शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

एसटी कर्मचाऱ्यांनी मागितले स्वेच्छा मरण, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2021 14:36 IST

एसटी कामगारांच्या राज्यव्यापी संपावर सरकारने अजूनही तोडगा काढला न काढल्याने कर्मचाऱ्यांनी सोमवारी स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्दे६० दिवसांनंतरही संप सुरुच

चंद्रपूर : दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या राज्यव्यापी संपावर सरकारने अजूनही तोडगा काढला न काढल्याने कर्मचाऱ्यांनी सोमवारी स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.

चंद्रपूर आगारातून सुरू झालेल्या कामगारांच्या संपाला दोन महिने होत आहेत. राज्यात एसटी कामगारांवर होणाऱ्या प्रत्येक कारवाईची सुरुवात चंद्रपूर विभागीय आगारातून होत आहे. राज्यात सर्वप्रथम निलंबनाचे आदेश असो की बडतर्फीचे अथवा बदलीची सर्वच कारवाई चंद्रपूर विभागीय आगाराने केली, असा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, या जिद्दीने पेटलेल्या कामगारांनी आता थेट स्वेच्छा परवानगी मागितली आहे.

चंद्रपूर विभागीय आगारातील कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले. अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून शाहेस्ता साहिल, ललिता अहिरकर, अमोल पडगेलवार, गजानन भवणे, दिनदास चामाटे, अजाबराव मेश्राम, संजय पटले, सौरभ हिंगमिरे, निखारे, अमृत किंनाके, अरविंद धोटे, प्रकाश फटिंग, राजू दांडेकर उपस्थित होते.

कौटुंबिक संबंधात वाढला तणाव

कोविड काळातही जीव मुठीत घेऊन कर्तव्य बजावले. मात्र, न्याय मिळाला नाही. आता कामगारांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले. कौटुंबिक संबंधात तणाव निर्माण होत आहे. कमी पगारात अधिक कार्य करणे, लहान चुकीसाठी मोठा आर्थिक भुर्दंड भरणे, अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शिक्षेला सामोरे जाणे हे प्रकार थांबले नाहीत, असा संघटनेचा आरोप आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपEmployeeकर्मचारीagitationआंदोलनstate transportएसटी