शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
5
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
6
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
7
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
10
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
11
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
13
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
14
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
15
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
16
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
17
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
18
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
19
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
20
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

वादळाने बत्ती गूल; विद्यार्थ्यांना शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2016 00:16 IST

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असून सोमवारी झालेल्या वादळी पावसाने तर चांगलीच तारांबळ उडाली.

नुकसान लाखोंच्या घरात : राजुरा, सिंदेवाही, सावली, चिमूर तालुके रात्रभर अंधारातचंद्रपूर : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असून सोमवारी झालेल्या वादळी पावसाने तर चांगलीच तारांबळ उडाली. सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी विद्युत खांबावर झाडे कोसळली. त्यामुळे सोमवारची अख्खी रात्रं अंधारात काढावे लागण्याची पाळी राजुरा, सावली, सिंदेवाही, चिमूर आदी शहरातील नागरिकांवर आली. या वादळाचा सर्वाधिक फटका वीज कंपनीला बसला असून लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती आणि ती खरी ठरली. शनिवारपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. रविवारी घुग्घुस येथे गारपीट झाली. तर सोमवारी ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड, मूल, सावली आदी तालुक्यांना मुसळधार वादळी पावसाने झोडपले. या पावसाचा फटका रबी पिकांना बसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वीज कंपनीलाही या वादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे. सिंदेवाही शहरात सोमवारी झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणचे विद्युत खांब उन्मळून पडले. तर अनेक खांबावर झाडे कोसळल्याने तारा तुटल्या. परिणामी वीज पुरवठा खंडीत झाला. सावली व राजुरा येथीलही वीज पुरवठा रात्रभर बंद होता. (स्थानिक प्रतिनिधी)दहावीच्या विद्यार्थ्यांना फटकामंगळवारपासून दहावीच्या परिक्षेला प्रारंभ झाला आहे. मात्र सोमवारच्या रात्री वादळी पाऊस झाल्याने याचा फटका विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागला. वादळामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा रात्रभर बंद होता. परिणामी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी दिव्याचा आधार घ्यावा लागला.