शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

पाणी एटीएम मशीन सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:21 IST

गावागावात अस्वच्छता वाढली चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. परंतु जिल्ह्यातील काही गावांमध्ये अस्वच्छता ...

गावागावात अस्वच्छता वाढली

चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. परंतु जिल्ह्यातील काही गावांमध्ये अस्वच्छता बघायला मिळत आहे. काही नागरिकांनी शोषखड्डे केले आहे. मात्र तेही तुडूंब भरल्यामुळे यातील पाणी रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

वृक्षतोडीला प्रतिबंध घालण्याची मागणी

चंद्रपूर : वनविभाग व विविध सामाजिक संघटनेच्यावतीने नागरिकांमध्ये वृक्षतोड न करण्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. परंतु जिल्ह्यातील काही ठिकाणी वृक्षतोड केली जात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात काही जण पावसाळ्यापूर्वी सरपणासाठी वृक्षतोड करतात.

हागणदारीमुक्तीचा फज्जा

चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये विशेषत: दुर्गम तालुक्यातील अनेक गावांमध्ये हागणदारीमुक्तीचा फज्जा झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यातच गुडमार्निंग पथकही गायप झाले आहे.काही गावात नागरिक रस्त्याच्या मुख्य मार्गावरच उघड्यावर शौचास बसत आहेत. याकडे संबंधित विभागाच्या नागरिकांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

तलाठी नसल्याने नागरिक त्रस्त

चंद्रपूर: सध्या शेतीच्या कामाची लगबग सुरु आहे. मात्र जिल्ह्यातील काही गावांमध्ये तलाठीच नसल्याने शेतकऱ्यांन त्रास सहन करावा लागत आहे. संबधित विभागाने दखल घेऊन येथे तलाठ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

जीम सुरू करण्याची परवानगी द्या

चंद्रपूर : कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यात जीम संचालकांनाही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. त्यामुळे जीम केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी जीम व्यावसायिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, लॉकडाऊननंतर अनेकांची जीममध्ये व्यायाम करण्याची सवयही तुटली आहे.

कचरा संकलकांचे वेतन वाढवा

चंद्रपूर : शहरातील कचरा संकलित करणाऱ्यांना अत्यल्प वेतन दिल्या जात असल्यामुळे त्यांना कुटुंबाचे पालन पोषण करताना मोठा आर्थिक त्रास सहन करावा लागतो. लॉकडाऊनच्या काळामध्येही त्यांनी आपले कार्य चोखपणे बजावले आहे. त्यामुळे शहरातील कचरा संकलकांचे वेतन वाढवून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.