शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सासु-सुनांच्या नात्याबद्दल दिला सामाजिक संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 10:26 PM

जन्माला येईल ते उत्तमच असत, त्याची जपणूक मात्र महत्त्वाची असते. त्यातल्या त्यात नाते तर जपलेच पाहिजे. पण दुर्दैवाने आज नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे. संवेदना बोथट झाल्या आहेत.

ठळक मुद्देसासु-सासऱ्यांनी एकमेकांना भरविला सगुण घास : चिरादेवी येथे अनोखा लग्न सोहळा

सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : जन्माला येईल ते उत्तमच असत, त्याची जपणूक मात्र महत्त्वाची असते. त्यातल्या त्यात नाते तर जपलेच पाहिजे. पण दुर्दैवाने आज नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे. संवेदना बोथट झाल्या आहेत. कुटुंबामधील सासु-सुनांच ‘सख्य’ तर सर्वश्रृत आहे. परंतु, सुनांनी घडवून आणलेल्या सासु-सासºयांच्या लग्न सोहळ्याने एक अनोखा अनुभव चिरादेवी वासीयांना अनुभवायला मिळाला. सासु-सुनांच नात कस असाव, हा सामाजिक संदेश या लग्न सोहळ्यातून देण्यात आला. लग्नाप्रसंगी सासु-सासºयांनी एकमेकांना भरवलेल्या सगुण घासाचा प्रसंग तर खरच आनंददायी ठरला. सोबतच नात्यांची सुंदरता समोर आली.भद्रावती तालुक्यातील चिरादेवी येथील हनुमान ठाकरे (६८) व रेवता हनुमान ठाकरे (६०) यांच्या लग्नाचा ४५ वा वाढदिवस साजरा करण्याचे कुटुंबाने ठरवले. या कार्याची जबाबदारी त्यांच्या दोन सुनांनी घेतली. त्याला त्यांच्या दोन मुलींचेही सहकार्य लाभले. हयात असताना सासु-सासºयांना आनंद द्यावा, या भावनेतून लग्नाच्या वाढदिवशी त्यांचे पुन्हा लग्न लावायचे ठरले. रितीरिवाज, रूढी, परंपरेनुसार हा अनोखा लग्नसोहळा पार पडला. यामधून सासु-सासºयांच्या प्रती सुनांचे असलेले आदर व प्रेम व्यक्त झाले.लग्नाचे सर्व सोपस्कार करण्यात आले. आदल्या दिवशी मेहंदीचा तर दुसºया दिवशी हळदीचा कार्यक्रम पार पडला. वधु-वरांना बाशिंग बांधण्यात आले. वराला हनुमान मंदिरापर्यंत नेवून परिसरातून मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. लग्न सोहळ्यात मंगलाष्टके झालीत. हळदीच्या वेळेस वर-वधूच्या मागे नातू व नातीला त्यांचे आईवडील म्हणून बसविण्यात आले. दुप्पटा ेनातवांनी पकडला. संपूर्ण चिरादेवी गावाला जेवणाच आमंत्रण देण्यात आले होते. जयश्री वासुदेव ठाकरे व लक्ष्मी मोहन ठाकरे या दोन्ही सुनांनी सासु-सासºयांच्या या लग्न सोहळ्याची संकल्पना पुढे आणली. मंदा श्रीकृष्ण वरखडे व रंजना दिलीप सूर या ठाकरे कुटुंबियांच्या मुलींनी या कार्याला सहकार्य केले.या लग्नसोहळ्याची माहिती आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत नव्हती. आमच्या सुना व मुलींनी हा आगळावेगळा सोहळा घडवून आणला. आमच्या सुना म्हणजे आमच्या मुलीच आहे. सासु-सुनांच नात प्रत्येक कुटुंबात असच राहो, हीच आमची अपेक्षा आहे.- हनुमान ठाकरे, रेवता ठाकरेरा. चिरादेवी