विद्यार्थ्यांनी शिस्तीसह स्वरक्षणाला महत्त्व द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:43 IST2021-02-23T04:43:36+5:302021-02-23T04:43:36+5:30

बल्लारपूर : धावपळीच्या जीवनात घरून रस्त्यावर येताना स्वतः वाहतुकीचे व सुरक्षेचे सर्व नियम पाळणे ही प्रत्येक विद्यार्थ्यांची नैतिक जबाबदारी ...

Students should value self-defense with discipline | विद्यार्थ्यांनी शिस्तीसह स्वरक्षणाला महत्त्व द्यावे

विद्यार्थ्यांनी शिस्तीसह स्वरक्षणाला महत्त्व द्यावे

बल्लारपूर : धावपळीच्या जीवनात घरून रस्त्यावर येताना स्वतः वाहतुकीचे व सुरक्षेचे सर्व नियम पाळणे ही प्रत्येक विद्यार्थ्यांची नैतिक जबाबदारी आहे. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्तीसह स्वरक्षणालाही महत्त्व द्यावे, असे प्रतिपादन येथील मोहसिनभाई जव्हेरी शाळेच्या पटांगणावर रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोपप्रसंगी पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी केले.

प्रसंग होता निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचा. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा कोतकेलवार होत्या. मंचावर उपमुख्याध्यापिका आशा ढेंगळे व इतर शिक्षकांची उपस्थिती होती. शाळेतील विद्यार्थिनी बंडू दीक्षा रामटेके हिला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाल्यामुळे तिचा पोलीस निरीक्षक पाटील यांचे हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

बल्लारपूर पोलीस ठाण्यातर्फे रस्ता सुरक्षा अभियानच्या निमित्ताने वाहतुकीवर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. शहरातील ३०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. उत्कृष्ट निबंध लिहिणाऱ्या दिलासाग्रामच्या महनूर बलवीर माली, तनुश्री सतीश पाटील, श्री बालाजी हायस्कूल बामणीच्या हर्षा रमेश मोहितकर, तसेच प्राजक्ता बोबडे, बुशरा शेख शकूर यांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेसाठी पोलीस ठाण्याचे रवी चेलकुलवार, निलेश माळवे, सतीश पाटील, चंद्रकांत जीवतोडे व सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Students should value self-defense with discipline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.