आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी खेळ महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:56 IST2020-12-04T04:56:18+5:302020-12-04T04:56:18+5:30
विसापूर : आयुष्याच्या वाटचालीत क्रीडा स्पर्धा महत्त्वाची आहे. यामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राखता येते. सांघिक ...

आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी खेळ महत्त्वाचे
विसापूर : आयुष्याच्या वाटचालीत क्रीडा स्पर्धा महत्त्वाची आहे. यामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राखता येते. सांघिक भावनेतून खेळाचे प्रदर्शन केल्यास उत्कृष्ट खेळाडू बनतात, असे मत सामाजिक कार्यकर्ते संतोष निपुंगे यांनी व्यक्त केले.
स्व. श्रद्धा अशाेक ठुणेकर स्मृतीप्रित्यर्थ आयोजित विसापूर येथे क्रिकेट सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा युवा सेना उपजिल्हा प्रमुख प्रदीप गेडाम होते. प्रमुख अतिथी म्हणून बल्लारपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती अनेकश्वर मेश्राम, पॉवर हिटर क्रिकेट क्लबचे अध्यक्ष अशांक ठुणेकर, उपाध्यक्ष राेहित वाढई, सचिव महेंद्र काेडापे, काेषाध्यक्ष मनिष धुर्वे, गाैरव सुरपाम, अजय उईके, क्रीडा प्रमुख रवि माेटघरे यांची उपस्थिती हाेती. विजेता संघाला ७ हजार ७७७ रूपये व उपविजेता संघाला ५ हजार ५५५ रूपये बक्षीस देण्यात येणार आहे. संचालन सुरज टाेमटे यांनी केले.