शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: February 28, 2016 01:09 IST

शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत, सर्वसामान्य नागरिकांना डोळयासमोर ठेवून सुरु करण्यात आलेल्या ...

सुधीर मुनगंटीवार : सामाजिक न्यायच्या योजनांबाबत मार्गदर्शन कार्यशाळाचंद्रपूर : शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत, सर्वसामान्य नागरिकांना डोळयासमोर ठेवून सुरु करण्यात आलेल्या या योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहचल्या पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने कन्यका परमेश्वरी देवस्थानच्या सभागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम व समाज कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एल. थूल उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, उपाध्यक्षा कल्पना बोरकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, समाज कल्याण सभापती निलकंठ कोरांगे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, समाज कल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम आदी उपस्थित होते. अजूनही अनेक जण हलाखीचे जीवन जगत असल्याचे आढळून येते. अशांना जगण्याच्या चांगल्या संधी उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी घटनेतील मार्गदर्शक सूचनेनुसार शासनाची आहे. त्यामुळेच शासन विविध प्रकारच्या योजना राबवीत असते, असे असले तरी अजूनही या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचलेल्या नाहीत. ज्या ज्या समाजासाठी योजना तयार करण्यात आल्या आहेत, त्या त्या समाजातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहचली पाहिजे व त्यासाठी चांगले नियोजन केले पाहिजे, असे ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.राज्य शासनाने गेल्या काही दिवसात अनेक चांगले निर्णय घेतले, इंदू मिलच्या जागेचा प्रश्न सोडविला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक या ठिकाणी उभे राहणार आहे. हे स्मारक कायम समाजाला प्रेरणा देत राहील. माता रमाईच्या गावाचासुध्दा विकास केला जाणार असून हे गांव आदर्श बनविले जाणार आहे. लंडन येथे बाबासाहेब आंबेडकरांची राहती वास्तु शासनाने घेतली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन प्रत्येकाने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कार्यरत राहिले पाहिजे. शासनात काम करणाऱ्या प्रत्येकाने आपण सामान्यांसाठी आहोत, याची जाणीव ठेवून काम करावे, असे ते म्हणाले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते तथा नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कल्पना बनसोड यांनी केले तर आभार समाज कल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)