शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

एसटी कर्मचाऱ्यांनी मागितले स्वेच्छा मरण, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2021 14:36 IST

एसटी कामगारांच्या राज्यव्यापी संपावर सरकारने अजूनही तोडगा काढला न काढल्याने कर्मचाऱ्यांनी सोमवारी स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्दे६० दिवसांनंतरही संप सुरुच

चंद्रपूर : दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या राज्यव्यापी संपावर सरकारने अजूनही तोडगा काढला न काढल्याने कर्मचाऱ्यांनी सोमवारी स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.

चंद्रपूर आगारातून सुरू झालेल्या कामगारांच्या संपाला दोन महिने होत आहेत. राज्यात एसटी कामगारांवर होणाऱ्या प्रत्येक कारवाईची सुरुवात चंद्रपूर विभागीय आगारातून होत आहे. राज्यात सर्वप्रथम निलंबनाचे आदेश असो की बडतर्फीचे अथवा बदलीची सर्वच कारवाई चंद्रपूर विभागीय आगाराने केली, असा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, या जिद्दीने पेटलेल्या कामगारांनी आता थेट स्वेच्छा परवानगी मागितली आहे.

चंद्रपूर विभागीय आगारातील कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले. अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून शाहेस्ता साहिल, ललिता अहिरकर, अमोल पडगेलवार, गजानन भवणे, दिनदास चामाटे, अजाबराव मेश्राम, संजय पटले, सौरभ हिंगमिरे, निखारे, अमृत किंनाके, अरविंद धोटे, प्रकाश फटिंग, राजू दांडेकर उपस्थित होते.

कौटुंबिक संबंधात वाढला तणाव

कोविड काळातही जीव मुठीत घेऊन कर्तव्य बजावले. मात्र, न्याय मिळाला नाही. आता कामगारांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले. कौटुंबिक संबंधात तणाव निर्माण होत आहे. कमी पगारात अधिक कार्य करणे, लहान चुकीसाठी मोठा आर्थिक भुर्दंड भरणे, अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शिक्षेला सामोरे जाणे हे प्रकार थांबले नाहीत, असा संघटनेचा आरोप आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपEmployeeकर्मचारीagitationआंदोलनstate transportएसटी