जातीमुळेच झाली देशाची माती
By Admin | Updated: April 25, 2016 00:46 IST2016-04-25T00:46:57+5:302016-04-25T00:46:57+5:30
आपल्या देशामध्ये हजारो वर्षांपासून जाती व्यवस्था टिकून असल्यामुळे माणूस माणसापासून दुरावला गेला.

जातीमुळेच झाली देशाची माती
दिलीप सोळंके : गडचांदुरात व्याख्यानमाला
गडचांदूर : आपल्या देशामध्ये हजारो वर्षांपासून जाती व्यवस्था टिकून असल्यामुळे माणूस माणसापासून दुरावला गेला. या दुराव्यामुळे देशाच्या प्रगतीमध्ये फार मोठा अडथळा निर्माण झाला. याचा माणसाच्या वैचारिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक बाबींवर फार मोटा विपरीत परिणाम झाला. त्यामुळे ही जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपुर्ण आयुष्य खर्ची घातले आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुतेचा विचार मांडून फार मोठी सामाजिक क्रांती केली. तसेच देशामध्ये बहुजनांची सत्ता आणावयाची असेल तर राजकिय संघटनापेक्षा सामाजिक संघटन अधिक मजबूत करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन अंनिसचे महाराष्ट्र संघटक दिलीप सोळंके यांनी येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रजत जयंती निमित्य गडचांदूर येथे २१ एप्रिल रोजी आयोजित व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंनिसचे जिल्हा संघटक अनिल दहेगावकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी यांनी मार्गदर्शन केले.
नगराध्यक्ष विद्या कांबळे, अंनिसचे जिल्हा सचिव धनंजय तावाडे, दशरथ डांगे, कवडू सोनडवले, सोमेश्वर सोनकांबळे, महेंद्र ताकसांडे, कीर्तीकुमार करमनकर, कविकर निरंजने, बापुराव चुनारकर, मारोती लोखंडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन रवी ताकसांडे, प्रास्ताविक किशोर नगराळे तर आभार प्रा. प्रशांत खैरे यांनी मानले.
याप्रसंगी अं.नि.स. गडचांदूर शहर कार्यकारणी स्थापन करण्यात येऊन नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्याख्यानमालेच्या कार्यक्रमानंतर भीमशाहीर बाबुराव गाडेकर आणि संच यांनी सामाजिक परिवर्तनवादी प्रबोधनाचा संगीतमय बहारदार कार्यक्रम सादर केला.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गडचांदूर आणि भिमसेना बहुउद्देशिय संस्था गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ललेंद्र गेडाम, विक्की मुन, सुरज ताडे, समाधान सोनकांबळे, सचिन सोनटक्के, राहुल उमरे, प्रफुल रामटेके, प्रकाश ताडे, देवानंद मून, पंकज गावंडे, प्रज्ञापाल मुन, प्रकाश मून, दिलीप खैरे, शाकेश उमरे, शैलेश चांदेकर, पंडीत डोंगरे आणि इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)