शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
5
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
6
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
7
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
8
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
9
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
11
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
12
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
13
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
14
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
15
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
16
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
17
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
18
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
19
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
20
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

-तरच टिकेल नैसर्गिक समतोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:23 IST

वन व वन्यप्राण्यांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठी सर्वसामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण केल्या जात आहे. परंतु, मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजनेची आज गरज निर्माण झाली आहे. यातूनच निसर्गातील समतोल टिकू शकतो.

ठळक मुद्देताडोबा समृद्ध जंगलाचे प्रतीक : मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यास हव्या योजना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वन व वन्यप्राण्यांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठी सर्वसामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण केल्या जात आहे. परंतु, मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजनेची आज गरज निर्माण झाली आहे. यातूनच निसर्गातील समतोल टिकू शकतो.जंगलात वाघांचा अधिवास असणे हे समृद्ध जंगलाचे प्रतीक आहे. जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प यासंदर्भात लक्षवेधी ठरला. अन्नसाखळीतील वाघ हा मुख्यघटक आहे. वाघामुळे जंगलातील वनस्पती व इतर तृणभक्षी प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. वाघांची संख्या ज्या जंगलात अधिक ते जंगल किंवा तेथील परिसर परिपूर्ण मानला जातो. जंगल उत्कृष्ट असेल तर मानवी जीवन सुसह्य होण्यास कारणीभूत ठरते. वनसंपदेमुळे प्राणीमात्रांसाठी आॅक्सिजन, मुबलक पाणी व जमिनीची धूप थांबविण्यासही मदत होते. पर्यायाने जंगलासाठी सर्व वन्यजीव वाचविणे सर्वांचेच कर्तव्य आहे. वाघ हा नैसर्गिक जैविक साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. व्याघ्र प्रकल्पासाठी घोषीत केलेले क्षेत्र हे निमसदाहरित जंगल असून ते दुर्गम व अति उतार, डोंगराळ व घनदाट असल्याने या भागात गवे, सांबर, रानडुक्कर व अन्य प्राण्यांचा संचार अधिक प्रमाणात असतो.अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पाच्या विकासासाठी विविध योजना राबविताना यामध्ये मानवहित नजरेआड झाल्यास टोकाचा संघर्ष निर्माण होतो. वाघ व अन्य वन्यजीवांचे अस्तित्व कायम टिकविण्यासाठी प्रकल्प क्षेत्रात पोषक वातावरण तयार करावे. परिसरातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविणे, यामध्ये सुसंवादाची आज गरज आहे.निर्भरता कमी करावीवन परिसर, अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प परिसरात राहणाऱ्या लोकांच्या गरजा भागविण्यासाठी कोर क्षेत्रावर अवलंबून राहावे लागते. ही स्थिती बदलविण्याची गरज आहे. गावकऱ्यांच्या दैनंदिन गरजा गावातच पूर्ण व्हावे आणि जंगलावरील निर्भरता कमी करण्यासाठी आवश्यकतेनुसार नवीन योजनांची आखणी केली पाहिजे.वाघांच्या अधिवास क्षेत्रात हवी सुधारणाव्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून वाघांचे संनियंत्रण व संख्येत वाढ होण्यासाठी त्यांच्या अधिवासामध्ये सुधारणा करावी. वन्यजीव संवर्धनाकरिता केंद्र शासनाने सन १९७२ पासून विशेषतत्वाने राबविण्यात येत असलेल्या शासन पुरस्कृत योजनेअंतर्गत राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यांचा व्याघ्र प्रकल्पामध्ये समावेश केला आहे. भारतीय अधिनियम १९२७ अन्वये वनक्षेत्र व वन्यजीवांचे संरक्षण करता येते. वन (संवर्धन) अधिनियम १९८० या कायद्यात वनक्षेत्रांचे कामासाठी उपयोगाबाबत अनेक तरतुदी आहे. यावर आधारीत वाघांच्या अधिवास क्षेत्रात सुधारणेसाठी पाऊल उचलण्याची गरज आहे.