शेतकऱ्यांना गवसले कलम बांधणीचे कौशल्य
By Admin | Updated: August 15, 2015 01:26 IST2015-08-15T01:26:41+5:302015-08-15T01:26:41+5:30
लोकसमग्रह समाज सेवा संस्था बल्लारपूरच्या व आईजी एसएसएस अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिविका विकास प्रकल्पाच्या माध्यमातून ....

शेतकऱ्यांना गवसले कलम बांधणीचे कौशल्य
जिवती : लोकसमग्रह समाज सेवा संस्था बल्लारपूरच्या व आईजी एसएसएस अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिविका विकास प्रकल्पाच्या माध्यमातून उपजिविका प्रकल्पा अंतर्गत मौजा देवाडा येथे शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. यात शेतकऱ्यांना कलम बांधण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या अभ्यासदौऱ्यात कृषी सहायक कटरे यांनी गांडूळ खत खड्डे निर्मिती व पुनर्वसन, सेंद्रीय खत, गोमुत्र, शेण पालापाचोळा यांचे मिश्रण तयार करुन पिकांवरील फवारणी याविषयी माहिती देऊन वेगवेगळ्या झाडांपासून वेगवेगळ्या वृक्षकलमा तयार करण्याची पद्धती यावर माहिती देऊन त्याचे प्रात्यक्षिक दाखविले. यामध्ये आंबाकलम व त्याचे प्रकार बोर कलम प्या ज बडींग डाळींब- गुंटी कलम, गुलाब एक गाफ्टींग, दाबकलम, जांबकलम, नागीन आंबाकलम इत्यादी कलमाचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये संस्थेचे संचालक जोबीन ओवेलील यांनी शेतकऱ्यांच्या स्वत:च्या बुद्धीचा विकास करुन शेती कशी करावी आणि झाडांची जोपासणा, कशी करावी यावर माहिती दिली. मार्गदर्शक अर्जून अलगमकर यांनी शेतीविकास मानव विकास, पाण्याची व्यवस्था सिंचनव्यवस्था, बांधबंदिस्ती, साठवण तलाव शेतीला नवीन जोडधंदा होण्यासाठी प्रयत्नरत असणे, यावर माहिती दिली. संचालन आनंद मोहुर्ले यांनी केले. यातूनच जिवती तालुक्यातील १५ गावातील शेतकऱ्यांनी कलम बांधायचे कौशल्य आत्मसात केली. (तालुका प्रतिनिधी)