पारधीगुडा मंगी रस्त्याने शेतात जाणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:01:37+5:30

राजुरा तालुक्यातील पारधीगुडा-मंगी हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. शेतकरी व गावकऱ्यांनी अडचण लक्षात घेता हा रस्ता मंजूर करण्यात आला. त्या रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले असून या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. हा रस्ता तयार करताना कंत्राटदाराने खर्च वाचविण्यासाठी दुसऱ्या ठिकाणाहून माती न आणता रस्त्याच्या बाजूला मोठी नाली काढून त्या नालीतील माती रस्त्यावर टाकली आहे.

Stop going to the field by Pardhiguda Mangi road | पारधीगुडा मंगी रस्त्याने शेतात जाणे बंद

पारधीगुडा मंगी रस्त्याने शेतात जाणे बंद

ठळक मुद्देतीन गावातील शेतकऱ्यांना अडचण : बांधकामही निकृष्ट दर्जाचे, सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : पारधीगुडा-मंगी रस्त्याचे सुरू असलेले बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. कंत्राटदार थातूरमातूर बांधकाम करीत असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याशिवाय या रस्त्यामुळे पाचगाव, पारधीगुडा, मंगी येथील ५० ते ६० शेतकऱ्यांची शेतात जाण्याची वाटच बंद झाली आहे. सबंधित विभागाने रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी पाचगावचे उपसरपंच गोपाल जंबूलवार व गावकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीने निवेदन दिले आहे.
राजुरा तालुक्यातील पारधीगुडा-मंगी हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. शेतकरी व गावकऱ्यांनी अडचण लक्षात घेता हा रस्ता मंजूर करण्यात आला. त्या रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले असून या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. हा रस्ता तयार करताना कंत्राटदाराने खर्च वाचविण्यासाठी दुसऱ्या ठिकाणाहून माती न आणता रस्त्याच्या बाजूला मोठी नाली काढून त्या नालीतील माती रस्त्यावर टाकली आहे. या मार्गावरील नाल्यात थातूरमातूर सिमेंट पाईप टाकून काम करण्यात आले आहे. पावसाळ्यात हा रस्ता वाहून जाण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूला मोठी नाली काढल्याने या परिसरात शेती करणाºया पाचगाव, पारधीगुडा, मंगी येथील शेतकºयांना शेतात जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. रस्ता बांधकाम करताना रस्ता खचून जाऊ नये म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूला मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. कंत्रादारांकडून नाली बांधकाम करून त्यावर छोटा सिमेंट काँक्रीट रपटा बांधणे गरजेचे होते. परंतू चांगल्या कामांना बगल देत निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सध्या शेतीचा हंगाम सुरु झाला आहे. शेतकरी विविध अवजारे घेऊन शेतात जात असतात. मात्र या रस्त्या बंद झाल्याने शेतकºयांना मोठी अडचण जात आहे. खरीप हंगामपूर्वीच या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला परिसरातील शेतकऱ्याच्या स्वाक्षरीने दिलेल्या निवेदनातून केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदाराच्या गलथान कारभारामुळे पाचगाव, पारधीगुडा, मंगी येथील ५० ते ६० शेतकऱ्याची शेतात जाण्याची वाटच बंद झाली आहे. रस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे होत असल्याने या बांधकामाची सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानी चौकशी करावी.
-गोपाल जंबूलवार,
उपसरपंच, पाचगाव ग्रामपंचायत.

Web Title: Stop going to the field by Pardhiguda Mangi road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती