शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

रत्नापूर येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 16:23 IST

Chandrapur : ऐन पावसाळ्यातही पाण्यासाठी महिलांची होत आहे भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्क नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर गावात नळयोजना ठप्प पडल्याने पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून गुंडभर पाण्यासाठी महिलांवर भटकंतीची वेळ आलेली आहे.

गावामध्ये पिण्यासाठी गोड पाण्याचे स्रोत नसल्याने संपूर्ण गाव नळयोजनेच्या पाण्यावरच अवलंबून आहे. शिवणी उमा नदीवरून रत्नापूर गावाला नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. उन्हाळभर रत्नापूर गावाला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून लोखंडी पाट्या लावून दरवर्षी बंधारा अडविला जायचा.

त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात उन्हाळ्यामध्येसुद्धा नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळायचे. मात्र या बंधारा अडविण्याच्या लोखंडी प्लेट अंदाजे किंमत ९ लाख रुपये चोरट्यांनी २ जुलै २०२३ च्या रात्री लंपास केल्या. ग्रामपंचायतीने पोलिसांत तक्रार केली. मात्र, पोलिसांना आजही रत्नापूर येथील बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेट चोरणाऱ्याला शोधण्यात यश आले नाही. त्यामुळे नदीचे पात्र लवकरच कोरडे पडले आणि आज त्याचा फटका रत्नापूर गावाला बसत आहे. 

आतापर्यंत शेतातील बोअरचे पाणी घेऊन चार पाच दिवसांआड पिण्याचे पाणी कसेतरी मिळत होते. आता तेही आटल्याने ग्रामपंचायत हतबल झाली आहे. दरम्यान, रत्नापूर ग्रामपंचायतीने जोपर्यंत नदीला पावसाचे पाणी येणार नाही, तोपर्यंत नळयोजना बंद राहील, असे सांगून टाकल्याने पाणी कुठून आणावे, असा गंभीर प्रश्न रत्नापूरवासीयांसमोर निर्माण झाला आहे. आता गावात टँकरने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी आहे.

गावात पिण्याच्या पाण्याच्या विहिरी किवा हातपंप नाही. त्यामुळे गावाबाहेर शेतशिवारातील दोन किमी अंतरावरून महिलांना पाणी आणावे लागते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन टँकरने पाणीपुरवठा करावा.- सुनिता मेश्राम, सामाजिक कार्यकर्त्या, रत्नापूर

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater pollutionजल प्रदूषणwater shortageपाणीकपात