शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

श्रीलंकेचा कर्णधार दोन सामन्यातून निलंबित, प्रत्येक खेळाडूला 60 टक्के दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 17:50 IST

या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला श्रीलंकेकडून पराभूत व्हावे लागले होते.

कोलंबो -  निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेत आज भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरेल. त्यापूर्वीच भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चांदीमलला दोन सामन्यासाठी निलंबित केलं आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला श्रीलंकेकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशवर विजय मिळवला होता. पण शनिवारी मात्र श्रीलंकेला बांगलादेशविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती अत्यंत कमी राखल्याबद्दल आयसीसीनं  दिनेश चांदीमलला दोन सामन्यासाठी निलंबित केलं आहे. त्यामुळं दिनेश चांदीमल निदाहास चषकात पुढील दोन सामने खेळू शकणार नाही. निर्धारित वेळेत श्रीलंकेच्या संघाने चार षटके कमी टाकल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.  श्रीलंकेचा संघ आज 12 मार्चला भारताशी आणि 16 मार्चला बांगलादेशशी खेळणार आहे. परंतु या सामन्यांमध्ये चंडिमलला खेळता येणार नाही.  

आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी चंडिमलवर कारवाई करताना निलंबन आणि दंडसुद्धा ठोठावला आहे. निर्धारित वेळेपेक्षा एक षटक उशीरा टाकल्यामुळं बांगलादेशचा कर्णधार महमदुल्लावर सामन्याच्या मानधनाच्या 20 टक्के आणि अन्य खेळाडूंना 10 टक्के दंड ठोठावला आहे. 

आयसीसीच्या खेळाडूंच्या आचारसंहितेसंदर्भातील षटकांची गती कमी राखल्याबद्दलच्या कलम 2.5.2 चा भंग झाला असल्यामुळे सर्व खेळाडूंच्या सामन्याच्या मानधनातून 60 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. चंडिमलच्या खात्यावर दोन निलंबनाचे गुण जमा झाले. याचाच अर्थ एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय किंवा दोन ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये खेळण्यास त्याला बंदी असते.

काय आहे नियम - निर्धारित वेळेपेक्षा षटकांची गती कमी राखल्यास 2 निलंबनाचे गुण मिळतात. असे कोणी दोषी आढळल्यास एक कसोटी किंवा दोन वनडे किंवा दोन टी-20 साठी कर्णधाराला निलंबित केलं जात. त्याचप्रमाणे खेळाडूला 60 टक्केपर्यंतची रक्कम मानधनातून कपात केली जाते.  

प्रतिस्पर्धी संघभारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), लोकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), दीपक हुड्डा, वाश्ािंग्टन सुंदर, यजुवेंंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज आणि रिषभ पंत (विकेटकीपर).

श्रीलंका :  सूरंगा लकमल (कर्णधार), उपुल थरंगा, धनुष्का गुणतिलक, कुसाल मेंडिस, दासुन शनाका, कुसाल जनिथ परेरा, तिसारा परेरा, जीवन मेंडिस, इसुरू उदाना, अकिला धनंजय, अमिला अपोंसो, नुआन प्रदीप, दुष्मंत चामीरा, धनंजय डि सिल्वा. 

टॅग्स :Nidahas Trophy 2018निदाहास ट्रॉफी २०१८Sri Lankaश्रीलंकाBCCIबीसीसीआयTeam Indiaभारतीय क्रिकेट संघRohit Sharmaरोहित शर्मा