शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

रत्नापूर येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 16:23 IST

Chandrapur : ऐन पावसाळ्यातही पाण्यासाठी महिलांची होत आहे भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्क नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर गावात नळयोजना ठप्प पडल्याने पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून गुंडभर पाण्यासाठी महिलांवर भटकंतीची वेळ आलेली आहे.

गावामध्ये पिण्यासाठी गोड पाण्याचे स्रोत नसल्याने संपूर्ण गाव नळयोजनेच्या पाण्यावरच अवलंबून आहे. शिवणी उमा नदीवरून रत्नापूर गावाला नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. उन्हाळभर रत्नापूर गावाला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून लोखंडी पाट्या लावून दरवर्षी बंधारा अडविला जायचा.

त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात उन्हाळ्यामध्येसुद्धा नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळायचे. मात्र या बंधारा अडविण्याच्या लोखंडी प्लेट अंदाजे किंमत ९ लाख रुपये चोरट्यांनी २ जुलै २०२३ च्या रात्री लंपास केल्या. ग्रामपंचायतीने पोलिसांत तक्रार केली. मात्र, पोलिसांना आजही रत्नापूर येथील बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेट चोरणाऱ्याला शोधण्यात यश आले नाही. त्यामुळे नदीचे पात्र लवकरच कोरडे पडले आणि आज त्याचा फटका रत्नापूर गावाला बसत आहे. 

आतापर्यंत शेतातील बोअरचे पाणी घेऊन चार पाच दिवसांआड पिण्याचे पाणी कसेतरी मिळत होते. आता तेही आटल्याने ग्रामपंचायत हतबल झाली आहे. दरम्यान, रत्नापूर ग्रामपंचायतीने जोपर्यंत नदीला पावसाचे पाणी येणार नाही, तोपर्यंत नळयोजना बंद राहील, असे सांगून टाकल्याने पाणी कुठून आणावे, असा गंभीर प्रश्न रत्नापूरवासीयांसमोर निर्माण झाला आहे. आता गावात टँकरने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी आहे.

गावात पिण्याच्या पाण्याच्या विहिरी किवा हातपंप नाही. त्यामुळे गावाबाहेर शेतशिवारातील दोन किमी अंतरावरून महिलांना पाणी आणावे लागते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन टँकरने पाणीपुरवठा करावा.- सुनिता मेश्राम, सामाजिक कार्यकर्त्या, रत्नापूर

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater pollutionजल प्रदूषणwater shortageपाणीकपात