शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनो बोर्ड परीक्षेत अशा गैरप्रकारांना थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 17:23 IST

कॉपीस मदत करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्ह्याची तरतूद : कॉपीला आळा घालण्यासाठी पथके

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत. परीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्यास किंवा त्यास मदत करण्यास कोणीही सहभागी आढळल्यास त्यांच्यावर थेट अजामीनपात्र फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मंगळवार (दि. १०) पासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. जिल्ह्यातील ८८ परीक्षा केंद्रांवर कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.

सुमारे ८० टक्के परीक्षा केंद्रांवरील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून, परीक्षा केंद्रांच्या परिसरात ड्रोनद्वारेही नजर ठेवण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हास्तरीय समितीसोबतच दक्षता समित्या आणि भरारी पथके सक्रिय राहणार आहेत. यंदा कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

गतवर्षी काही केंद्रांवर कारवाई

मागील वर्षी दहावी तसेच बारावीदरम्यान, परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार आढळले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना निलंबित तसेच केंद्रांवरही कारवाई करण्यात आली.

प्रत्येक केंद्रावर भरारी पथके

यंदा परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. प्रत्येक केंद्रावर भरारी पथक, बैठे पथक लक्ष ठेवून राहणार आहे. कॉपी करताना आढळल्यास थेट कारवाई करण्यात येणार आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा कधीपासून ?

इयत्ता १० वीची बोर्ड परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये एकूण १२७ परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे तर इयत्ता १२ वीची बोर्ड परीक्षा मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत घेण्यात येणार असून, जिल्ह्यात ८८ परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे.

बारावीसाठी २८ हजार ३०५ विद्यार्थी

जिल्ह्यात बारावीची ८८ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. या केंद्रांतून २८ हजार ३०५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

परीक्षेत गैरप्रकार केल्यास फौजदारी गुन्हा

परीक्षेत कॉपी, मोबाईल वापर, प्रश्नपत्रिका बाहेर काढणे, उत्तरे पुरवणे किंवा त्यास मदत केल्यास संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दोषींना अटक होऊन न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

वर्गात सीसीटीव्ही, बाहेर ड्रोनद्वारे नजर

बहुतांश परीक्षा केंद्रांवरील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, परीक्षा केंद्रांच्या बाहेरील परिसरावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. या माध्यमातून गैरप्रकारावर आळा घालण्यात येणार आहे.

जिल्ह्यात भरारी पथकांची स्थापना

जिल्ह्यात विविध भरारी पथके, समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. दक्षता समित्या अचानक भेटी देऊन तपासणी करणार आहेत. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये विविध अधिकाऱ्यांच्या समित्याही परीक्षा केंद्रांना भेट देणार आहेत.

कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता कायमची रद्द

कोणत्याही परीक्षा केंद्रावर कॉपीचा प्रकार आढळल्यास त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. यासंदर्भात परीक्षा मंडळांनी कडक नियमावली तयार केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Students, Direct Criminal Charges for Cheating on Board Exams!

Web Summary : Maharashtra board implements strict measures to prevent cheating in 10th and 12th exams. Criminal charges will be filed against those involved. CCTV and drones will monitor exam centers. Vigilance squads are formed for surprise checks. Any center found with cheating will face permanent cancellation.
टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाEducationशिक्षण