शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

‘शुभमंगल’चा मंडप तयार, पण जोडपीच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 06:00 IST

या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी प्रति जोडप्यास दहा हजार रुपये अनुदान देण्यात येते व सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रत्येक जोडप्यामागे दोन हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान दिले जाते. ही योजना महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत राबविली जाते.

ठळक मुद्देदहा हजारांचे मिळते अनुदान : महिला व बालविकास विभागाची योजना

रवी जवळे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकरी, शेतमजूर लेकींच्या सामूहिक विवाहासाठी अर्थसाहाय्य व्हावे, यासाठी आठ वर्षांपूर्वी महिला व बालविकास विभागाच्या वतीने शुभमंगल सामूहिक विवाह योजना सुरू करण्यात आली. मात्र, याचा लाभ घेण्यासाठी जोडपीच येत नसल्याने जिल्ह्यात या योजनेला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत नाही. मागील पाच वर्षांत जिल्ह्यात बोटावर मोजण्या इतक्याच लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. मागच्या वर्षी ८६ जोडप्यांनी याचा लाभ घेतला असला तरी यावर्षी एकही प्रस्ताव आलेला नाही.या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी प्रति जोडप्यास दहा हजार रुपये अनुदान देण्यात येते व सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रत्येक जोडप्यामागे दोन हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान दिले जाते. ही योजना महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत राबविली जाते. दरवर्षी जे प्रस्ताव सादर होतील, त्याची छाननी महिला व बालविकास विभागाच्या वतीने केली जाते. त्यानंतर हे प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाकडे अनुदान मंजुरीसाठी पाठविले जातात. मात्र, मागील काही वर्षात बोटावर मोजण्या इतक्याच जोडप्यांनी याचा लाभ घेतला आहे. या योजनेंतर्गत लाभार्थींनी बँकेची माहिती, बँक शाखा, खाते क्रमांक, इत्यादींची माहिती अर्जात नमूद करून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयास सादर करावी. स्वयंसेवी संस्थेमार्फत आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या किमान एक महिना अगोदर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयास अर्जासह सर्व एकत्रित दाखले सादर करावेत. विवाह सोहळ्यात भाग घेतलेल्या जोडप्याची व्हिडीओ रेकॉर्डींग आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र स्वयंसेवी संस्थेने सादर करणे बंधनकारक आहे. त्यानंतरच प्रत्येक जोडप्यामागे दोन हजार रुपये इतके प्रोत्साहनात्मक अनुदान अदा करण्यात येते.योजना चांगली असली तरी विवाह सोहळ्याबाबत अद्यापही अनेक वर व वधुकडील वडीलधारे गंभीर असल्याने या योजनेकडे ते पाठ फिरवित असल्याचे दिसून येत आहे.जनजागृतीची गरजघर बांधणे आणि लग्न सोहळा आयोजित करणे सहज बाब नाही, हे सर्वांना ज्ञात आहे. यातील अवाढव्य खर्च वाचावा, यासाठी ही योजना असली तरी पालक याकडे गंभीरतेने बघत नाही. त्यामुळे जनजागृती गरज आहे.शुभमंगल सामूहिक विवाह योजनेअंतर्गत शेतकरी, मजूर यांच्या मुला- मुलींच्या विवाहासाठी मंगळसूत्र व इतर खर्चासाठी दहा हजार रुपये देण्यात येतात. चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षी नोंदणी झालेल्या ८६ जोडप्यांना लाभ दिला. यावर्षी मात्र एकही जोडप्याचा प्रस्ताव आला नाही.-आर. एन. टेटेमहिला,बालविकास अधिकारी, चंद्रपूरअशा आहेत अटीया योजनेचा लाभ घेणाºया जोडप्यातील वधू ही महाराष्ट्रातील रहिवासी असावी,त्याबाबत ग्रामसेवक किंवा तलाठी यांचा दाखला असावा.विवाह सोहळ्याच्या दिवशी वराचे वय २१ वर्षे व वधूचे वय १८ वर्षे यापेक्षा कमी असू नये.याबाबत जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा जन्माच्या स्थानिक प्राधिकाºयाने दिलेला दाखला किंवा वैद्यकीय अधिकाºयाचे वयाबाबतचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते.तलाठी किंवा तहसीलदार यांनी दिलेला एक लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला, वधू-वरांना प्रथम विवाहासाठीचे हे अनुदान पुनर्विवाहाकरिता अनुज्ञेय राहणार नाही.वधू विधवा किंवा घटस्फोटित असल्यास तिच्या पुनर्विवाहासाठी अनुज्ञेय राहील.

टॅग्स :marriageलग्न