शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

रत्नापूर येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 16:23 IST

Chandrapur : ऐन पावसाळ्यातही पाण्यासाठी महिलांची होत आहे भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्क नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर गावात नळयोजना ठप्प पडल्याने पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून गुंडभर पाण्यासाठी महिलांवर भटकंतीची वेळ आलेली आहे.

गावामध्ये पिण्यासाठी गोड पाण्याचे स्रोत नसल्याने संपूर्ण गाव नळयोजनेच्या पाण्यावरच अवलंबून आहे. शिवणी उमा नदीवरून रत्नापूर गावाला नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. उन्हाळभर रत्नापूर गावाला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून लोखंडी पाट्या लावून दरवर्षी बंधारा अडविला जायचा.

त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात उन्हाळ्यामध्येसुद्धा नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळायचे. मात्र या बंधारा अडविण्याच्या लोखंडी प्लेट अंदाजे किंमत ९ लाख रुपये चोरट्यांनी २ जुलै २०२३ च्या रात्री लंपास केल्या. ग्रामपंचायतीने पोलिसांत तक्रार केली. मात्र, पोलिसांना आजही रत्नापूर येथील बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेट चोरणाऱ्याला शोधण्यात यश आले नाही. त्यामुळे नदीचे पात्र लवकरच कोरडे पडले आणि आज त्याचा फटका रत्नापूर गावाला बसत आहे. 

आतापर्यंत शेतातील बोअरचे पाणी घेऊन चार पाच दिवसांआड पिण्याचे पाणी कसेतरी मिळत होते. आता तेही आटल्याने ग्रामपंचायत हतबल झाली आहे. दरम्यान, रत्नापूर ग्रामपंचायतीने जोपर्यंत नदीला पावसाचे पाणी येणार नाही, तोपर्यंत नळयोजना बंद राहील, असे सांगून टाकल्याने पाणी कुठून आणावे, असा गंभीर प्रश्न रत्नापूरवासीयांसमोर निर्माण झाला आहे. आता गावात टँकरने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी आहे.

गावात पिण्याच्या पाण्याच्या विहिरी किवा हातपंप नाही. त्यामुळे गावाबाहेर शेतशिवारातील दोन किमी अंतरावरून महिलांना पाणी आणावे लागते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन टँकरने पाणीपुरवठा करावा.- सुनिता मेश्राम, सामाजिक कार्यकर्त्या, रत्नापूर

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater pollutionजल प्रदूषणwater shortageपाणीकपात