शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; जिल्ह्यात 548 मुलींचे झाले अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 05:00 IST

२१ व्या शतकात नवनव्या संसाधनांचा शोध लागला. त्यामुळे लहान वयातच मुलांच्या हातात ॲन्ड्राॅईड मोबाईल आले. यातील विविध अप्लिकेशनद्वारे देश-विदेशातील मित्र-मैत्रिणीच्या संगतीत अडकले. घरातील संवाद लोप पावला. त्यातच लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने मुलांना ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मोबाईल वापरण्याची मोकळीक मिळाली. याकडे पालकांचे दुर्लक्ष झाले.

ठळक मुद्देआमिषाच्या बळी; ५३९ जणांना शोधण्यात पोलिसांना यश

परिमल डोहणे  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होतानाच अल्पवयीन मुलींच्या अपहरणातसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील साडेतीन वर्षात ५४८ अल्पवयीन मुलींचे, तर ९९ अल्पवयीन मुलांचे अपहरण झाले आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन काळात सर्व कुटुंब एकत्र असताना व बाहेर पडण्यास बंदी असतानासुद्धा २१४ मुलींचे अपहरण झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे. यातील ४२२ जणांचा शोध लावण्यास पोलीस विभागाला यश आले असले तरी, अपहरणाची ही आकडेवारी निश्चितच चिंताजनक आहे. २१ व्या शतकात नवनव्या संसाधनांचा शोध लागला. त्यामुळे लहान वयातच मुलांच्या हातात ॲन्ड्राॅईड मोबाईल आले. यातील विविध अप्लिकेशनद्वारे देश-विदेशातील मित्र-मैत्रिणीच्या संगतीत अडकले. घरातील संवाद लोप पावला. त्यातच लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने मुलांना ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मोबाईल वापरण्याची मोकळीक मिळाली. याकडे पालकांचे दुर्लक्ष झाले. याचाच फायदा घेत अनेकांनी आमिष दाखवून १८ वर्षाखालील सुमारे २१४ मुलींचे व ३१ मुलांचे अपहरण जानेवारी २०२० पासून मे २०२१ या कालावधीत केल्याची नोंद जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांत दाखल आहे. मागील साडेतीन वर्षांची आकडेवारी बघितल्यास, जिल्ह्यात ५४८ मुलींचे, तर ९९ मुलांचे अपहरण झाले. त्यापैकी ४२२ मुली व ८७ मुले शोधण्यात पोलिसांना यश आले आहे, 

साडेतीन वर्षात ५६० जण बेपत्ता सन २०१८ पासून मे २०२१ पर्यंत जिल्ह्यात १८ वर्षावरील ३८७ महिला, तर १७३ पुरुष असे एकूण ५६० जण बेपत्ता झाले आहेत. यापैकी १२० पुरुषांचा, तर २७२ महिलांचा शोध लावण्यास पोलिसांना यश आले आहे. यांच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून दरवर्षी एक महिना ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येते. त्याअंतर्गत अनेकांना शोधण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे

स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातून लावला मुलींचा शोधजिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या मुलींचा तपास स्थानिक पातळीवरील पोलीस करतात. चार महिन्यात त्याचा शोध लागला नाही, तर तो स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येते. स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक यासाठी काम करीत असते. आतापर्यंत स्थानिक गुन्हे शाखेने अपहरण झालेल्या मुली या हैदराबाद, राजस्थान, गुजरात आदी परराज्यातून हुडकून काढल्या आहेत. यावरून अपहरणाचे कनेक्शन परराज्यात असल्याची साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.  

चार महिन्यानंतरही अपहरणातील व्यक्तीचा शोध लागला नसल्यास ते प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे येते. आमचे एक विशेष पथक त्यासाठी काम करते. मागील सन २०१८ पासून ६४७ जणांचे अपहरण झाले आहे. त्यापैकी ५३९ जणांचा शोध लावण्यास यश आले आहे. तसेच मिसींगच्या प्रकरणासाठी एक महिना ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येते. त्याद्वारे ५४८ पैकी ३९० जणांचा शोध लावला आहे. -बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर 

 

टॅग्स :Missingबेपत्ता होणंCrime Newsगुन्हेगारी