शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हल्लेखोर नरभक्षक 'T-103 वाघ' अखेर जेरबंद, गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 11:28 IST

टी-103 असे या नरभक्षक वाघाचे नाव असून जून महिन्यापासून तीन मोठ्या हल्ल्यात त्याने गावकऱ्यांचा जीव घेतला होता.

चंद्रपूर - ब्रह्मपुरी तालुक्यात दहशत माजवणाऱ्या वाघाला अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. जून महिन्यापासून या भागात वाघाने केलेल्या तीन मोठ्या हल्ल्यात ग्रामस्थांचा मृत्यू झाला होता. खरीप पिकांच्या पेरणी व देखभालीसाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना वाघाने लक्ष्य केले होते. त्यामुळेच नागरिकांमधील संताप लक्षात घेता मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांनी या वाघाला पिंजराबंद करण्याचे दिले. त्यानंतर, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीच्या जंगलात वावरणाऱ्या या हल्लेखोर नर वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आहे. 

टी-103 असे या नरभक्षक वाघाचे नाव असून जून महिन्यापासून तीन मोठ्या हल्ल्यात त्याने गावकऱ्यांचा जीव घेतला होता. त्यामुळेच, नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळल्यानंतर वन विभागानेही तातडीने दखल घेत वाघाला जेरबंद करण्याची कारवाई सुरु केली. मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांनी 17 ऑगस्ट रोजी या वाघाला पिंजराबंद करण्याचे आदेश दिले. आज सकाळी ब्रह्मपुरी उपक्षेत्रातील जंगलातल्या भगवानपुर येथील कक्ष क्रमांक 890 मध्ये हा वाघ फिरताना आढळला होता. 

वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रविकांत खोब्रागडे व सशस्त्र पोलीस कर्मचारी अजय मराठे यांनी नेमका डार्ट मारुन अडीच वर्षाच्या नर वाघाला बेशुद्ध केले. या वाघाची वैद्यकीय तपासणी करुन त्याला चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रुषा केंद्रात हलविले जाणार आहे. वाघ जेरबंद झाल्यानंतर ब्रह्मपुरी शहरालगतच्या शेतशिवारात नागरिक आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. मात्र, वाघाच्या गेल्या काळात घातलेल्या गोंधळाच्या आठवणी अनेकांसाठी दु:खद आणि थरारक आहेत.  

टॅग्स :Tigerवाघchandrapur-acचंद्रपूरFarmerशेतकरी