शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

-तरच टिकेल नैसर्गिक समतोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:23 IST

वन व वन्यप्राण्यांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठी सर्वसामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण केल्या जात आहे. परंतु, मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजनेची आज गरज निर्माण झाली आहे. यातूनच निसर्गातील समतोल टिकू शकतो.

ठळक मुद्देताडोबा समृद्ध जंगलाचे प्रतीक : मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यास हव्या योजना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वन व वन्यप्राण्यांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठी सर्वसामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण केल्या जात आहे. परंतु, मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजनेची आज गरज निर्माण झाली आहे. यातूनच निसर्गातील समतोल टिकू शकतो.जंगलात वाघांचा अधिवास असणे हे समृद्ध जंगलाचे प्रतीक आहे. जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प यासंदर्भात लक्षवेधी ठरला. अन्नसाखळीतील वाघ हा मुख्यघटक आहे. वाघामुळे जंगलातील वनस्पती व इतर तृणभक्षी प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. वाघांची संख्या ज्या जंगलात अधिक ते जंगल किंवा तेथील परिसर परिपूर्ण मानला जातो. जंगल उत्कृष्ट असेल तर मानवी जीवन सुसह्य होण्यास कारणीभूत ठरते. वनसंपदेमुळे प्राणीमात्रांसाठी आॅक्सिजन, मुबलक पाणी व जमिनीची धूप थांबविण्यासही मदत होते. पर्यायाने जंगलासाठी सर्व वन्यजीव वाचविणे सर्वांचेच कर्तव्य आहे. वाघ हा नैसर्गिक जैविक साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. व्याघ्र प्रकल्पासाठी घोषीत केलेले क्षेत्र हे निमसदाहरित जंगल असून ते दुर्गम व अति उतार, डोंगराळ व घनदाट असल्याने या भागात गवे, सांबर, रानडुक्कर व अन्य प्राण्यांचा संचार अधिक प्रमाणात असतो.अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पाच्या विकासासाठी विविध योजना राबविताना यामध्ये मानवहित नजरेआड झाल्यास टोकाचा संघर्ष निर्माण होतो. वाघ व अन्य वन्यजीवांचे अस्तित्व कायम टिकविण्यासाठी प्रकल्प क्षेत्रात पोषक वातावरण तयार करावे. परिसरातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविणे, यामध्ये सुसंवादाची आज गरज आहे.निर्भरता कमी करावीवन परिसर, अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प परिसरात राहणाऱ्या लोकांच्या गरजा भागविण्यासाठी कोर क्षेत्रावर अवलंबून राहावे लागते. ही स्थिती बदलविण्याची गरज आहे. गावकऱ्यांच्या दैनंदिन गरजा गावातच पूर्ण व्हावे आणि जंगलावरील निर्भरता कमी करण्यासाठी आवश्यकतेनुसार नवीन योजनांची आखणी केली पाहिजे.वाघांच्या अधिवास क्षेत्रात हवी सुधारणाव्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून वाघांचे संनियंत्रण व संख्येत वाढ होण्यासाठी त्यांच्या अधिवासामध्ये सुधारणा करावी. वन्यजीव संवर्धनाकरिता केंद्र शासनाने सन १९७२ पासून विशेषतत्वाने राबविण्यात येत असलेल्या शासन पुरस्कृत योजनेअंतर्गत राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यांचा व्याघ्र प्रकल्पामध्ये समावेश केला आहे. भारतीय अधिनियम १९२७ अन्वये वनक्षेत्र व वन्यजीवांचे संरक्षण करता येते. वन (संवर्धन) अधिनियम १९८० या कायद्यात वनक्षेत्रांचे कामासाठी उपयोगाबाबत अनेक तरतुदी आहे. यावर आधारीत वाघांच्या अधिवास क्षेत्रात सुधारणेसाठी पाऊल उचलण्याची गरज आहे.