तीन दिवसांपासून रुग्णवाढीची गती मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 05:00 IST2020-10-05T05:00:00+5:302020-10-05T05:00:25+5:30
रविवारी जिल्ह्यात चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, भद्रावती येथील ६७ वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. दुसरा मृत्यू साईबाबा वार्ड, बल्लारपूर येथील ५९ वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. तिसरा मृत्यू आकाशवाणी चौक, चंद्रपूर येथील ६८ वर्षीय महिलेचा तर, चवथा मृत्यू बालाजी वार्ड, चंद्रपूर येथील ५० वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६७ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी जिल्ह्यातील १५८ रुग्णांचा समावेश आहे.

तीन दिवसांपासून रुग्णवाढीची गती मंदावली
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये रविवारी आणखी १५९ कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ११ हजार २६ वर पोहोचली आहे. आतापर्यंत अतिशय झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत होते. मात्र मागील आठवडाभर जनता कर्फ्यू असल्याने रुग्णवाढीची गती मंदावली आहे. त्यामुळे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या तीन हजार ३०१ असून आतापर्यंत सात हजार ५५८ बाधित कोरोनातून बरे झाले आहेत. रविवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील ७७, बल्लारपूर तालुक्यातील १४, चिमूर - आठ, जिवती तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील सहा, ब्रह्मपुरी तालुक्यातील सहा, नागभीड तालुक्यातील पाच, वरोरा तालुक्यातील १०, भद्रावती तालुक्यातील १०, सावली तालुक्यातील १०, सिंदेवाही तालुक्यातील आठ, भंडारा व पुणे येथील प्रत्येकी दोन असे एकूण १५९ बाधित पुढे आले आहे. नागरिकांनी आणखी नियमांचे पालन केल्यास बाधितांची संख्या कमी होईल.
चार जणांचा मृत्यू
रविवारी जिल्ह्यात चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, भद्रावती येथील ६७ वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. दुसरा मृत्यू साईबाबा वार्ड, बल्लारपूर येथील ५९ वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. तिसरा मृत्यू आकाशवाणी चौक, चंद्रपूर येथील ६८ वर्षीय महिलेचा तर, चवथा मृत्यू बालाजी वार्ड, चंद्रपूर येथील ५० वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६७ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी जिल्ह्यातील १५८ रुग्णांचा समावेश आहे.
चंद्रपूर परिसरातील बाधित
चंद्रपूर शहर व परिसरातून गंज वार्ड, दुर्गापूर, महाकाली वार्ड, बापट नगर, भानापेठ वार्ड, नगिनाबाग, भिवापूर वार्ड, इंदिरानगर, रामनगर, सरकार नगर, विठ्ठल मंदिर वार्ड, बाबुपेठ, जलनगर, चिचपल्ली, लोहारा, तुकूम, सुमित्रा नगर, पंचशील चौक, स्वस्तिक नगर, बंगाली कॅम्प, बालाजी वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.