शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

जलद बस थांब्यासाठी रस्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 11:14 PM

तालुक्यातील विसापूर सर्वात मोठे गाव आहे. विसापूर फाट्यापासून गावाचे अंतर दोन किमीचे आहे. या फाट्यावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांनी जलद व अती जलद बसेससाठी थांबा मंजूर केला. मात्र चालकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो.

ठळक मुद्देचालकांची मनमानी : विसापूर फाट्यावर रोखली बस

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : तालुक्यातील विसापूर सर्वात मोठे गाव आहे. विसापूर फाट्यापासून गावाचे अंतर दोन किमीचे आहे. या फाट्यावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांनी जलद व अती जलद बसेससाठी थांबा मंजूर केला. मात्र चालकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. याकडे लक्ष वेधण्यासाठी विसापूर फाट्यावर सोमवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडोवर नागरिकांनी सहभाग घेतला.चंद्रपूर-बल्लारपूर राज्य महामार्गावरुन विसापूर फाटा ओलांडून राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर, राजुरा, चिमूर, वरोरा, ब्रह्मपुरी, अहेरी व गडचिरोली आगाराच्या शेकडोवर बसेसचे आवागमन दररोज होत आहे. सर्वसाधारण, जलद व अति जलद बस थांबा २८ नोव्हेंबर २००८ रोजी विसापूर फाटा येथे मंजूर करण्यात आला. परंतु, संबंधीत आगारातील चालक जाणीवपूर्वक जलद व अती जलद बस थांबवित नाही. परिणामी ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी सोमवारी शेकडोवर नागरिकांनी रस्ता अडवून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस रोकल्या.चंद्रपूर जिल्ह्याचे ठिकाण असून दररोज शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, रोजगारासाठी ये-जा करणारे प्रवाशी, नोकरदार वर्ग, व्यापारी व सामान्य जनतेला जलद व अति जलद बस विसापूर फाट्यावर थांबवित नसल्याने अडचण सहन करावी लागते. परिणामी गावकºयांचा असंतोष वाढला. यावर कायमचा तोडगा निघावा म्हणून विसापूर येथील शिवाजी चौकातील मंचावर सभा घेण्यात आली.महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलीप खैरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत आयोजक नरेंद्र इटनकर, माजी सरपंच बंडू गिरडकर, शालीकराव भोजेकर, बबन परसूटकर, शशीकांत पावडे, रमेश लिंगमपल्लीवार, नत्थू ठाकरे, अनेकश्वर मेश्राम, महेंद्र सोरते, सुभाष हरणे, वामन गौरकार, योगेश्वर टोंगे, प्रदीप लांडगे, क्रांतीकुमार भोजेकर, अरुण बहादे आदी समर्थन मिळवून आंदोलन व्यापक करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. यावेळी गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.निवेदनाकडे केले जात होते दुर्लक्षविसापूर फाटा येथे जलद व अति जलद बसला थांबा मिळाला. मात्र चालकांकडून अंमलबजावणी केली जात नाही. यामुळे गावकºयात असंतोष बळावला. येथील कार्यकर्ता नरेंद्र इटनकर यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांना निवेदन सादर करून समस्या सोडविण्याची विनंती केली. त्यांनी पाठपुरावा करूनही राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी लक्ष देत नव्हते. परिणामी गावकºयांचा संयम सुटला. नेहमीसाठी जलद व अतीजलद बसेस थांबाव्या म्हणून गावकºयांनी सोमवारी आंदोलनाचे हत्यार पुढे करून अधिकाºयांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.