शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
6
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
7
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
8
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
9
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
10
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
11
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
12
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
13
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
14
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
15
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
16
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
17
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
18
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
19
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
20
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न

मानव-वन्यजीव संघर्ष टाळताना अधिकारी-नागरिकांमध्ये संघर्षाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 05:00 IST

शासनाने विशेष चमू तयार करून अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. ब्रह्मपुरी वनविभागाचा विस्तार फार मोठा आहे. जवळपास ११४ वाघ, ११० बिबट यासह हरीण, काळवीट, सांबर, चितळ, मोर, राणगवा, अस्वल आदी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. मानव - वन्यजीव संघर्ष ही नित्याचीच बाब आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी वनविभागाला संरक्षित क्षेत्र घोषित करुन पर्यटन क्षेत्र निर्माण करण्याची मागणी आहे.

दत्तात्रय दलाललोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : मानव-वन्यजीव संघर्ष थांबविण्यासाठी ब्रह्मपुरी वनविभागाला संरक्षित क्षेत्र घोषित करून इको-टुरिझम निर्माण करण्यात येणार आहे. यासोबतच विविध योजना राबवून जंगलव्याप्त गावांचा विकास करण्यात येणार आहे. गरजेपोटी काहींनी तर काहींनी मुद्दाम जंगलव्याप्त भागात अतिक्रमण करुन शेती केली आहे. हे अतिक्रमण काढणे वनविभागाला जिकिरीचे ठरणार आहे. अतिक्रमण काढताना अधिकारी व नागरिक असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. शासनाने विशेष चमू तयार करून अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. ब्रह्मपुरी वनविभागाचा विस्तार फार मोठा आहे. जवळपास ११४ वाघ, ११० बिबट यासह हरीण, काळवीट, सांबर, चितळ, मोर, राणगवा, अस्वल आदी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. मानव - वन्यजीव संघर्ष ही नित्याचीच बाब आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी वनविभागाला संरक्षित क्षेत्र घोषित करुन पर्यटन क्षेत्र निर्माण करण्याची मागणी आहे. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते.  वृत्ताची दखल घेत मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी इको - टुरिझम निर्माण करण्यासाठी विशेष सभा घेतली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर प्रस्ताव नुकताच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात या परिसराचा कायापालट होणार आहे. यासाठी अतिक्रमण काढणे अत्यावश्यक ठरणार आहे. वनविभाग कारवाई करत असताना स्थानिक नागरिक व वनविभागाचे अधिकारी असा संघर्ष निर्माण होऊ शकतो

जंगलव्याप्त भागात जनजागृती करणे आवश्यकजंगलव्याप्त भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांची जनजागृती करुन जंगलालगतची शेती नागरिकांनी करु नये. यासाठी दहा हजार रुपयांचा निधी शासनाकडून देण्यात येणार असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे जीवावर उदार होऊन ही शेती करु नये. यासाठी जनजागृती करण्यात यावी. तेव्हाच मानव - वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मोलाचे सहकार्य नागरिकांकडून मिळण्यास मदत होऊ शकेल.

 

टॅग्स :forest departmentवनविभागEnchroachmentअतिक्रमण