या घरात पाणी शिरल्याने   डेकोरेशनचे इलेक्ट्रिक साहित्य खराब होऊन सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले. बेरोजगारीवर मात करण्यासाठी या युवकाने बँकेतून कर्ज काढून स्वत:चा व्यवसाय सुरू केला होता. शहरातील सर्वच वस्त्या जलमय झाल्या असून, काही घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. 

जिवती-वणी मार्ग ठप्पजिवती : जिवती-रोडगुडा रस्त्यावर चार फूट पाणी वाहत असल्यामुळे काहीजण दोन तास अडकले होते. पुरामुळे जिवती ते वणी, जिवती ते येल्लापूर मार्गावरील शाळा उघडल्या नाहीत. माणिकगड किल्ल्याच्या घाटात झाडे कोसळल्याने गडचांदूर-जिवती, भारी ते शंकरपठार मार्ग बंद आहे. हिमायतनगर येथील गजानन डावले, आनंदगुडा येथील माधव गोरे आदींसह भारी, बाबापूर, असापूर व पहाडावरील अनेक गावांतील पिकांची मोठी हानी झाली. 

पोथरा नदीचे पाणी शेतातवरोरा : पोथरा नदीचे पाणी अनेकांच्या शेतात शिरले. वरोरा-वणी महामार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीने सुरक्षा भिंत बांधल्यामुळे पाणी निघण्याचा मार्ग बंद होऊन शेती पाण्याखाली आली. हीच  स्थिती वरोरा-चिमूर मार्गालगतच्या शेतीची झाली. तालुक्यातील २५ पेक्षा अधिक घरांची पडझड झाली. माढेळी, वडनेर मार्ग नागरी हिंगणघाट एमआयडीसी दहेगाव, खांबाळा, नागरी, हिंगणघाट व बोडखा मार्गावरील पुलावरून पूर असल्याने सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाहतूक बंद होती. 

वेकोलिच्या ढिगाऱ्यांनी घातवेकोलिच्या ढिगाऱ्यांमुळे चंद्रपूर तालुक्यातील चांदसुर्ला गावात मंगळवारी अचानक पाणी शिरल्याने हाहाकार उडाला. घरातील वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांना माहिती मिळताच त्यांनी स्वीय सहायक व विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला गावात पाठविले. 

बल्लारपूर तालुक्यात ५० घरांची पडझड विसापूर : बल्लारपूर तालुक्यात बल्लारपूर शहरासह ग्रामीण भागातील सुमारे ५० वर घरांची पडझड झाली त्यामुळे गरिबांचे संसार उघड्यावर आले आहे. बल्लारपूर शहरात अतिवृष्टीने विविध वार्डांत १० तर विसापुरात १० कुटुंबाच्या घरांची पडझड झाली. बामणी (दुधोली) येथे २, चारवट येथे ५, नांदगाव (पोडे) ५, कोठारी येथे १०, मानोरा येथे ३, इटोली येथे २ तर गिलबिली ग्रामपंचायत हद्दीत ३ जणांचे घरे अतिवृष्टीने पडल्याची माहिती आहे. अतिवृष्टीने नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. अतिवृष्टीने तालुक्यात ५० वर घरांची पडझड होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. बल्लारपूर तालुक्यात ५० वर घरांची पडझड झाली. काहींच्या घरांचे अंशत: नुकसान झाले. तर काहींचे निवारा हिरावला आहे. तलाठ्यामार्फत पंचनामे सुरु आहेत. 

 

टॅग्स :Damधरणfloodपूर