शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मिळणार पॅकींगमध्ये धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:02 IST

कोरोनामुळे यावर्षी मार्च महिन्यामध्येच परीक्षा न घेताच शाळांना सुटी देण्यात आली. त्यामुळे शासनाची योजना असलेल्या शालेय पोषण आहारातील शाळेमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, मुगडाळ, हरभरा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी समप्रमाणात वितरण केले. यानंतरही उन्हाळ्यातील ३४ दिवसांचा पोषण आहार विद्यार्थ्यांना देणे बाकी असल्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे कठीण होत आहे.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र : ३४ दिवसांचा सोय होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यावर्षी मार्च महिन्यापासूनच शाळा बंद झाल्या. दरम्यान, शालेय पोषण आहाराअंतर्गत विद्यार्थ्यांना आहार देताच आला नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शाळांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जावून शिल्लक धान्याचे वितरण केले. दरम्यान, आता उन्हाळ्यातील ३४ दिवसांचे धान्य विद्यार्थ्यांना पॅकींगच्या स्वरुपात देण्याच निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे येथील शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढून संबंधितांना यासंदर्भात निर्देश दिले आहे.कोरोनामुळे यावर्षी मार्च महिन्यामध्येच परीक्षा न घेताच शाळांना सुटी देण्यात आली. त्यामुळे शासनाची योजना असलेल्या शालेय पोषण आहारातील शाळेमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, मुगडाळ, हरभरा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी समप्रमाणात वितरण केले. यानंतरही उन्हाळ्यातील ३४ दिवसांचा पोषण आहार विद्यार्थ्यांना देणे बाकी असल्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे कठीण होत आहे. त्यामुळे शिक्षणसंचालकांना पुरवठादारांसोबत एक करार केला आहे. या अंतर्गत ३४ दिवसांचा शालेय पोषण आहार पॅकींगच्या स्वरुपात विद्यार्थ्यांंना वितरीत करण्यात येणार आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी प्राथमिक दिपेंद्र लोखंडे यांनी पत्र काढून सर्व गटशिक्षणाधिकाºयांना यासंदर्भात योग्य काळजी घेण्याचे निर्देश दिले आहे. प्राप्त झालेले धान्य सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी मुख्याध्यापांना घ्यावी लागणार आहे.मुख्याध्यापकांचे वाढणार टेंशनसुटी कालावधीतील धान्य वितरण करण्यासाठी मुख्याध्यापकांचे अतिरिक्त काम वाढणार आहे. अनेक नियम पाळावे लागणार असून नोंदी घ्यावी लागणार असल्याने मुख्याध्यापकांचे टेंशन वाढणार आहे. विशेष म्हणजे, प्राप्त झालेले धान्य शाळांत सुस्थितीत ठेवायचे असून कंत्राटदाराकडून योग्य वजन करून घ्यावे लागणार आहे. सोबतच शालेय व्यवस्थापन समिती, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासनालाही माहिती कळवावी लागणार आहे.दर्जाचीही करावी लागणार तपासणीधान्य प्राप्त झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराच्या गोदामामध्ये गटशिक्षणाधिकाºयांना जावे लागणार असून तिथे धान्याचा दर्जा तपासावा लागणार आहे. एवढेच नाही तर धान्य तसेच पॅकींगसंदर्भात मुख्याध्यापक समाधानी नसल्याने धान्य बदलवून मिळणार आहे. तसेच मुख्याध्यापकांच्या सुचनेनुसार ५ दिवसांच्या आत स्वखर्चाने कंत्राटदाराला धान्य पुरवठा करावा लागणार आहे. सोबतच गावातील लोकप्रतिनिधांना माहितीही द्यावी लागणार आहे.

टॅग्स :Socialसामाजिक