वाहन परवाना शिबिर घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:21 IST2021-02-20T05:21:27+5:302021-02-20T05:21:27+5:30
अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त चंद्रपूर : स्थानिक गांधी चौक ते जटपुरा गेटपर्यंत नव्याने रस्ता तयार केला जात आहे. मात्र ...

वाहन परवाना शिबिर घ्यावे
अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : स्थानिक गांधी चौक ते जटपुरा गेटपर्यंत नव्याने रस्ता तयार केला जात आहे. मात्र यातही व्यावसायिक अतिक्रमण करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महानगर पालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
बसस्थानकांवर सोयी उपलब्ध कराव्यात
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक बसस्थानकांवर सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. कोरपना, गडचांदूर, कोरपना, सावली या तालुका मुख्यालयामध्ये तर, बसस्थानकसुद्धा नाही. त्यामुळे येथे सोयीसुविधायुक्त बसस्थानक निर्माण करावे, अशी मागणी होत आहे. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी, बसण्यासाठी जागा, शौचालय नाही.
डासांचा प्रादुर्भाव वाढला
वरोरा: शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बहुतांश वॉर्डामध्ये कचराकुंड्याच नसल्याने दिवसेंदिवस डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे.याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.
वाहनतळाअभावी वाहनधारक त्रस्त
चंद्रपूर : शहरातील बहुतांश इमारतीमध्ये वाहनतळाची जागा नसल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. महानगरपालिकेच्या प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वाहनतळाची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, गोलबाजार, आझाद बाग परिसरात तर वाहने रस्त्यावर ठेवली जात आहे.
नाल्यांचा उपसा करावा
चंद्रपूर : शहरातील बालाजी वार्ड, समाधीवार्ड तसेच काही वार्डतील नाल्या तुंबल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नाल्यांमध्ये घाण साचून असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला. मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांना तातडीने या वॉर्डात पाठविण्याची मागणी नागरिकांनी केली.
अतिक्रमण हटाव मोहीम थंडावली
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील वर्षी मार्च महिन्यात लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे अतिकमण मोहीम थंडावली. परिणामी शहरातील विविध मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे ते हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.
रस्त्यांची दुरुस्ती करावी
ब्रह्मपुरी : येथील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहन चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याची दुरुस्तीकरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मोबाइलधारक त्रस्त
चंद्रपूर: मोबाइलचा वापर सर्वत्र वाढला आहे. पण काही कंपन्यांकडून अनावश्यक सेवांचा भडीमार ग्राहकांवर केला जात आहे. यामुळे मोबाइलधारक त्रस्त झाले आहेत. याची तक्रार संबंधित ग्राहक तक्रार केंद्राकडे करतात; पण त्याचा निपटारा होत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.