रूग्णालयातील ४६२ रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेवर ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 05:00 IST2020-09-09T05:00:00+5:302020-09-09T05:00:27+5:30
जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालयात वर्ग १ ची ३२ पदे मंजूर आहे. वर्ग २ - १११, अस्थायी ४३, बीएएमएस -४३, गट अ वर्ग १ - १, गट ब वर्ग २ -१८, वर्ग ३- ६०२, वर्ग ४ - ३११ असे एकूण १०८९ पदे मंजूर आहेत. कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यासाठी लागू केलेल्या आकृतीबंधाला बरेच वर्षे झाले. या कालावधीत जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढली. मात्र शासनाने नवीन आकृतीबंधानुसार कर्मचाऱ्यांची पद भरती केली नाही.

रूग्णालयातील ४६२ रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेवर ताण
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना रूग्णांची संख्या दररोज वाढत असताना ओपीडीतील अन्य रूग्णांचीही संख्या विस्तारली. जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालयांमध्ये तब्बल ४६२ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. जुन्याच आकृतीबंधावर कर्मचारी भरती कायम असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेवर ताण निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालयात वर्ग १ ची ३२ पदे मंजूर आहे. वर्ग २ - १११, अस्थायी ४३, बीएएमएस -४३, गट अ वर्ग १ - १, गट ब वर्ग २ -१८, वर्ग ३- ६०२, वर्ग ४ - ३११ असे एकूण १०८९ पदे मंजूर आहेत. कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यासाठी लागू केलेल्या आकृतीबंधाला बरेच वर्षे झाले. या कालावधीत जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढली. मात्र शासनाने नवीन आकृतीबंधानुसार कर्मचाऱ्यांची पद भरती केली नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रांचाही विस्तार झाला. उपजिल्हा रूग्णालय, ट्रामा केअर युनिट, ग्रामीण रूग्णालयात सुविधांमध्ये वाढ करण्यात आली. परंतु, कर्मचारी भरतीचा आकृतीबंधच अद्याप बदलविण्यात आला नाही. जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दररोज २०० ते २५० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळत आहेत. याशिवाय अन्य रूग्णांचीही झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. कोरोनाचा कहर सुरू असतानाही ओपीडीमध्ये उपचार करणाºया अन्य रूग्णांची संख्या वाढली. मात्र, रिक्त पदे ही सर्वात मोठी समस्या झाली आहे.
पदभरतीविना अडचणी
जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीसीसी सेंटर वाढविले. प्रशिक्षण देवून बऱ्याच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या या केंद्रात करण्यात आल्या. आहेत. अशा परिस्थितीत वर्ग एक-दोन, वर्ग तीन व वर्ग चार श्रेणीतील कर्मचाऱ्यांची पदे भरण्याबाबत सरकारने हालचाली केल्या नाही. त्यामुळे रूग्णसेवा देताना कार्यरत कर्मचाºयांवर मानसिक ताणाला सामोरे जावे लागत आहे.