शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

सासु-सुनांच्या नात्याबद्दल दिला सामाजिक संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 22:26 IST

जन्माला येईल ते उत्तमच असत, त्याची जपणूक मात्र महत्त्वाची असते. त्यातल्या त्यात नाते तर जपलेच पाहिजे. पण दुर्दैवाने आज नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे. संवेदना बोथट झाल्या आहेत.

ठळक मुद्देसासु-सासऱ्यांनी एकमेकांना भरविला सगुण घास : चिरादेवी येथे अनोखा लग्न सोहळा

सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : जन्माला येईल ते उत्तमच असत, त्याची जपणूक मात्र महत्त्वाची असते. त्यातल्या त्यात नाते तर जपलेच पाहिजे. पण दुर्दैवाने आज नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे. संवेदना बोथट झाल्या आहेत. कुटुंबामधील सासु-सुनांच ‘सख्य’ तर सर्वश्रृत आहे. परंतु, सुनांनी घडवून आणलेल्या सासु-सासºयांच्या लग्न सोहळ्याने एक अनोखा अनुभव चिरादेवी वासीयांना अनुभवायला मिळाला. सासु-सुनांच नात कस असाव, हा सामाजिक संदेश या लग्न सोहळ्यातून देण्यात आला. लग्नाप्रसंगी सासु-सासºयांनी एकमेकांना भरवलेल्या सगुण घासाचा प्रसंग तर खरच आनंददायी ठरला. सोबतच नात्यांची सुंदरता समोर आली.भद्रावती तालुक्यातील चिरादेवी येथील हनुमान ठाकरे (६८) व रेवता हनुमान ठाकरे (६०) यांच्या लग्नाचा ४५ वा वाढदिवस साजरा करण्याचे कुटुंबाने ठरवले. या कार्याची जबाबदारी त्यांच्या दोन सुनांनी घेतली. त्याला त्यांच्या दोन मुलींचेही सहकार्य लाभले. हयात असताना सासु-सासºयांना आनंद द्यावा, या भावनेतून लग्नाच्या वाढदिवशी त्यांचे पुन्हा लग्न लावायचे ठरले. रितीरिवाज, रूढी, परंपरेनुसार हा अनोखा लग्नसोहळा पार पडला. यामधून सासु-सासºयांच्या प्रती सुनांचे असलेले आदर व प्रेम व्यक्त झाले.लग्नाचे सर्व सोपस्कार करण्यात आले. आदल्या दिवशी मेहंदीचा तर दुसºया दिवशी हळदीचा कार्यक्रम पार पडला. वधु-वरांना बाशिंग बांधण्यात आले. वराला हनुमान मंदिरापर्यंत नेवून परिसरातून मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. लग्न सोहळ्यात मंगलाष्टके झालीत. हळदीच्या वेळेस वर-वधूच्या मागे नातू व नातीला त्यांचे आईवडील म्हणून बसविण्यात आले. दुप्पटा ेनातवांनी पकडला. संपूर्ण चिरादेवी गावाला जेवणाच आमंत्रण देण्यात आले होते. जयश्री वासुदेव ठाकरे व लक्ष्मी मोहन ठाकरे या दोन्ही सुनांनी सासु-सासºयांच्या या लग्न सोहळ्याची संकल्पना पुढे आणली. मंदा श्रीकृष्ण वरखडे व रंजना दिलीप सूर या ठाकरे कुटुंबियांच्या मुलींनी या कार्याला सहकार्य केले.या लग्नसोहळ्याची माहिती आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत नव्हती. आमच्या सुना व मुलींनी हा आगळावेगळा सोहळा घडवून आणला. आमच्या सुना म्हणजे आमच्या मुलीच आहे. सासु-सुनांच नात प्रत्येक कुटुंबात असच राहो, हीच आमची अपेक्षा आहे.- हनुमान ठाकरे, रेवता ठाकरेरा. चिरादेवी