शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

लाडज येथे वादळाचा कहर ३३ घरांना बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:14 PM

वैनगंगेच्या काठावर असलेल्या लाडस गावाला गुरुवारी सायंकाळी वादळाचा जबर तडाखा बसला. चार घरांचे छप्पर उडाले तर २९ घरांचे अंशत: नुकसान झाल्याने संपूर्ण गाव पुन्हा एकदा हादरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : वैनगंगेच्या काठावर असलेल्या लाडस गावाला गुरुवारी सायंकाळी वादळाचा जबर तडाखा बसला. चार घरांचे छप्पर उडाले तर २९ घरांचे अंशत: नुकसान झाल्याने संपूर्ण गाव पुन्हा एकदा हादरले आहे.लाडज हे गाव ब्रह्मपुरीच्या ईशान्येस १० किमी अंतरावर आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे जणू बेट असल्याचे दिसून येते. गावाला चारही बाजूने वैनगंगा नदीने वेढले आहे. पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटतो. गुरुवारी सायंकाळी अचानक वादळाने तडाखा दिल्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. कैलास श्रवण मोहुर्ले, कैलास देवराव अलोने, चक्रधर श्रवण मोहुर्ले, भास्कर हरबा राऊत यांच्या घराचे छप्पर उडाल्याने ते सद्या जि.प. शाळेच्या खोल्यांमध्ये कुटुंबासह आश्रय घेतला आहे. या वादळात २९ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. मोठी झाडे उन्मळून पडली.वादळाचा तडाखा बसल्याने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. शासनाने तातडीने भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जि.प. गटनेते सतीश वारजूकर, जि.प. सदस्य स्मिता पारधी, तहसीलदार विद्यासागर चौहान, मंडळ अधिकारी शरद तुपट, तलाठी किशोर सापटे, वितेश्वर येरमा, हेमराज डांगे आदींनी गावाला भेट देवून आपदग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या.संकटाची टांगती तलवारलाडज गावावर पावसाळ्यात संकटाची टांगती तलवार असते. दरवर्षी पावसाळ्यात वैनगंगा नदीला पूर आल्याने तालुक्याशी संपर्क तुटतो. मागील वर्षी पूर आल्याने डोंग्याचा वापर करावा लागला. दरम्यान, डोंगा उलटल्याने दोघे वाहून गेल्याची घटना घडली होती. गावाच्या संपर्कासाठी पूलाची गरज आहे. पण, जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.वादळाचा तडाखा बसलेल्या चार विस्थापित कुटुंबाना सानुग्राह्य अनुदान तातडीने देण्यात येईल. नियमाप्रमाणे मुल्यांकन करण्याचे काम सुरू आहे. मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही.-विद्यासागर चव्हाण, तहसीलदार ब्रह्मपुरी