शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मिळणार पॅकींगमध्ये धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:02 IST

कोरोनामुळे यावर्षी मार्च महिन्यामध्येच परीक्षा न घेताच शाळांना सुटी देण्यात आली. त्यामुळे शासनाची योजना असलेल्या शालेय पोषण आहारातील शाळेमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, मुगडाळ, हरभरा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी समप्रमाणात वितरण केले. यानंतरही उन्हाळ्यातील ३४ दिवसांचा पोषण आहार विद्यार्थ्यांना देणे बाकी असल्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे कठीण होत आहे.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र : ३४ दिवसांचा सोय होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यावर्षी मार्च महिन्यापासूनच शाळा बंद झाल्या. दरम्यान, शालेय पोषण आहाराअंतर्गत विद्यार्थ्यांना आहार देताच आला नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शाळांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जावून शिल्लक धान्याचे वितरण केले. दरम्यान, आता उन्हाळ्यातील ३४ दिवसांचे धान्य विद्यार्थ्यांना पॅकींगच्या स्वरुपात देण्याच निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे येथील शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढून संबंधितांना यासंदर्भात निर्देश दिले आहे.कोरोनामुळे यावर्षी मार्च महिन्यामध्येच परीक्षा न घेताच शाळांना सुटी देण्यात आली. त्यामुळे शासनाची योजना असलेल्या शालेय पोषण आहारातील शाळेमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, मुगडाळ, हरभरा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी समप्रमाणात वितरण केले. यानंतरही उन्हाळ्यातील ३४ दिवसांचा पोषण आहार विद्यार्थ्यांना देणे बाकी असल्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे कठीण होत आहे. त्यामुळे शिक्षणसंचालकांना पुरवठादारांसोबत एक करार केला आहे. या अंतर्गत ३४ दिवसांचा शालेय पोषण आहार पॅकींगच्या स्वरुपात विद्यार्थ्यांंना वितरीत करण्यात येणार आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी प्राथमिक दिपेंद्र लोखंडे यांनी पत्र काढून सर्व गटशिक्षणाधिकाºयांना यासंदर्भात योग्य काळजी घेण्याचे निर्देश दिले आहे. प्राप्त झालेले धान्य सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी मुख्याध्यापांना घ्यावी लागणार आहे.मुख्याध्यापकांचे वाढणार टेंशनसुटी कालावधीतील धान्य वितरण करण्यासाठी मुख्याध्यापकांचे अतिरिक्त काम वाढणार आहे. अनेक नियम पाळावे लागणार असून नोंदी घ्यावी लागणार असल्याने मुख्याध्यापकांचे टेंशन वाढणार आहे. विशेष म्हणजे, प्राप्त झालेले धान्य शाळांत सुस्थितीत ठेवायचे असून कंत्राटदाराकडून योग्य वजन करून घ्यावे लागणार आहे. सोबतच शालेय व्यवस्थापन समिती, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासनालाही माहिती कळवावी लागणार आहे.दर्जाचीही करावी लागणार तपासणीधान्य प्राप्त झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराच्या गोदामामध्ये गटशिक्षणाधिकाºयांना जावे लागणार असून तिथे धान्याचा दर्जा तपासावा लागणार आहे. एवढेच नाही तर धान्य तसेच पॅकींगसंदर्भात मुख्याध्यापक समाधानी नसल्याने धान्य बदलवून मिळणार आहे. तसेच मुख्याध्यापकांच्या सुचनेनुसार ५ दिवसांच्या आत स्वखर्चाने कंत्राटदाराला धान्य पुरवठा करावा लागणार आहे. सोबतच गावातील लोकप्रतिनिधांना माहितीही द्यावी लागणार आहे.

टॅग्स :Socialसामाजिक