शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

वीज ग्राहकांना अचूक बिल देण्यास यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:13 IST

वीज वितरण कंपनीच्या चंद्रपूर परिमंडळात गडचिरोली जिल्ह्याचा समावेश होतो. दोन्ही जिल्ह्यात ७ लाख ९ हजार २६० वीज ग्राहक आहेत. घरगुती, वाणिज्य व कृषी क्षेत्रातील वीज वापरात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

ठळक मुद्देआधुनिक तंत्रज्ञानावर भर : चंद्रपूर परिमंडळातील ७ लाख ९ हजार ग्राहकांना अखंड पुरवठा

राजेश मडावी।आॅनलाईन लोकमतवीज वितरण कंपनीच्या चंद्रपूर परिमंडळात गडचिरोली जिल्ह्याचा समावेश होतो. दोन्ही जिल्ह्यात ७ लाख ९ हजार २६० वीज ग्राहक आहेत. घरगुती, वाणिज्य व कृषी क्षेत्रातील वीज वापरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीने कोणते पाऊल उचलले, वीज गळती, शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज पुरवठा आणि आधुनिक तांत्रिक बदलातून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सोईसुविधांबाबत नेमकी काय स्थिती आहे ? जिल्ह्यातील ४ लाख ७ हजार ६६५ ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा होतो काय ? या विषयी वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांच्याशी साधलेला संवाद...जिल्ह्यातील वीज क्षमतेसाठी यांत्रिक सामग्री पुरेशी आहे का?वीज वितरण कंपनीने ग्राहकांना सेवा देण्यासाठी आमूलाग्र बदलाचे धोरण तयार केले. त्याची अंमलबजावणीदेखील प्रभावीपणे केली जात आहे. उपकेंद्र, अतिरिक्त रोहित्र, ३३ केव्ही उपकेंद्रांमधील क्षमता वाढ, नविन वितरण रोहित्रे, उच्च व लघुदाब वाहिनी उभारण्यात उद्दिष्ठांपेक्षाही मोठे यश आले. या सर्व संयंत्राच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. २०१७-१८ मध्ये कोट्यवधी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. तांत्रिक कामांची गुणवत्ता आणि ग्राहकांच्या गरजांमध्ये मेळ घालूनच कंपनीची वाटचाल सुरू आहे.सामान्यत: कृषिपंपासंदर्भात तक्रारी होतात. निरसनासाठी कोणती विशेष व्यवस्था आहे ?जिल्ह्यामध्ये ३१ मार्च २०१४ पर्यंत ४१ हजार ९३६ कृषी पंप होते. २०१४-१७ मध्ये १५ हजार ६२९ पूर्ण झालीत. २०१७-१८ या वर्षात ३ हजार ७६२ कृषी पंपांची कामे सुरू आहेत. शेतकºयांना कृषी सिंचनासाठी अडचणी येणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. शेतकºयांनी तक्रारी केल्यास तातडीने निरसन केले जाते. त्यासाठी कर्मचाºयांना प्रशिक्षण देवून विशेष कक्ष तयार करण्यात आले. तक्रारींचे प्रमाण कमी झाले. नियमाच्या चौकटीत असलेली शेतकऱ्यांची कामे कधीही अडविली जात नाही. कंपनीने शेतकºयांचे हित लक्षात घेवून जिल्ह्यात मूलभूत स्वरूपाची कामे करून गावखेड्यांमध्ये अविरत वीजसेवा पोहोचविण्यात येत आहे.थकीत वसुलीसाठी कायदेशीर बडगा उगारला जात नाही, असा आक्षेप आहे ?थकीत वसुलीच्या संदर्भात जानेवारी ते डिसेंबर २०१७ या कालखंडाचा विचार केल्यास केवळ चंद्रपूर परिमंडळातच दीड हजार वीज चोºया पकडून २ कोटी ९६ लाखांची वसुली करण्यात आली.मिटर रिडिंग प्रमाणकानुसारच तंतोतंत व्हावे, याकरिता ४०० कर्मचाºयांची विशेष कार्यशाळा घेण्यात आली. एकूणच या यंत्रणेत ग्राहकाभिमुख सुधारणा झपाट्याने होत आहेत. चंद्रपूर परिमंडळात दरमहा ९९ टक्के वसुली होते. अचूक आणि वेळेत बिल दिल्याचाच हा परिणाम आहे. विशेष म्हणजे, २८ हजार ग्राहक आॅनलाईन बिल भरतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार केल्यास ग्राहकांना कोणत्याही अडचणींचा सामना करण्याची वेळ येणार नाही.चंद्रपूर परिमंडळात गळतीचे प्रमाण किती आहे ?या परिमंडळात ११.२९ टक्के वीज गळती असून हे प्रमाण धोकादायक मानले जात नाही. चंद्रपूर जिल्ह्यात ८.७१ तर गडचिरोली जिल्ह्यात १८ टक्के वीज गळती होते. गडचिरोलीचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू आहेत. हे प्रमाण निश्चितपणे कमी होवू शकेल. नवीन वीज खांब उभारताना बऱ्याचदा अडचणी येतात. त्यातूनही मार्ग काढून अखंडपणे वीज पुरवठा सुरू आहे.उपेक्षित घटकांसाठी कोणत्या योजना सुरू आहेत ?दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, एकात्मिक उर्जा विकास योजना आणि पायाभूत आराखड्यातंर्गत उपेक्षित समाज घटकांसाठी कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. जिल्ह्यातील १३ हजार ६३२ दारिद्ररेषेखालील लाभधारकांना नविन वीज जोडणी देण्यात येणार असून विद्युत वाहिनी नुतनीकरण व बळकटीकरण योजना तसेच जलयुक्त शिवारातूनही अनेक कामे प्रस्तावित आहेत. कंपनीने बदलत्या काळानुसार नविन वीज जोडणी अपॅ आणि कर्मचारी मित्र अ‍ॅप सुरू केले. ग्राहकांनी या आधुनिक तांत्रिक सोईसुविधांचा लाभ घेतला पाहिजे.थकित बिलाविषयी शंका असल्यास तातडीने तक्रार नोंदवावी. कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी सौजन्याने वागावे, अशी शिस्त लावण्यात आली. त्याचे विधायक परिणाम दिसून येत आहे. ग्राहकांच्या हिताचा विचार करूनच २९ उपविभागात ग्राहक जनसंपर्क मेळावे घेण्यात आले.